Monday, June 27, 2016

नाशकात अलिकडे पाऊस कमी का पडतो? म.टा.

तुम्ही अाम्ही अापली  नुसती चर्चा करत राहतोनाशिकच्या पावसाला नेमकं झालंय काय?”  पुर्वीवर्गात भुगोलाच्या काटकुळ्या सरांनी प्रश्न विचारला"सांगा पाऊस कधी येतो ?"तर बॅकबेंचर पोरंसुद्धाएका सुरात म्हणायची "सा........जुन !! "  आता जर विचारलं तर फ़क्त खुसफ़ुस ऐकु येईल किंवा तीपोरं वर्गाच्या तुटक्या खिडकीतुन वर बघतील " भोआता पण येऊ शकतो काय भरवसा ? " 

आधी कसं व्हायचं.... पावसाळा ब्रम्हगीरीला सोप्यामधे आपल्या चपलाकाढायचा..खुंटीवर आभाळाची टोपी अडकवुनहातपाय पसरुन नाशकात बि-हाड टाकायचामामाच्या घरी आल्यासारखा.....पावसाआधी सगळंभरुन यायचंपुलावरुन काळारामाच्या कळसाकडेपाहिलं की आभाळ कुठे सुरु होतं आणिकाळ्यारामाचा काळा कातळ कुठे सुरु व्हायचा हेकळायलासुद्धा वेळ लागायचागंगेतीरावरनारोशंकराची घंटा गार हवेने हलल्याचा भासव्हायचातिकडे त्रंबकराजाला थेंबांचा अभिषेककरुन हळुहळु पुढे अंजनीसुताची विचारपुस करतपलिकडे पांडवलेण्यांवरची लव्हबर्ड्सची खुडूबाजीपुसुन टाकायचातिकडे दूर जव्हारच्या घाटातलेकाजवेगोंदण पावसाच्या झोकात हळुहळु मिटुलागायचे.

तिकडे सप्तशृंगीच्या भुरकट पाय-यांना नवा काळारंगयायचासगळ्या देवांचे आयास सायास झाले कीमग आभाळ दुस-या टोकाला भगुरला तात्यारावांच्याअंगणातली मातीच्या गंध छातीत भरुनघ्यायचा.आणि सज्ज व्हायचा धुमाकुळ घालायलामग पहिली धार ‘दुस-या’ तात्यारावांच्याघराबाहेरच्या ‘जगण्यासाठी माझी कविता कधीचनव्हती...’ ह्या बोर्डावर.... तिथुन जो अलिप्तपणापावसाळा अंगात भिनवायचा तो त्याला पुढचे चारमहिने पुरायचामग सिबीएस-शालिमारची अचानकधावपळ व्हायचीसोमेश्वराच्या धबधब्याला नवीनफ़ेस यायचागंगापुर रोड वहातरहायचा.नाशिकरोडला चौकाचौकाचे आडोसे धरुनडोक्यावर रुमालाची बांधाबांध सुरु व्हायचीमगमेनरोड्ला डोकी कमी छत्र्यां जास्तसरकारवाड्याच्या शेजारची कौल टपटप तालधरायचे.जवळच आनंदीबाईची हवेली अंबाडा सोडुनपरत सारखा करायचीसकाळी अंघोळ करुन सुद्धाबसल्या बसल्या जरा झोपेची लहर आल्यावर नव्याहिमतीने तोंडावर स्वच्छपाणी मारल्यागत.. नाशिकनवं नवं नटायचं

