Saturday, March 26, 2016

रंगवारकरी : कविता

एकेका लेव्हलची
होत जाते विट....
समोरचा अंधार जणु
पांडुरंगाच्या माथीचा
अबीरबुक्का .....

विंगेतल्या झोताने
हळुहळु उजळु लागतो स्वत: 
हळुहळु आपण तुकाराम होत जातो

टाळ्यांचा गजर टिपेला पोहचत
चिंचोळा होत जातो....
अन् कळस दिसल्यागत 
वाढत जातात
काळीज ठोक्यांची आंदोलनं

तिस-या घंटेतुन
टाळमृदुंग ऐकु येऊ लागतात
मखमल पडदा उलगडतो 
अन् 
एक वारी सुरु होते

- प्राजक्त 
२६/०३/१६
International Theater day 


Friday, March 25, 2016

निंबाच्या पानांच्या पावसात



“धुक्यात गोठलेलं गाव. टेकडी चढुन पलीकडे उतरलं कि पोस्टअॉफिस लागायचं. कौलारु पोस्टअॉफिस. लाकडी कुंपण ,मातीमधे गचके खात खात उघडबंद होणारं लाकडी बसकं गेट, गर्द वडाच्या सावलीत कुशीवर रेलुन बसलेलं पोस्ट अॉफिस. टेकडीवरचं ते वडाचं झाड पण फकिरासारखं… टेकडीच्या टोकाशी पाय सोडुन बसलेलं. अाठवड्यातुन एकदा भल्या पहाटे कुणीतरी येऊन पोस्ट अॉफिसचं अंगण शेणाने सारवुन घ्यायचं. अाताशा फोन मेलच्या जमान्यात कोण कशाला पोस्टाकडे वळतो. पण डोंगरद-यात , गर्द जंगलाच्या वस्तीत अजुन सुर्य न पाहिलेली माती अाहे तिथे फोनमेलीच्या गोष्टी कशाला करतो,बाप्पा?“  हे एेकुन असं वाटलं हातातली सगळी कामं सोडावी अाणि बाबांना घेऊन थेट त्यांचं ते ‘धुक्यात गोठलेलं गाव’ गाठावं.  

बाबा बोलत होता “पुर्वी प्रत्येक पोस्टाबाहेर एक माणुस चारअाठ अाण्याला पत्र वाचुन पण द्यायचे अाणि अापण सांगु ते उत्तर लिहुन पण द्यायचे. अाता सगळं गेलं. मला एवढं पत्र लिहुन देतो का ? अाणि एवढं वाचुन पण दाखव ” बॅंकेत ‘पेन अाहे का’ विचारणारे भेटतात तसे पोस्टात ‘पत्र लिहुन देता का’ भेटतील याची मला कल्पना नव्हती. पण हा मात्र अपवाद होता हे मला नंतर नंतर जशी वेळ कलंडायला लागली तसं कळायला लागलं. 

मी विचारलं “ पत्र ?”

बाबा म्हणाला “बायकोचं अाहे. खाजगी काही नसतं ह्या वयात वाचा. वाचा. ”

तिथेच अावारात निंबाच्या झाडाखाली अाम्ही दोघं सावलीला कठड्यावर बसलो. मध्येमध्ये पिवळी सुकलेली निंबाची पानं फेर धरुन गरगरत खाली पडत होती. अाजुबाजुला तुरळक ये-जा करणा-यांची गर्दी होती. अजुनही इतके लोक पोस्टात येतात हेच माझ्यासाठी नवल होतं. मी कसलंस कुरिअर अालं म्हणुन मी तिथे गेलो होतो. बाबांनी चुरगळलेलं पत्र माझ्या पुढ्यात ठेवलं. कदाचित येऊन चारदोन दिवस झाले असतील पण वाचुन दिलं नसेल. किंवा असं म्हणुन बाबांचीच हिम्मत नसेल झाली पत्र लिहुन घ्यायची.(दुस-याला दोष देणं सोपं असतं) पत्राची सुरवातच वेगळी होती. 

