Monday, January 22, 2018

मटा दिवाळी अंकासाठी : नाटक : जगण्यातलं कॅथारसिस

कल्पना करा कि मी तुम्हाला एक नाणं दाखवतोय अाणि विचारतोय कि हे काय अाहे ? तुमच्याकडुन एक उत्तर येईल उदा. ’काटा’. 
तर , नाटकाची बीजे नेमकी कोठे असतात ? ह्याक्षणी मला अचानक एक अभंग अाठवतोय.
नामदेव केले स्वप्नामाजी जागे सवे पांडुरंगे येऊनिया ।। सांगितले काम करावें कवित्व वाऊगे निमित्य बोलो नको ।।
तुकोबांनीत्यांच्याकाव्यसर्जनशीलतेचे बीजं कधी रुजली ह्याची नोंद अशी करु ठेवली अाहे. जागृताअवस्थेत अाजुबाजुला घडणा-या घटनांबाबत अनभिज्ञता असलेल्या अापल्या सारख्यांकडुन अापल्या 'अशा' नोंदींच्या अपेक्षा ठेवणं म्हणजे तशी अत्युक्तीच म्हणावी लागेल. 
अापल्याच अाजुबाजुला घडणा-या एखाद्या घटनेमुळे किंवा एखाद्या एेकिव प्रसंगामुळे नाटक सुचत असेल असं नसावं. पहिल्याच धारेत घडा पुर्ण भरत नसतो. अशा असंख्य धारांचा संचय झाल्यानंतर अापणघडा भरलाअसं म्हणतो.  एखादं भाषण किंवाआसुड..’ सारख्या लेखनापेक्षा फुलेंना 'तृतीय रत्न' हा विषय नाटकातच का मांडावा वाटला असेल? तर ह्याच संचयातुन. एखादी घटना किंवा एखाद्या घटनेतुन तयार झालेली अवस्था कुठेतरी मनात घर करुन रहात असावी. अाणि अनेक तशाच घटनांची जंत्री जमली कि मग वाटतं किहा विषय मांडायला हवा.’  तेंडुलकरांच्यागिधाडेसारखं उदाहरण एखादंच. 
तेंडुलकर म्हणतात, “गिधाडेच्यावेळी मी एखादी व्यक्ती भडाभडा बोलत जावी तसं लिहत गेलो. कथा, पात्र, रचना काही काही डोक्यात नव्हतं . मुळात मीलिहतोयह्याचंच मला भान नव्हतं.” ‘एका सुस्त पडलेल्या समाजावर कुणीतरी बॉंब टाकावेअसंगिधाडेचं वर्णन गिरिश कर्नाडांनी कुठंतरी केलं होतं. पण मुळात हे नाटकचला समाजाला घडवुया किंवा समाजविघातकांना अद्दल शिकवुयाअशा भावनेनं लिहलेलंच नव्हतं. मुळात नाटक हे समाजासाठी असतं, प्रेक्षकासाठी असतं, त्यातुन प्रबोधन वगैरे करायचं असतं ह्या असल्या धास्तीतुन तेंडुलकरांनी कुठलंच लिखाण कधी केलं नाही. अाणिगिधाडे’ लिहतांना तर तसं तत्कालिन निमित्तंही नव्हतं. नाटक पुर्ण झाल्यावरमुदतीच्या तापातुन बाहेर अालेल्या माणसासारखं वाटलंअसं स्वत: तेंडुलकरांनी म्हटलंय. मग हे कसं झालं ? त्यांचं मध्यमवर्गीय जगणं, घर सोडुन एकटे मुंबईला येऊन रहायला अाल्यानंतर मोठ्या भावाचा अाजारात सांभाळ करणं हे सगळं त्यांच्यासाठी नविन होतं. पण ह्याचा अाणिगिधाडेचा तसा काहीच संबंध नाही. परंतु तत्कालिन निमित्त नसलं तरी नाटक हे माध्यम त्यांच्याअातपर्यंत शिरलेलं होतं. त्यामुळे त्या अनुभवांतुन झालेल्या अवस्थेचं रुपांतर होऊन ते लिहल्या गेलं असु शकतं. चार दिवसात कोणताही विषय डोक्यात नसतांना लिहलं. किंबहुना हे नाटक लिहतांना तेंडुलकर दुसरंच नाटक (शांतता,कोर्ट चालु अाहे) लिहित होते. ते बाजुला ठेऊन त्यांनी गिधाडे लिहुन काढलं. 
