Friday, January 20, 2017

मी रॉमेंटिक नसण्याची कारणं



माझी चूक काय ? खरंच सांग माझी काय चूक
नाही म्हणजे…… जेव्हा हळुहळु हळूहळु दर्यामध्ये संध्याकाळ विसावत असेल , तेव्हा मी ती संध्याकाळ पाहुन तुला म्हणु शकलो असतो किअगं ! बघ तुझ्या रुपानेच केशरी-किरमीजी रंगाची संध्याकाळ जणू पश्मिना शाल होउन पसरतेस माझ्यावर….. होना
पण त्या क्षितीजकडेचा केसरसर पिवळ्या रंगामुळे मला पायाला ठेच लागलेला मजूर अाठवतो. सकाळी दुधाची उबळ, पोराचा झोका , दोरीवर बाहेर पावसात भिजणारे कपडे अाणि कामाला यायची घाई ह्या गडबडीत तुळशीला ठेच लागली होती त्याला. तिथे जरा रेंगाळायला झालं त्याला. मग पुढे कामाला उशीर झाला म्हणुन मुकादमाने चार पैसे कापलेही त्याचे.अं ? हां….! थोडं वहावत गेलो होतो. तर त्या मजूराच्या पायाला बांधलेलं फडकं अाठवतं, अात दाबुन धरलेली उबळ अाणि अात दाबुन धरलेली हळद किती नाही म्हटलं तरी बाहेर येतेच कधीतरी. अाणि ते पांढरं फडकं अाता झालेल्या लाल-पिवळ्या सरमिसळीमुळे अाणि संध्याकाळच्या हवेमुळे जरा केसरसर पडलंय पायाला बांधलेलं फडकं. म्हणुनअशीसंध्याकाळ झाली कि मलातसंअाठवतं. सांग य़ात माझी काय चूक?
हे बघ झोकात अालेला पाऊस पाहुन मी असंही म्हणु शकतो किअाभाळतुन पाऊस उगु लागला कि असं वाटतं प्रत्येक थेंबाचं एकेक अलिंगन व्हावं अाणि प्रत्येक थेंबाने बहात्तर वादळं निर्माण करावी अाणि तुला बिलगावंखरंच म्हणु शकतो मी असं पण……पाऊस सुरु झाल्या झाल्या मला अाठवतात त्या फ्लायअोवरच्या टॉप अॅंगलने दिसण्या-या झोपड्या. ज्या मधल्या एका झोपडीत मी एका पावसाळ्यातसोशल थ्रीलकरायचं म्हणुन डोकावलो होतो. तिथल्या छप्राखाली मला सगळी मिळुन बहात्तर भांडी पसरवुन ठेवलेली दिसली. सगळी भांडी वर अा वासुन बसले होते. घमेले, पातेले, लोट्या, कढया, टिनाचे डबे, तवेसुद्धा वगैरे वगैरे. अाणि त्या झोपडीत कुटूंब म्हणुन राहणारे गचपण समोर पसरवलेले भांडे पाहात होते. मला त्यांच्या डोळ्यातला प्रश्न दिसला होताअाज भुक कशात रांधायचीजितका जास्त झोकात पाऊस येतो तितकी जास्त पसरवलेली भांडी दिसतात मला. सांग ह्यात माझी काय चूक ?
अगदीच नास्तिक वगैरे असं नाही पण कुणाच्या नामस्मरणातही देवादिकांची नावं घेतली कि मला त्याच्या डोक्यामागचा तेजोमय सुर्य नाही दिसतं. त्यांच्या तशा सुर्याअाड उभं राहिल्याने समोर पडलेला अंधारसावली म्हणुया हवं तर , अंधार फार नकारात्मक वगैरे वाटत असेल तर. राम म्हटलं कि शरयुची ती लाट अाठवते जी अाजरामाला गिळलं ss’ म्हणत समुद्र होऊन कुठल्याशा किनारी डोकं अादळत असेल. तुम्हीअाम्ही खुळे ! त्यालाभरतीम्हणतो. अाणि समुद्राचा हा अात्मक्लेश पाहुन चंद्र छातीतपुर्णहवा घेत ढगामागे स्फुंदुन रडतो. त्याला अापण वेंधळेपुनवम्हणतोअाणि तू म्हणतेसमाझ्यासाठी पुनवेच्या रुपकांच्या कविता का नाही” ….काय चूक ? माझी काय चूक ?