“ 

अहोकाय ? चमकलात ना ? मी पण काय वेंधळी अाहे नाहां सनविविपत्रास कारण कि... हां अाता सांगा चमकलात ना ? मी कसं लिहलं पत्रते सांगेन सावकाशअाधी महत्वाचं सगळं बोलुन घेऊ दे,नाहीतर विसरायला होतंपुढच्या महिन्यात गावात वीज येणार अाहे म्हणेतशी ती तुम्ही गेल्यापासुनच येणार होती पण अाता खरंच येते कि काय अशा चर्चा चालु झाल्यातयेऊ दे बाप्पा,मला भुरकीला कायगडप अंधार भुरकट दिसलं इतकंचपरवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीची.. यंदा किराणवाल्याची चिंता करु नका.  तुम्ही येऊस्तोवर काही पैसे मागायचा नाहीकारण मागच्या अाठवड्यात थोडे दिलेत मी पैसेते कसला कार्यक्रम होता काय कि म्हणुन काही लोकांनी टोपल्या बनवुन नेल्याकसला तरी सरकारी कार्यक्रम होता म्हणे म्हणुन जरा जास्तच टोपल्या बनवाव्या लागल्यात्याचे अाले थोडे पैसे काळजी करु नका . तेवढ्या वेताच्या काड्या होत्या घरात अाधीपासुन....अाप्पा बिचारा देतो गुमान सगळं अाणुन . कधी कंटाळा करत नाहीमाझं मेलीच लक्षच नसतं परवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीचीपुर्वी रेडिअोतले गाणे पुढे असायचे अाणि खरखर मागे चालु असायचीअाता खरखर पुढं अाणि मागं अंधुक गाणं चालु असतंइकडे अाले कि तेवढं पाहुन घ्या त्यालाअापलं लेकरु सापडलं का ? दरवेळेस हा प्रश्न विचारणार नाही ,विचारणार नाही असं मनाला बजबजावुन ठेवतेपण माया ,इच्छेसाठी टक लावुन बसलेल्या ता-यासारखी तुटता तुटत नाही बघाइतक्या मोठ्या शहरात कसा सापडेलकधी सापडेलपण सापडेलहोऊ दे नऊ वर्ष झाली तर दहाव्यात सापडेलतुम्ही यायची घाई करु नकामी अगदी बरी अाहे इथेफक्त परवा वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीचीते तुमच्या सोबत असतं ते टिल्लं लेकरु कसंय ? त्याच्यावर फार माया लावु नका बरं !पण काळजी घ्या त्याचीअापल्या सारखंच त्याचे अाईवडील एकदिवस त्याला घेऊन जातील मग काय करालअाणि नेतील त्याला शोधत असत बिचारे.  इथं समोरच्या खोलीत एक नवीन भाडेकरु पोरगी अालीयएकटीच अाहेफार गुणी पोरगी अाहेहे पत्र तिनेच लिहुन दिलंयपडला जीव भांड्यात ? फारच लाघवी पोर अाहे.येता जाता चौकशी करत राहतेअाणि बरंका माझ्या वेंधळेपणातुन धक्का लागला अाणि काच फुटली खिडकीचीबाहेर बर्फ पडायला सुरुवात झालीय.  वारा झोंबायचा रात्रीचाअाणि कसंय ना सबंध उघड्या खिडकीतुन थंडी जितकी त्रास देते त्यापेक्षा जास्त फटीतुन येणारी टोचणी त्रास देते.. म्हणुन म्हणते शोधत रहा अापल्या लेकराला एकदाचा मिळु तरी दे किंवा मेलाय हे तरी कळु दे.येईल कधीतरी,येईल कधीतरीबोचरी थंडी जास्त झोंबतेअाणि हो तुटक्या खिडकीचं निमित्त काढुन लगेच येऊ नकात्या नविन भाडेकरु पोरीनं तिचं पावसाचं जाकेट लावलंय तिथं व्यवस्थितती म्हणते तशीही ती पाऊसात बाहेर नाही पडत कधीतुम्ही ठरल्याप्रमाणे नेहमी सारखे दिवाळीतच या..... दोन दिवसासाठीमनीअॉर्डरा बिर्डरा काही नको इतक्यातपहिलंच पत्र अाहे . माझ्या स्वभावपेक्षा वेगळं काही वाचायला मिळालं तर समजुन घ्या कि पत्र लिहणा-या पोरीने खोड काढलीतशी बदमाश अाहे तीकळावेलव यू . तुमची.

बाबा वरमला अाणि म्हणला “ते शेवटचं इंग्रजी त्या पोरीचंच असेलं..अामच्या मंडळीला कसलं येतंय इंग्रजी”

मी म्हटलं “ अाजींचा स्वभाव फार छान अाहे हो”

बाबाची छाती फुगली “मग ! दिसायला पण फार सुंदर अाहे ती. ती खुप नाजुक अाहेचहात टाकायला दुधाची साय बोटाने बाजुला करायला जाते तर तिचा गुलाबी रंग उतरतो दुधातनासतं मग दुधझाडावरची फुलं तोडतांना बोट खरचटतं म्हणुन म्हटलं तोडायच्या भानगडीत पडु नको , खाली पडलेला प्राजक्त वेचत जा तर एक दिवस फुलांवर पाय पडुन मुरगळला ना बाईचा पायइतकी नाजुकएकदा पहाटे कुस बदलली तर खरचटलं डाव्या खांद्याला .” 

 मी डोळे विस्फारुन बघतचं राहिलो. मग बाबांनी ‘गंमत केली रे” अशा अर्थी डोळे मिचकावले अाणि खोखो हसले. मग अाम्ही उत्तर लिहु लागलो.

