Thursday, February 17, 2011

मंत्रालयास....

एकदाच घोषितच करुन टाका
कळ्यांनी आणि काकणांनी
फुलायचच नाही
फुलाल तर रातराणीगत रात्री
पण राहु द्या एवढी खात्री
सुगंध जागच्या जागी विरेल
काकणं वाजुन भोवतीच फ़िरेल
काकण आणि कळ्या
चोळामोळा चारचौघात...
त्याला उलटुन ना जाब ना फ़िर्याद
हे एकदाच घोषित तरी करुन टाका.

-प्राजक्त
०५।०२।११

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...