‘शांतता…’चं देखील तसंच. ह्या नाटकाला तर मानाचा ‘कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार’ मिळाला. पण ‘तें’ म्हणतात कि लेखकाने एखादं नाटक कसं लिहु नये ह्याचं उत्तम नमुना म्हणजे हे नाटक. नाटक केलं नसतं तर संस्था बंद पडायला येईल म्हणुन अगदी डोक्यावर बसुन लिहुन घेतलेलं नाटक. ते नाटक पण ठरलेल्या वेळेपेक्षा कमी होत असल्याने अाता काय तर … नाटकाच्या शेवटी बेणारेबाईचं स्वगत लिहुन टाकलं. अर्थात तालमी बघितल्यानंतर त्यांनी लिखाणाची पुनर्बांधणी देखील केली होती. पण नाटक लिहतांना, त्याबद्दल चर्चा करतांना कधी कधी असं बळजबरी लिखाणही करावं लागतं पण नाटककाराच्या डिएनएमध्येच नाटक असलं तर हाती अालेलं साध्य सकसच असतं ह्याचा हा नमुना.
अार्थर मिलरच्या ‘डेथ अॉफ सेल्समन’चं बीज १९४९च्या अमेरिकेच्या अार्थिक घडामोडीचं केंद्र असलेल्या ‘अमेरिक ड्रिम’ ह्या संकल्पनेत होतं. तेंडुलकरांच्या अगदी उलट, म्हणजे अापल्या नाटकातुन काहीतरी संदेश गेला पाहिजे , नाटक प्रेक्षकाला डोक्यात ठेऊनच लिहलं गेलं पाहिजे अशी त्यांची धारणा होती.
एलकुंचवारांचा जन्म ‘वाडा चिरेबंदी’ सारख्याच वाड्यात झाला. त्यांचे वडिल तिथले जमिनदार होते. एलकुंचवार कुटुंबाची जरी ‘वाडा..’तल्या देशपांड्यांसारखी परिस्थिती नसली तरी अाजुबाजुला असे अनेक वाडे त्यांनी ढासळतांना पाहिले होते. स्वातंत्र्योत्तर काळातल्या अशा कुटुंबाची घुसमट अाणी कोलमडण्याबद्दल एलकुंचवार एकदा सत्यदेव दुबें बरोबर चर्चा करत होते. दुबेजी सुद्धा अशाच पार्श्वभुमीमधुन अालेले असल्याने त्यांनी त्यांच्या एका लिथार्जिक मनोवृतीच्या मित्राचा दाखला दिला. बदलाशी जुळवुन न घेणा-या अशाच एका परिवारातल्या त्याने एक ट्रॅक्टर घेतला जो त्याने कधीच वापरला तर नाहीच पण नंतर कधी विकलाही नाही. तो तसाच अंगणात पडुन राहिला. अाणि हीच ट्रॅक्टरची प्रतिमा त्यांनी नाटकात वापरायची ठरवली. ट्रॅक्टरच्या प्रतिमेने विचारांची घुसळण सुरु केली अाणि मग ‘वाडा चिरेबंदी’च्या पात्रांनी हळुहळु अाकार घ्यायला सुरवात केला. 
शेक्सपिअर अाणि त्याच्या नाटकविषयक तथ्यांच्या तर अाता मिथ्यकथा झाल्या अाहेत. तो दिवसा खाटीकखान्यात अाणि रात्री नाट्यगृहाच्या अावारात अालेल्या प्रेक्षकांच्या घोडागाडी सांभाळत होता म्हणे. नाट्यगृहाची पार्किंग ते नाट्य जगतातला सर्वश्रेष्ठ नाटककार ह्या प्रवासात कितीतरी मनात घर करुन बसलेल्या गोष्टींनी मुर्त रुप धारण केलं असेल. तत्कालीन गरीबी , बेरोजगारी अाणि मध्यमवर्गीयांच्या द्विधावस्था बघुन बादल सरकारांचे ‘एवम इंद्रजीत’ अाकाराला अाले. सफदर हाश्मींची नाटकं तर सरळ सरळ यंत्रणेच्या विरुद्धची बंड असायची. तत्कालीन एखाद्या समाजविरोधी घटनेने पेटवलेल्या ठिणग्यांचं रुपांतर ते नुक्कडच्या माध्यमातुन वणव्यात करण्यात वाकबगर होते. अशा नाटककारांची नजरच अशी तयार झालेली होती कि अाजुबाजुला दिसणा-या अन्यायाला वाचा फोडणं हे त्यांचं साध्य होतं अाणि नाटक हे साधन.