“तुझं पत्र मिळालंवाचुन अानंद झालाअौषधांबद्दल काहीच का लिहलं नाहीसंपले असतील तर मागवुन घेमनीअॉर्डर पाठवतो लौकरच.  माझ्याबद्दलची तुझी नेहमीची जागरणाची तक्रार मिटल्यात जमा अाहेगेल्यावेळी तू बोहारणीला साड्या देऊन भांडे घेण़्यासाठी ज्या दोन साड्या दिल्या होत्या त्याचे उशांचे खोळ शिवुन घेतले मीम्हणुन अाता लवकर झोपी जातोनाही वाटले बोहारणीला द्यावेसेभांड्यांची व्यवस्था केली मी माझ्या हिशोबाने…..”मी बाबांना मध्येच थांबवलं अाणि विचारलं “ त्यांना दिसत नाही ?ती मुलगी अात्ता अालीमग पुर्वी का पत्र लिहायचे तुम्हीकोण वाचुन दाखवायचं ? “

“मीच” बाबा म्हणाले. मी न कळाल्याची मुद्रा केली. बाबा सविस्तर सांगतो अशा पद्धतीने बसले अाणि म्हणाले “अरे नीट दिसत नाही माझ्या बायकोलाचिडवायचो तिला ‘चंद्रासारखे डोळे’मग एकदिवस एका डोळ्यात खरोखर पोर्णिमेचा शुभ्र चंद्र उतरलाकाहीतरी पडद्याचा अाजारअॉपरेशन खर्च फार. एकदा घेऊन गेलो होतो. अौषधांची जंत्री पाहुन म्हातारी गावी पळुन गेली. तिला म्हटलं तिकडे तरी जा सरकारी दवाखान्यात. पण म्हातारी काय जात नाही घाबरते कि काय. अाणि इकडं ये म्हटलं सोबत तर तेही नाही. अाणि मला ही तिकडे थांबु देत नाही. इकडे म्हटलं तर इकडे हि येत नाही. इथे जमिनीचा कोर्टकटला चालु अाहे. महिनाभरात मिटेल असं वकिल लोकं दोन वर्षापासुन सांगताय. बापाने मरतांना सांगितलं होतं तेवढी मोकळी कर जमीन. त्याच्या शेवटच्या इच्छेत मला बांधुन गेला. त्यात माझ्या म्हातारीचा हट्ट त्यांचा शब्द खाली पडु नका देऊ..अाता हळुहळु दोन चंद्र झालेअाता अजुन भुरकट भुरकट दिसतं तिलामहिनाभर थांबेल अाणि जाईल निघुन कायमचाअाता नाही थांबवतती तर अाता म्हणते ‘गरज काय अापरेशनची?’ . अंधार अोळखीचा झालायअंदाज जवळचा झालायअौषधाला पैसाच इतका लागतो तर अॉपरेशनला किती लागेलमी पण नीच मला माहितीय ती नाहीच म्हणेल म्हणुन तिला दरवेळेस अाग्रह करतोती पण समंजस माझा पोकळ अाग्रह कळतो तिला म्हणुन दरडावुन,अादळ अापट करुन नाही म्हणतेमोठी बनेल अाहे म्हातारीतिच्याच्याने घर काही सुटत नाही.पैसा वाचवुन मग सहाएक महिन्यातुन एकदा जातो घरी तिला भेटायलापत्र लिहुन पाठवायचोती जपुन ठेवायचीमग अाम्ही अामच्या घरामागे हे ss अस्सा !  अाभाळा इतका जुनाट पिंपळ अाहेत्याच्या खोडात एक सिंहासनासारखा खोपा तयार झालायझाडाची ढोलीमी तिकडे गेलो कि तिथे बसवतो महाराणी साहेबांनाअाणि मी पाठवलेले अाणि तिने जपुन ठेवलेले पत्र वाचुन दाखवतोमला ही सोपं पडतं अाताशा अाठवायला जड जातं अाणि वर्षभरातलं काय काय लक्षात ठेवणार ना. अाणि तिला पण पत्र येताय म्हणजे मी इकडे सुखरुप असल्याची मुक पावती . हे तिचं पत्र अालं म्हणुन म्हटलं उत्तर द्यावं. 

बाबा अजुन बोलतंच होते “अाम्हाल सवय अाहे ह्या अशा चिठ्ठ्यांची.  अामच्या काळी पत्र किंवा चिट्ठ्या असायच्याप्रेमात होतो तेव्हा पण लिहुन घ्यायचो छोटंसं चिटूरं. “जय दशभुजा माता कि जय” , “ त्रिशूलशंखधारिणी दशभुजा माता प्रसन् , अाणि देवीचं चित्र काढायचो. 

मी हे असं  चिठ्ठीत? लवलेटर मध्ये?

बाबा हसले “दशभुजा माता म्हणजे अाज देवी मंदिरा मागे भेटत्रिशूलशंखधारिणी दशभुजा म्हणजे देवीच्या दहा हात असतात ना ? इकडे पाच तिकडे पाचमग शंख ‘ह्या’ हातात होतं ‘ह्या’. अाणि त्रिशूल हा ‘असा’ हात म्हणजे किती ? कितीअहो घड्याळातले ‘चार’!  . म्हणजे ‘देवी मंदीरामागे चार वाजता भेट अाणि देवीचं चित्रम्हणजे कोणाला शंका पण नाही यायची “