राधाकृष्ण ? कृष्ण म्हणावं तर रानावनात अापलं हरवलेलं एक मोरपीस शोधत भटकणारा सैरभैर मोर दिसत राहतो मनातल्या मनात. हांराधा म्हटलं कि राधाच अाठवते अाणि अातड्यात एक नवा पीळ येतो म्हणा. पण ह्यातही माझी चूक नाही.
तुझ्या कपाळी दोन भिवयांतुन जेव्हा चंद्रकोर डोकावते ना तेव्हा ….धगी पल्याडचा निर्वात …..लाव्ह्यामधली धग….जमीनखालचा लाव्हा….पायाखालची जमीन…. ती जमीन भस्सकन नाहीशी होते अाणि काळजात धस्स् होतं”.........असंही मी म्हणु शकलो असतो मीपण भिवईपासुन अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं तुझं सौभाग्य गुरूत्वाचे नियम लागु करतात. अाणि मला पुन्हा जमिनीचा शाप देतात. ह्यात माझी चूक ?
 अजुन सांगु ? .....मीराने कृष्ण मुर्तीला कवटाळलं अाहे , सहस्त्र झोत त्या मुर्तीअातुन प्रकटले अाहे अाणि मीरा त्या मुर्तीत लुप्त झाली अाहेमीरा कृष्णात लुप्त झाली म्हणुन अापल्याला राधेच्याही वरचं रुपक मिळाल्याचा मंदीरात जल्लोष चालु अाहे. पण त्या जल्लोषात कोप-यात हुंदके देत मृच्छित पडलेला एक पुरोहित दिसतो मला. मीरा कृष्णमुर्तीत लुप्त झाल्यानंतर त्या मुर्तीला तडा गेलाय म्हणे. त्या पुरोहीताला त्याच्या अभंग कृष्णकायेवर पडलेला तो मीरामुक्तीचा तडा बघवला नसावा. मीरा म्हटलं कि तो मृच्छित पुरोहित दिसतो मला तर सांग ह्यात माझी काय चूक ?
क्षितीजावर उमटलेला इंद्रधनुचा सप्तरंगी चाप तस्साच्या तस्सा तोडुन , तुझ्या गळयाभोती मढवेन नेकलेस म्हणुन अन् हुक म्हणुन शुक्राची कडी अडकवेलअसंही रंगवता येतं मदहोष चित्र मला. पण……त्या सप्तरंगात ज्याने त्याने गिरवलेला अाणित त्या रंगात बरबटवलेला देवधर्म दिसतो त्यात मला.
माझं लहानपणी पासुन असंच होतं. खेळातांना अाधी कोणाचा डाव म्हणुन अाम्ही पोरसोरं नाणं उडवायचो. जेव्हा अामचा संघछाप अाला’,टॉस जिंकल्याचा अानंदात उन्मादत असायचा तेव्हा मी ते नाणं उचलुनकाट्याची धूळ साफ करायचो. एखादा दिवस ,एखादा संघ येईल अाणि कधीतरी तोही अाशाळभूत पणकाटाअोरडुन त्याच्यासाठी जल्लोष करेल असं त्याचं सांत्वन करायचो.
मग छाप्याचं काय ? हां कदाचित ह्यात माझी चूक असेल ! सगळं लहानपणीच्या छापा-काट्यात दडलं असेल का?

पण खरं सांग ह्यात तरी माझी काय चूक ?

- प्राजक्त २० जानेवारी २०१७


अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...