हि उदाहरणं एवढ्यासाठी की बहुतांशी हि नाटकं पाहिलेली, वाचलेली असतील मग त्यांच्या मुळाचा अंदाज घेणं सोपं पडेल. सरतेशेवटी अापण पुर्ण तयारीने लिहायला बसलेलो असु द्या किंवा काहीही डोक्यात नसतांना नुसतंच लिहायला बसु द्या परंतु कळत नकळत अापल्याच जगण्यातल्या तुकड्या तुकड्या पासुन अखेरीस एक कॅलिडोस्कॉप तयार होतो. एकुण जगण्याचंच कथारसिस म्हणजे नाटक. हि वरची अनेक यशस्वी उदाहरणं तर त्याच दिशेने अंगुलीनिर्देश करताय. 
मी एकदा जेवण करत असतांना समोर बातम्यांमध्ये, अोरिसाची एक बातमी बघितली. अॅंब्युलंसला पैसे नसल्याने खांद्यावर बायकोचं प्रेत वाहुन नेणा-या एका माणसाची बातमी. मी प्रचंड अस्वस्थ झालो. कुठेतरी 'हे असं' घडतंय अाणि त्याच कुठेतरी पासुन काही शे अंतरावर असलेले अापण निवांत जेवण करतोय? ह्या सगळ्याचा मला प्रचंड तिटकारा अाला. नंतर अनेक दिवस ते दृश्य छळत रहायचं. वरवर तुम्ही चॅनल बदलुन भौतिक देहाला फसवु शकाल पण अंत:करणाच्या पडद्यावर तेच चित्र लूप मध्ये चालु राहतं. त्याच दरम्यान मला विचारणा झाली अाणि मी '१२ किलोमिटर' लिहुन काढलं. अाता फक्त तेवढी बातमीच कारणीभुत होती असंही नाही. कारण नंतर तशीच एक बातमी पुन्हा वाचण्यात अाली त्यावर मला लिहावं नाही वाटलं. जेवण अाणि बातमी पैकी एकच गोष्ट जर मी करत असतो तर ह्या लिखाणाचे बीज मिळाले नसते. अाणि एकुणच अाजवरच्या यंत्रणेवरच्या कडेलोटातुन हे अालं असावं.
माझ्या जगण्याच्या चारही बाजुने प्रिझम फिरला गेला पाहिजे. जिथे रंगांचा पसारा प्रकट झाला ती तिरिप अापली. पण अट हि अाहे कि प्रिझम सातत्याने फिरला पाहिजे. स्वत:बाबतीत तर माझे मत फारच निष्करुण अाहे. माझ्यातला लेखक स्वार्थ पाहतो. मला ज्या गोष्टींचा त्रास होतो ती गोष्ट माझ्या यंत्रणेबाहेर गेली पाहिजे हि माझी प्राथमिक गरज होऊन बसते. हा त्रास जाऊन माझा त्रास कमी झाला पाहिजे. इतकं साधं. कधी कधी असंही होतं कि फक्त एखाद्या पात्राच नाव, एखादी अाकृती दिसते अाणि अापण ती कुठेतरी नोंदवुन ठेऊन देतो. योग्यवेळी ते पुढे येतं. त्याच्या तसं पुढे येण्याला कालमर्यादा नाही. अंगणातल्या झाडाला एखादं फळ अाल्यावर कसं अापण ते धान्यात पिकायला ठेवतो तसं असतं ते.
मजुरावरचं नाटक लिहुन लगेच कुठेतरी मजुरांचा रोज वाढणार नसतो कि दुष्काळावर लिहुन लगेच पाऊस पडणार नसतो. एखाद्या मानवी संबंधांवर लिहुन लगेच माणुस आत डोकावून पहातही असेल पण वागण्यात लगेच बदल घडेलच असं नाही. पण मांडलं जाणं गरजेचं आहे. त्याची नोंद गरजेची असते.  