मी म्हणालो “अच्छा ! अशी सुरवात झाली होती तर तुमच्या ह्या प्रेमकथेला !” बाबा म्हणाले “नाही नाही , ती चिठ्ठीवाली वेगळी होतीमाझी अवस्था तीच जी अाता तुमची अाहेमुद्दा असा अाहे अाहे कि ,चिठ्ठीची गंमत काही संपत नाही कधीचते प्रेम जे अपुर्ण राहिलंतुम्हाला काय वाटतं तुम्हीच प्रेमवीर अाहात?  पण तेव्हा सुद्धा कसं होतंती चिट्ठी ज्याच्याकडे द्यायचो त्याच्यानुसार अामच्या मनातला प्रवास सुरु व्हायचा . अाता इथे गेली असेल चिट्टीअाता तिथे गेली असेल चिट्ठी ,  अाता चौकात पर्यंत , अाता नाक्यापयंत , अाता घराजवळ , अाता तिच्या हातात अाली असेलअाता तीने भरभर वाचुन कुणी पाहुन नये म्हणुन पटकन काळजाशी ठेवली असेल . मग असं सगळं उलटं गणित मांडुन अाम्ही मंदिरापाशी ताटकळत बसायचोपण ती काही यायचीच नाहीनंतर दुस-या दिवशी कळायचं चिठ्ठी मिळालीच नाही . पण अाली नाही अाम्ही वाट पहात बसलो म्हणुन शक्य तितके पॉझिटीव रहायचोमिळाली असेल पण बाप अाडवा अाला असेलमिळाली असेल पण अाईने स्वैपाकाला लावलं असेलम्हणजे थोडक्यात काय तर ‘ती’ का अाली नाही ह्याच्या शक्यातांची जेव्हा अाम्ही यादी करायचो तेव्हा सगळ्या शक्यतांमध्ये अाधी तिला वाचवायचोतीची बापुडीची काही चुक नाहीहे अमुक अमुक तमुक तमुक झालं असेलहाच काय तो अामचा कयासदोष तीचा नाही अाजुबाजुचा असायचाती अाली नाही , तुमच्या भाषेत’ टप्पा दिला’ म्हणुन तिचा ‘राग-राग’ नाही केला कधी . मग चोरुन चोरुन बघायचोअाणि हौस भागवुन घ्यायचोत्या काळची चोरुन बघायची मजा अाजच्या मिठीलासुद्धा नाही बघा.

अाणि तुम्ही म्हणजे असं कि “ दोन ब्लु टिक दिसले तरी रिप्लाय का देत नाही “ , “अॉनलाईन दिसते पण माझ़याशी का बोलत नाही” अाजच्या शक्यतांमध्ये तुम्ही लोकं सगळ्यात अाधी दोष देता तो जोडीदाराला. “ मी बाबांचं मोबाईल ॹान पाहुन मनातच हसलो अाणि म्हटलं “बरं मग तिचं काय झालंदशभुजा मातेचं ?”

बाबा म्हणाले “पुढे काय तीच घिसीपिटी कहानीती होती ‘महालक्ष्मी बंपर करोडपती सोडत’ अाणि अाम्ही अापले ‘दिवाळीची सोरट’ कुठून मेळ लागेल होपोरीचं मिशीवाल्या बापासमोर चालायचं नाहीनंतर एकदिवस मी भरपावसात अोथंबलेल्या अंगाने , वेशीवरच्या गढीत लपुन बसुन मग गाव सोडणारं अाख्खं -हाडं पाहिलंतिला पाहुन घरच्यांना वाटत असेल त्यांची पोरगी घरापासुन लांब चाल्ली म्हणुन रडतेयपण मला कळायची ना तिच्या अश्रुंची भाषा. ‘मी चाल्ले , तुझं कसं होणार अाता?’ हे अश्रु होते ते . देवा शप्पथ खोटं नाहीतेच होते ते . मग शिक्षण सोडलं ,घर सोडलंगाव सोडलंतिच्या गावी भटकलोती अाधी दिसायची अधे मधेअाता नंतर तिने पण सोडलं असावंबिचारी काय करणार नव-यासमोर चालत नसेल काही . “

मी चकित , “अजुनही तीची चुक नसावी म्हणताय ? तुम्ही रस्त्यावर अालात . अायुष्य फुकट गेलं तुमचं तिच्यापायी.  तरी तीची चुक नाही ?”

बाबा परत तसाच हसला  “जोडीदाराच्या चुका पदरात घालायचं वचन देतो ना अापणचुक-बरोबर माणसं नसतात हो . हि साली हरामी वेळ चुकीची असतेसमोरुन कुणी घाव घातला तर अापल्या माणसाला पुढे करायचं कि अापण तो घाव अापल्या छातीवर झेलायचा ? हे अापण अापलं ठेवायचं.  तसंच अाहे हे समोरुन निरोप नाही अाला तर अापण अाधी अापल्या माणसाला दोष द्यायचा कि त्याला सांभाळायचं ? “

बाबाने मी लिहलेलं पत्र पेटीत टाकलंमाझ़या डोक्यावरुन हात फिरवुन कडाकड माया मोडली अणि निघुन गेलाथोड्यावेळात एका पोस्टमन ने त्या पेटीतले सगळे पत्र पोचवण़यासाठी बाहेर काढलेमी बघतच होतोअाता माझ्या मनातला प्रवास त्या खाकी पिशवीत बसुन सुरु झाला.बाबाच्या गावाच्या पोस्टअॉफिसचं धुकं माझˇया भोवती जमल्यासारखा भास झालामी पिवळसर निंबाच्या पानांच्या पावसात कितीतरी वेळ नुसता बसुन होतो

 
 

Monday, February 1, 2016

वैजयंती

संध्याकाळी राईजवळच्या सगळ्यात गर्द झाडाखाली खुप दाटी होती. सगळे जण डोकावुन,वाकुन पहात होते. हे तेच झाड होतं…वैजयंतीच.