पण आताशा... भरुन आलेले ढग वरुनच बेशिस्तमाजोरड्या रिक्षावाल्यासारखं "अय येता का ? " असंविचारणा-या नाशिककडे तोंड फ़िरवतंमग पाऊसराग उतरल्यावर उगाच अंदाज घेण्यासाठी चारदोनथेंब टाकुन पाहतो तर तेही जमीनीवर कमी आणिबेढब काळ्याबिंद्र्या भाऊ-दादांच्या फ़्लेक्सवर जाऊनजास्त पडतातपावसाने गोदेमध्ये पहिली डुबकीमारावी तर सर्वांगाला शेवाळाची घाण , धुणेक-यांचेमांगल्य’ आणि पुन्हा ‘स्वच्छताप्रियवाहनांचेसर्वमांगल्य’. बरं इतकं करुनसुद्धा जर "तुला जावंचलागेलअशी त्रंबकराज शंकराने दटावणी दिली तरउगाच तो पाऊस शाळेला कावलेल्या मुलासारखाहो-नाही करत पाट्या टाकल्यागत शिंपण करतोतीशिंपणसुद्धा काही वेळातच भुरभुर करत स्वत: अंगआकसुन घेते...कारण चारदोन थेंब गाडीवरच्यालोगोवरुन घसरण्याऐवजी लोगो चोरलेल्या खरबुड्याजागेत अडकुन राहतेकाही थेंब चौकामधल्याबेशिस्त आक्रस्ताळी रिक्षावाल्यांच्या थुंकीत अडकुनभिंतींला तर काही थेंब रस्त्याच्या कोप-यात दडतातउरलेले थेंब राजीवगांधी भवन अाणि नाशिकरोडच्याविभागीय अायुक्तालया बाहेरच्या ‘फ़ुलटाईमदुर्लक्षित आंदोलन’ करणा-या मंडपावर अडतातकाही थेंब कॉलेजरोडच्याविलीला दड्पुनरस्ताबदलुन पलीकडच्या गंगापुर रोडकडे जातातअाणि काही इंदिरानगरलापण तिथेही सोनसाखळीचोराच्या तोंड लपलेल्या रुमालात ते थिजतातउरलेले थेंब दत्तमंदिरच्या ट्राफिक पोलीस नसलेल्यासिग्नलवरुन ओघळतात तर काही थेंब बिटकोचौकातल्या सिग्नल तोडुन , १०-१२ प्रवासीकोंबलेली रिक्षा पाहुनसुद्धा दुर्लक्ष करणा-या षंढट्राफ़िक पोलिसच्या बिल्ल्यावर पडतातगल्लीबोळातल्या अतिक्रमणात अडकुन पडतात , अन काही थेंब दिशादर्शक कमानींवर गलेलठ्ठथोबांडांचे अभिनंदन बॅनर असल्यामुळे रस्ता चुकतातआणि भलत्याच माळरानावर जाऊन बरसतातअाजकाल काही सरी तर झोकात बरसायची तयारीकरतात पण पंचवटी , सातपुर भागातल्यानिर्ढावलेल्या गोळीबारात घाबरुन पुन्हा वाफ होऊनढगात अंग चोरुन बसत असाव्यात.

पण ह्या अशा सगळ्या तुरळक,घाबरट, शिंपलेल्या पावसाच्या थेंबांचा आपल्या नाशिकला फ़ायदाशुन्यअसा हा उशीरा उगवलेला पाऊस चार महिनेसत्राशे साठ ठिकाणी अडकतो,हिरमुसतो आणिपुढल्यावेळी आणखी जास्त अंग चोरत पायातल्याचपलाही  काढता नुसता डोकवतोमधल्यासुटीतशाळेच्या अंगणात डोळे किलकिले करत ‘करुनउभं असलेल्या चार दोन पोरांच्या तोंडातगेल्याचे...चार आणे समाधान उराशी घेउन .पाऊसनाशकातुन काढता पाय घेतो आणि पुढे कुठल्याशागर्दरानात जाउन पडत नाही तर जुन्या नाशिकच्याहिरव्या आठवणी आठवत आठवत धो धो रडतराहतोअाणि तुम्ही अाम्ही चर्चा करत राहतोनाशिकच्या पावसाला नेमकं झालंय काय?”



अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...