सुरवातीला दाखवलेल्या नाण्याला तुम्ही 'काटा' म्हटला होतात ना? पण माझ्याबाजुने तो 'छापा' होता. माझा छापा तुमचा काटाही असु शकतो. मी फक्त माझं गवसलेलं मांडलं. इतकंच.

संगीत देवबाभळी ( दिव्य मराठी)

संगीत देवबाभळी... रंगभूमीचे अायाम बदलणारी एक विठूसावळी कलाकृती. मच्छिंद्र कांबळींच्या अाणि अाता प्रसाद कांबळींच्या भद्रकाली प्राॅडक्शनने मंचावर साकारलेली ही देहूनगरी. रंगसंगीत एकांकिका स्पर्धेत राज्यात प्रथम पारिताेषिक मिळवलेल्या प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित अाणि अानंद अाेक याने संगीतबद्ध केलेल्या ‘संगीत देवबाभळी’ एकांकिकेचे विठूमय दाेन अंकी नाटक.

विठ्ठलभेटीची अास असतेच, पण याच भेटीत जेव्हा अापण विठ्ठलचरणी नतमस्तक हाेताे तेव्हा कुठे तरी काही तरी हरवल्यासारखं वाटतं अाणि ते हरवल्यासारखं असतं तिथे रखमाबाईचं नसणं. तिला भेटायला वळसा घालून जावं लागतं. हा वळसा का घालावा लागताे... विठूमाउलीचे अाणि रखमाबाईचेही अंत:करण तेव्हा काय म्हणत असेल... अापण विठूरायाला माउली म्हणताे म्हणजेच त्या स्पंदनात कुठेतरी बाईच्या भावनांचा प्रवाह वाहत असताे, रखमाबाईचा तर हा प्रवाह अापण अविरत बघतच अाहाेत... बाईच्या मनात चाललेला हाच कल्लाेळ जेव्हा तुकारामबुवांच्या अवलीच्या रूपाने उभा राहताे तेव्हा ताे प्रवाह रहात नाही तर त्याचा अंत:करण स्पर्शातून ‘विठ्ठल, विठ्ठल’ असा हरिनाम हाेताे अाणि अापणही इंद्राणी डाेहातील त्या हरिनामात कधी प्रवाही हाेऊन जाताे ते कळतही नाही... तल्लीनतेची ही राेमांचकारी अनुभूती मिळते संगीत देवबाभळीतून...