तीच वैजयंती जी तीच्या मैत्रिणीला,चांगुणाला म्हणायची “मला खात्री अाहे, शांत डोळे मिटुन अच्युताचे नामस्मरण करत,मी जेव्हा ठरवेन तेव्हा माझ्यातला अात्मा ह्या देहाला सोडु शकतो. हे जग मरण मरण ज्याला म्हणतं ते माझ्या मर्जीत अाहे. पण मी वाट पहातेय ‘त्या'ने माझ्याकडे एकदा फक्त बघायची. मग ह्या जन्माचं सार्थक झाल्यासारखंच अाहे.”  

वैजयंती माळरानच्या पलीकडल्या पाणवठ्यावर जातायेता लागणा-या गुलमोहराखाली नेहमी दिसायची. नीटंस नाकीडोळी, इवलीशी हनुवटी, पायात पैंजण, अशी इतर गोपिकांसारखीच दिसणारी ,किंवा त्यांच्यापेक्षा किंचीत डावीच अशी ,  हातावर नावाचं गोंदण असलेली ‘वैजयंती’.

रोज सकाळी सगळ्याजणी घोळक्या घोळक्याने गावातल्या चौकात रासचबुत-याजवळ थांबायच्या अाणि पाणी भरायला निघायच्या. गावातल्या गल्लीबोळांतुन वाट काढत , माळरान तुडवत सगळ्याजणी अाभाळात ढगांचे जत्थे विशिष्ट लयीत सरकावे तशा सवयीने पाण्याला निघतसे. गाव अोलांडल्यानंतर अाणि पाणवठ्याच्या अाधी गर्द अांबेराईतुन वाट जायची. तिथुन जातांना सगळ्यांचा वेग मंदावायचा तर काहींचा वेग भरभरायचा..त्याच कारणही तसंच होतं म्हणा. तरी एक साम्य मात्र सगऴयांच्यात असायचं ते म्हणजे सगळ्यांचे लाजुन लालबुंद झालेले गाल,  भिरभिर नजर अाणि कसल्याशा अनामिक हुरहुरीने धपापणारा ऊर,

गर्द राईच्या एखाद्या झुपक्यातुन अाधी ‘साट्’ अावाज यायचा मग पुढच्याच क्षणी ह्या गर्दीमधल्या एखाद्या हंड्यांला भिडायचा…’ठप्प् !’.जणू मधलं अंतर नव्हतंच त्या दगडाला ,इतका वेग. जिच्या डोक्यावरचे अाभाळ फुटायचे तिच्या अंगभर पाणीच पाणी. मग सुक्या असलेल्या सगळ्या जणी अोल्या पदराने तोंड दाबुन फिदीफिदी हसायच्या अाणि हि जिचा एव्हाना वा-यावर फरफरणारा पदर अाता अोला झाल्याने अंगभर चिकटला होता ,ती अाधी लाजायची पण नंतर लगेचच लटक्या रागाने बडबड सुरु करी,”मेला चेटक्या  ! एकतर दिसतही नाही” मग खालच्या अोल्या मातीतलाच एखादा दगड उचलुन जिथुन तिला लागलेला दगड अाला असावा अशा अंदाजाने दिशाहिनपणे नुसता भिरकावत असे. फार फार तर पंधरा पावलांवर तो दगड जाऊन पडायचा पण फेकणारीचा राग क्षणभर शांतावायचा. हवेने म्हणा किंवा अजुन कशाने, पण कुठलं तरी झाडं मग नुसतं सळसळायचं जणू ह्या पंधरा पावलांवर पडलेल्या दगडावर नुसतं हसायचं. त्यामुळे ती देखील अजुन चडफडायची. मग बाकीच्या सख्या तिला हाताला धरुन अोढुन न्यायच्या. ह्या सगऴया सख्यांना हे माहिती असायचं कि कुणातरी एक अाज भिजणार. म्हणुन घरात जितके हंडे पाणी लागणार त्यापेक्षा प्रत्येक जण एक हंडा सोबतीला जास्त घ्यायच्या. अाणि गाव लागायच्या अाधी वेशीजवळच भिजलेल्या गोपिकेला द्यायच्या. म्हणजे घरी गेल्यावर अोरडा नको. असं सगळं अगदी ठरल्याप्रमाणै ,खेळीमेळीने,समंजस त्रागा चालु असायचा. प्रत्येकी ७-७ वेळी भिजुन गेल्या तरी वैजयंती अजुनही कोरडीच होती. 

सगळ्या मैत्रिणी दिवसभरात कधीही भेटल्या तर ‘त्या’ दिवशी कनुने मला कसं अडवलं , ‘त्या’दिवशी केशाने कसं भिजवलं ह्याच्याच चर्चा रंगायच्या अाणि वैजयंती त्याच्यात मूक सहभागी व्हायची. ह्या गप्पांमध्ये सहभागी होता यावं म्हणुन वैजयंतीने एकदोन वेळा ‘पाण्याला जाण्याच्या वेळेच्या' खुप लौकर  जायचा प्रयत्न ही केला होता. म्हणजे पाण्यावरुन येतांना गावगल्ली सुरु होण्याच्या अाधीच्या वळणावर हाताल्या कड्याने टचकन् हंडा फोडायचा म्हणजे जाता येता सगळे बघुन विचारतील कि काय झालं,कसं झालं वगैरे.आणि वैजयंती लग्नात 'नाव घेताना' नववधु जितकी लाजेल तशी लाजत नाव सांगेल.हे सगळ्यांची तिने कितीतरीदा मनात उजळणी केली होती. पण एेनवेळेस ती डुचकी चांगुणा तिथे अाली होती. मग वैजयंतीचा हा बनाव पण विनापावसाच्या नुसत्या भरल्या अाभाळासारखा सरुन गेला. 

वैजयंती गुरांना चरायला पण नेतसे. मग सख्या राईजवळ अाल्या कि ती त्यांच्यात मिसळुन पुढे पाण्याला जात असे. ब-याचदा ती राईतल्या वेगवेगळ्या झाडापाशी रेंगाळत बसायची. सकाळी कधी कधी थकुन झाडाला टेकुन बसायची तेव्हा पायाजवळ हंडा अाणि खांद्याला काठी टेकवुन उभी ठेवलेली असायची तेव्हा दुरुन सुर्यडुबीच्या पार्श्वभुमीवर झाडाला टेकलेली तिची केवळ एक काळी अाकृती दिसायची. तेव्हा ती अगदी एकतारी घेऊन बसलेल्या जोगिणी सारखी भासायची.

सुर्यडुबीच्या अात घरी परतायची सगळ्या मुलींना घरातुन तंबी होती पण वैजयंती गुरांसोबत असल्याने तिला कधी कधी जर्राशी मुभा असायची.हो पण जराशीच. कधी कधी सावळ्याच्या तंद्रीत ती हरवुन जायची .भानावर अाली कि वेळ टळुन गेलेली असायची. मग घरी उशीर का झाला हि विचारणा झाली कि ‘हरवले होते’ इतकं कारण पुरेसं होतं. घरच्यांना तिच्या अावडत्या वासरा विषयीचा,वासंतीविषयीचा लळा माहिती होता.त्यांना वाटे हि म्हणतेय कि वासरु हरवले होते. अगदी त्याच वेळी गोठ्यातुन वासंती मान हलवुन ,घंटी किण्किणत नाही-नाही म्हणत असे पण वासरांची अन् पाखरांची हि असली भाषा फक्त वैजूलाच माहित होती. वैजू तुळशीजवळुनच डोळे वटारुन ‘श्श्श् !’ करुन वासंतीला दरडावायची.

तसं पाहिलं तर वैजयंतीची भिजण्याची तयारी खुप अाधी पासुन सुरु व्हायची.हो तयारीच. दररोज चुन्याने हंडा माखुन ती अाधी पांढरा लख्ख करतसे. नंतर त्यावर कधी काजळाने , कधी गेरुने , कधी हिरवी पानं वाटुन , कधी कोळशाने , कधी लाल जास्वंद चोळुन वेगवेगळ्या रंगाची नक्षी बनवत असे. अाणि सगळ्या गोपिकांमध्ये अापला हंडा सगऴयात अाकर्षक कसा दिसेल याची तयारी ती रोज संध्याकाळी पाण्यावरुन हिरमुसुन अाली कि करतसे. हंडा नक्षीदार करतांना तिची मनातल्या मनात बडबड चालु असायची ,” अाज त्या कौशीचा हंडा फोडला , परवा गौराचा, मागे मंगलाचा, त्याअाधी एकदा लक्षीचा, त्याअाधी…..सगळे सगळे झाले पण माझा ना कधी हंडा फुटला ,ना कधी माधोने अडवलं. एकदा तर चांगुणाची मटकी लागोपाठ दोनदा फुटली. ती पण अशी कि चांगुणाला समोरुन पत्थर येताना दिसला अाणि तो मागे जाणार ह्याचा अंदाज येताच चांगुणा जराशी तिरपी झाली अाणि स्वत:हुन तो पत्थर स्वत:च्या हंड्यावर झेलुन घेतला. 