संगीत देवबाभळी... रंगभूमीचे अायाम बदलणारी एक विठूसावळी कलाकृती. मच्छिंद्र कांबळींच्या अाणि अाता प्रसाद कांबळींच्या भद्रकाली प्राॅडक्शनने मंचावर साकारलेली ही देहूनगरी. रंगसंगीत एकांकिका स्पर्धेत राज्यात प्रथम पारिताेषिक मिळविलेल्या प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित अाणि अानंद अाेक याने संगीतबद्ध केलेल्या ‘संगीत देवबाभळी’ एकांकिकेचे विठूमय दाेन अंकी नाटक. अवलीच्या मानसिकतेतून जरी नाटक पुढे जात असले तरी रखुमाई म्हणजेच नाटकातील लखुबाईच्या वेदना रसिकांच्या हृदयाच्या खाेलवर जातात. संगीत नाटक म्हटलं म्हणजे खूप रागदारी, अालापी अाणि नाटकात गाणी किंवा संगीत ठासून भरणे... असा एक समज झाला अाहे. मुळात अाता फारशी संगीत नाटकंच रंगभूमीवर येत नाहीत. पण, प्रसाद कांबळींनी तेच धाडस केलं अाणि एक वेगळ्या धाटणीची नाटकवारी मंचावर अाणली. विठ्ठलभेटीची काेणतीही अास मागे साेडली नाही. मुळातच विठूगंधासारखी संहिता, तुळशीमाळेसारखं संगीत अाणि अवलीच्या भूमिकेतील शुभांगी सदावर्ते अाणि लखुबाईच्या भूमिकेतील मानसी जाेशी यांचा पंढरीच्या कळसासारखा अभिनय. विठूने कंबरेवर हात ठेवावे अाणि सगळा कल्लाेळ शांत हाेऊन अापण इंद्राणीच्या पाण्याने त्याच विठूरायाचे चरण धुवावे ही अनुभूती प्रफुल्ल दीक्षितच्या प्रकाशयाेजनेची अाणि साक्षात देहूत जाऊन विठूरूपात तुकाेबांचे दर्शन देणारं प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य. यामुळे चार दिंड्या एकत्र येऊन त्या चार टाेकांवरील मनांचं रिंगण जेव्हा फेर धरून रसिकरूपी वारकऱ्यांच्या भावानुभूतीला स्पर्शून जातं तेव्हा विठ्ठलाशी कडकडून राेमांचकारी अालिंगन हाेते अाणि अवघा रंग देवबाभळी हाेऊन जाताे.

मंचावर अनेक वर्षांनी अशी वेगळ्या धाटणीची संगीत कलाकृती सजली. गर्भार असलेली अाणि तुकाेबांच्या विठ्ठलभक्तीमुळे अत्यंत वैतागलेल्या अवलीच्या पायात तुकाेबांना रानात शाेधताना देवबाभळीचा काटा रुतताे अाणि हाच काटा चार मनांतली संवेदना-कल्लाेळ, भक्ती-तुसडेपण, मानसिकता-हताशपण, सामान्यपण ते देवत्व, नकार अाणि नकारातील स्वीकार, जाणीव-जाणिवांचा उद्धार, अश्रू अाणि अास असं सगळंच दाखवून जाताे तेव्हा थाेड्याफार फरकाने ताे काटा कुठेतरी अापल्यालाच बाेचलेला नाही ना? असा सवाल अापणच अापल्याला विचारताे अाणि नाटक नव्हे तर अापण मंचावरी कधीही न दिसलेल्या विठूनामात तल्लीन हाेऊन विलिन झालेल्या तुकाेबाला कधी भेटताे, मंचावर असलेल्या फूटभराच्या विठ्ठलमूर्तीतून माउली कधी प्रत्यक्षात दर्शन देते अाणि संवेदनांचे अश्रू झेलते ते अापण अाजपर्यंत किती वेळा अाई म्हटलाे हे जसे सांगता येत नाही तसेच अाहे. काटा जरी अवलीला बाेचला तरी वेदना मात्र रखुमाईला झालेल्या अाहेत. एकीकडे रूसून पाठीमागे गेलेली रखमाई जशी अाहे तशीच संसारातून अंग काढून केवळ विठूभक्तीत रमलेल्या तुकाेबांवर रूसलेली अवली अाहे. दाेघींची वेदना एकच. पण, एकीत देवत्व तर दुसरीचं सामान्यपण. अवलीचं माउलीला शिव्याशाप देणं अाणि अापल्या पतीला लागलेला बाेल रखमाईला सहन न हाेणं. त्यातून तिचा विठूरायाशी हाेणारा वाद... कित्येकदा हा वाद तिच्या मनातलं द्वंद्वच अाहे म्हणूनच या द्वंद्वातच मग तिच्या रूपातूनच स्वत:बराेबरच माउलीचेही दर्शन देऊन जाते. दुसरीकडे दाेघींचाही मंचावर फक्त प्रतीकात्मक असलेल्या तुकाेबांशी चाललेला संवाद नश्वरतेच्या अनुभूतीचं अत्युच्च टाेक दाखवून जाताे अाणि अापण देवबाभळीने झालेल्या जखमेच्या तळाशी येऊन पाेहाेचताे.