एकदा वैजयंतीने ज्वर असल्याचं नाटक करुन घरीच थांबुन घेतलं अाणि त्या दिवशी लपुन शुभ्र पांढ-या हंड्यावर रानफुल चोळुन असा काही किरमिजी रंग तयार केला कि सगऴयांचे डोळे विस्फारले. जिवघेण्या मोरपीसाचे चित्र बनवले होते तिने हंड्यावर. रस्त्याने जाताना चौकाचौकात, नाक्यानाक्यावर लोक तिला थांबवत होते. काहीजण वळुन वळुन पहात होते. एकजण तर वळुन पाहतांना वाटेत बसलेल्या कुंकमभांडारावाल्याच्या टोपलीत तोल जाऊन लाल झाला. तेव्हा चिडलेला कुंकुमभांडारवाला अाणि लालबुंद गृहस्थ सोडुन सगळं वृंदावन हसुन बेभान झालं होतं. नेहमी सारख्या सगळ्याजणी रांगेने राईजवळुन जाऊ लागल्या. पाऊल पाऊल नदीत उतरत गळाभर पाण्याशी उभं राहिल्यावर जसा श्वास भरुन रहातो तशा सगळ्याजणी उर भरुन श्वास घेत होत्या…..ह्या अनामिक चैतन्याने कि कधीही हंडाफुटीची वेळ येईल. सगऴयांनाच अाज असं वाटत होतं कि अाज वैजयंतीच भिजणार. सगळ्यांच्यात इतकी उठून जी दिसत होती. पण सावळ्याने नेम धरला तो कावेरीवर. हिरमुसुन हंडा तसाच  टाकुन वैजयंतीने घराकडे उरफुटी धाव घेतली. अाणि घरी बसुन  रडत राहिली. दोन दिवस. शेवटी सख्यांनी खुप मनवल्यावर ती तिस-यादिवशी उठली. अाणि अायुष्यात पहिल्यादाच वैजयंतीच्या कटीवर अाणि डोक्यावर बिननक्षीचा हंडा होता. सगऴयांच्या डोळ्यांना तिच्याकडे पाहिलं कि चुकचुकल्या सारखं वाटावं इतकी सवय झाली होती तिच्या नक्षीदार हंड्याची. सगळ्या सख्यांनी पाणी भरलं अाणि त्या परतीला निघाल्या तितक्यात “ साट्” अावाज अाला अाणि पुढच्या क्षणी वैजयंती नखशिखांत भिजलेली होती. वैजयंतीच्या मुखातुन “कान्हा !” अस्फुट स्वर उमटले.

कान्हाचं लक्ष वेधण्यासाठी रोज नक्षीदार हंडे बनवणा-या वैजयंतीला अखेर साध्या हंड्याने भिजवलं. जणू देवकीनंदन सांगु पहात होता कि देखावा म्हणुन केलेल्या भक्तीपेक्षा त्याला साधंसरळ मिटल्या डोळ्यांचं मनस्वी नामस्मरण मला अधीक प्रिय अाहे.

नंतर काही दिवस इतर सख्यासारखीच नित्यनियमाने वैजयंती भिजत राहिली.

एकदा संध्याकाळी राईजवळच्या सगळ्यात गर्द झाडाखाली खुप दाटी होती. सगळे जण डोकावुन,वाकुन पहात होते. हे तेच झाड होतं…वैजयंतीच. गर्दीत विचारणा होत होती कि नेमकं काय झालं वैजयंतीला ? तेव्हा चांगुणा म्हणाली “ काहीच नाही ! मी तिलाच शोधायला घरी अाणि मग पाण्याजवळ गेले तर हि इथे बसली होती” कुणीतरी म्हणालं , “ अगं हो पण तू तिला का शोधत होतीस? काय सांगितलं तू तिला? ” 

चांगुणा म्हणाली ,” मी तर तिला हेच सांगितलं कि मला अात्ताच महालातल्या दासी कडुन कळालं कि श्रीकृष्ण नुकतेच स्नानादिक अाटोपुन अाले होते अाणि तयार होतांना समोरच्या तबकात मोरपिस,मोत्यांची माळ, तुळशीची माळ असा त्याचा नेहमीचा साज होता. त्यांचा सेवक एकएक करुन त्यांना साज देत होता तेव्हा ते तुळशीमाळे कडे बोट दाखवुन म्हणाले कि ‘ ती वैजयंतीमाळ’ द्या घालायला.

सगळे म्हणाले “ मग?

चांगुणा म्हणाली,” मग ? मग काहीच नाही . वैजू ने ते एेकुन डोळे झाकले ते शेवटचेच……"