मुळातच संहिताच अत्यंत पराकाेटीची सुंदर. रखुमाई अवलीला म्हणते की ‘अापण अापलं नांगरत रहावे, पाऊस येवाे न येवाे’ किंवा ‘मग मी अाणि तू दाेघी गाभाऱ्याबाहेर अाहाेत पण, तू मात्र गाभाऱ्याबाहेर राहूनही गाभाऱ्याचा घुमारा झालीस...’ असे संवाद संवेदनशील रसिकांच्या अंगावर शहारा उभा करणार नाहीत तर नवलच. तसेच ‘करपायच्या अात खरपूस झाल्या झाल्या उलथायची भाकरी, फाेडणी तांबूस झाल्या झाल्या अाेतायची भाजीत, ऊतू जायच्या अात उतरवाचं भांड... का? कडेलाेटाच्या क्षणापर्यंत पाेहाेचून पुन्हा माघारी का गं फिरायचं अापण बायकांनीच?’ एक बाईही बाईच्या मनाचा असा खाेलवर विचार करणार नाही ताे प्राजक्तने लिहिलेल्या अनेक संवादांतून झालेला दिसताे. या नाटकात प्राजक्तने काही अभंग अाणि गाणीही लिहिली अाहेत ती अानंद अाेकच्या अविट संगीतातून उमटली अाहेत. अवलीची चिड, वैताग हा पराकाेटीचा हाेताे तेव्हा ती म्हणते की,

माझ्या काेटी शिव्या। तुझ्या येवाे ठायी ।
विटे तुझ्या पायी। तडे जावाे।।
किंवा मग
इझू दे रे देवा। इझू दे रे।
अंतरीची पिडा । इझू दे रे।।
सजू दे रे देवा। सजू दे रे
पायातळी काटा। सजू दे रे।।

एवढ्या प्रगल्भतेने हे अभंग येणं यामागे तुकाेबांचा केलेला अभ्यास स्पष्टपणे दिसून येताे. 
लेखनाबराेबरच प्राजक्तच दिग्दर्शनही भन्नाटच म्हणावं लागेल. तुकाेबांचं घर, त्यांची बसण्याची जागा अाणि इंद्रायणी नदी अशा साधारणत: महत्त्वाच्या तीन ठिकाणी नाटक घडतं. पण पाठमाेरी कमबरेवर उभी राहिलेली रखमाबाई असाे, विठ्ठलाच्या कानात बाेलणारी रुख्मिणी असाे वा राधेवर चिडणारी रखमाई असाे नाहीतर अवलीची सेवा करणारी लखुबाई असाे. दिग्दर्शनात तिच्या या रूपांचा अत्यंत काैशल्याने वापर झाला अाहे. तेच अवलीच्या बाबतीतही. गर्भार असलेल्या अवलीचे काटा रुतून पडणे, तुकाेबांना शाेधणे, विठ्ठलाला शिव्याशाप देणे, इंद्रायणीची तिला भीती वाटणे अशा सगळ्याच बाबी तुकाेबांचे माजघर, बैठकीची जागा अाणि इंद्रायणीच्या पायऱ्यांवर घडताना दिग्दर्शक म्हणून कमाल जाणवते. या सगळ्याचा कळस ठरताे ते म्हणजे नाटकाचे संगीत. संतवाणी नाटकात येते म्हणजे अर्थातच पखवाज अालाच. तबला, संवादिनी, टाळ-चिपळ्या ही पारंपरिक वाद्ये तर अाहेतच, पण अनेक गाण्यांमध्ये एकतारी, सतार, स्वरमंडलाचा केलेला वापर रसिकांना डाेलायला लावताे. करी ताे कवित्व, येई गा विठ्ठला ही गाणीच मुळात अानंदगंधर्वांनी म्हणजेच अानंद गंधर्व यांनी गायली अाहेत. त्यांच्या अावाजातून तुकारामाची भेट हाेते. ती भेट संगीताच्या माध्यमातून हाेते अाणि रसिकाही डाेलायला लागतात.

नाटकाची प्रकाशयाेजना तर थेट देहूत घेऊन जाते, मग ते इंद्रायणीचे पाणी असाे, तुकाेबांची बसण्याची जागा असाे किंवा अवलीचा संसार असाे. प्रकाशयाेजनेतून मंचावर संपूर्ण अंधार अाणि कधी फक्त तुकाेबाच दिसतात तर कधी फक्त विठूमाउली दिसते. त्यावेळी जिवंत हाेते देहूनगरी. एवढं सगळं असताना सगळ्यात माेठी जबाबदारी येते ती म्हणजे अभिनयाची. अवली अाणि लखुबाई अशा दाेनच पात्रांभाेवती नाटक फिरते, पण त्यांना मंचावर मात्र अाणखी दाेघांना दाखवायचे अाहेे ते म्हणजे विठूमाउली अाणि तुकाेबांना. अशावेळी शुभांगी सदावर्ते अाणि मानसी जाेशी यांचा कस लागताे. ही पात्रं सर्वसामान्य नाहीत किंवा ही कथाच सर्वसामान्य नाही याचा पुरेपूर अभ्यास या दाेन तरुण अभिनेत्रींनी केला अाणि चारही पात्र रसिकांसमाेर जिवंत केली. नाटकाची व्यावसायिक गणितं जरा वेगळी असतात. या नाटकात ती गणितं किती अाहेत ते येत्या काही प्रयाेगांतून दिसेलच. पण, रंगभूमीला एक नवा मेकअप देण्याचा यशस्वी प्रयत्न या नाटकाने नक्कीच केला अाहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. शेवटी काय तर

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। 
शब्दांचीच वस्त्रे यत्ने करू।।
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन। 
शब्द वाटे धन जनलोका।।

हे जनलाेकासाठी असलेला शब्दच संगीत देवबाभळीतून रसिकांपर्यंत पाेहाेचले अाहेत. प्रयाेगागणिक काही सुधारणा हाेतीलही पण, प्रत्येक विठूभक्ताने एकदातरी देवबाभळीची वारी केली तर त्याला विठ्ठलाबराेबर तुकाेबा, रखुमाई अाणि अवली यांच्यातून कुठेतरी स्वत्वाचा शाेध लागले हे मात्र निश्चित.

- पीयूष नाशिककर
piyushnashikkar@gmail.com
लेखकाचा संपर्क - ७७७००५९००९
https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-piyush-nashikkar-write-about-play-sangit-devbhabali-5795942-PHO.html

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...