- प्राजक्त २ फेब २०१६ 
१:५७ am


Friday, January 22, 2016

सणवार

पुर्वी कसं होतं जानेवारीच्या दुस-या तिस-या दिवशी कॅलेंडर घरी यायचं . मग नंतरचा अर्धापाऊण तास लाल तारखा शोधण्यात जायचा. त्यात रविवारला जोडुन आलेल्या लाल तारखा किती ह्याची मोजदाद वेगळी .लाल तारखांसोबत सणावारांची मनातल्या मनात उजळणी व्हायची. जानेवारीत प्रजासत्ताकाच्या वक्तृत्व स्पर्धेत यंदा कोणत्या महापुरुषावर बोलायचं ? मग कोणालाच माहीत नाही असे महापुरुषांचा शोध सुरु व्हायचा. फेब्रुवारी मध्ये हसु यायचं कि लोक परत कार्य विसरुन ह्या प्रश्नात पडतील कि महाराजांचा जन्म तारखेनुसार कि तिथीनुसार ? मार्चमध्ये होळीला कोणाच्या नावे बोंबामारायच्या? रंगपंचमीला कोणता रंग शोंधायचा जो दहा दा अंग घासुन जाणार नाही आणि गेला तरी कानात दडुन राहील. एप्रिलचं पान आलं कि पाडव्यात पलिकडे गोदाक्काचा अंगणातला अांबा मनात तरळून जायचा.... आंबेतोरणासाठी. मग अाज जसे मेच्या पहिल्याच दिवशी टिव्हीवर मराठी भाषामागे का ह्याविषयी ‘टॉक शो’ लागतात तसे त्यावेळी शाळेत याच विषयी वादविवाद स्पर्धा व्हायच्या. स्वातंत्र्य अाणि प्रजासत्ताक दिनी वक्तृत्व स्पर्धा अाणि महाराष्ट्र दिनी ‘वादविवाद’ स्पर्धा ही परंपरा सगळ्याच शाळांनी जोपासली होती. ७ जुन हि तारीख कधीच लाल नसायची पण नेहमी लाल दिसायची ती भूगोलातल्या धड्यातमधल्या एका अोळीमुळे ‘भारतात मान्सुनची सुरवात ७ जुन तारखेला होते’. कॅलेंडरवरजुलैचं पान अालं कि शाळेतले मित्र जुम्म्या, ममद्या कडे रमजानाची ईदी ठरलेली. अाणि अाषाढवारीला वाटेत अामचं घर येतं म्हणुन अाजोबांचा एकदिवस मुक्काम पडायचा.अाजोबा झोपतांना अांथरुणाची वळकटी पसरवुन झोपायचे तेव्हा डोक्याजवळ विठ्ठलाची काळीभोर मुर्ती ठेवायची. लहानचे मोठे झालो , नंतर पंढरपुरी कितेक चक्रा झाल्या पण पांडुरंग नावाचा उल्लेख जरी झाला तरी अजुनही डोळ्यासमोर अाकृती येते ती ‘तीच'
अॉगस्ट अाला कि नेहमी कला मास्तरांनी एकदा सांगितलेल्या रोमन कथेतला अॉगस्टस राजाचा पुसट उल्लेख अाठवतो. रक्षाबंधनच्या लालखुणेत राखीच्या सोनेरी कागदाखालचा लाल स्पंज दिसायचा.सप्टेंबरात , पोळ्याला यंदा तरी अाईला मातीचे मोठ्ठाले बैल घ्यायला मनवु असा चंग बांधायचो. गणपतीचे दहा दिवस त्यात जेष्ठा-कनिष्ठासोबत संपुर्ण घराण्याचा गोतावळा यायचा ती जणू दुसरी दिवाळीच.
अॉक्टोबर-नोव्हेंबर महीन्याचं पान आलं कि दिवाळीत यंदा कोणता किल्ला ? नेहमीपैकी एखादा कि नवीन आपल्याच सुपीक डोक्यातुन घडवावा एखादा किल्ला ? डिसेंबरात पलिकडच्या दत्त देवळातली पहाटेची लगबग दिसायची अाणि नाताळाच्या लाल टोप्या दिसायच्या त्या लाल खुणेत. अाणि ह्या सगळ्याची यादी अाम्ही वहिच्या शेवटच्या पुठ्ठ्यावर शेवटच्या बाकावर बसुन करायचो. 
पुर्वी सणांसाठी सुट्ट्या यायच्या . अाताशा सुट्टी येते फक्त. 

- प्राजक्त


Thursday, January 7, 2016

बॅकबेंचर्स २५ जिप्सी ( दै सामना ९ जानेवारी १६)

"हि मागची पोरं म्हणजे निव्वळ भटकी जिप्सी ,अभ्यास नको यांना " हा नेहमीचा अपमान नंतर अाम्हाला हळुहळु अपमान वाटेनासा झाला.
शाळा नेमकी कधी सुरु झाली ह्याचा मागोवा घेतला तर प्रत्येकाचं कागदी विमान एका गाण्याच्या झाडावर येऊन अडकेल किंवा विसावेल ते गाणं म्हणजे "सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल का ?" शनिवारची संध्याकाळ असो , गणिताच्या पेपरच्या अादला दिवस असो , उन्हाळ्याच्या /दिवाळीच्या सुट्टीचा शेवटचा दिवस असो ..ह्या दिवसांत राष्ट्रगीत म्हणावं तसं शाळेत असतांना काहीतरी जादू व्हावी अाणि उद्या शाळा नसावी हि इच्छा व्यक्त करायला अाम्ही मुलं कर्कश अावाजात ढगातल्या देवाला एेकु जावं अशा अार्ततेने "सांग सांग भोलानाथ , पाऊस पडेल का ?' गायचो.

 " बरंका, भाषेच्या चर्‍हाटाला , कधीही अंत नसतो  | सारखी बडबड करणारा , चुकूनही संत नसतो || " असं अामचे मास्तर वर्गातल्या मागच्या रांगेकडे डोळे वटारुन म्हणायचे. पण हि बडबड 'चिऊताई चिऊताई दार उघड कविता शिकवतांना एकदम शांत होती हे अावर्जुन अाठवतं. त्या दिवशी घरी गेलो तेव्हा दार वाजवतांना 'अाई अालोय ग' असं सवयीने बोंबलण्याच्याएेवजी 'चिऊताई चिऊताई दार उघड' असं घशाची निळसर शीर टपटपेपर्यत अोरडल्याचंही अाठवतं. 
लहान असतांना मी रुसुन बसल्यावर माझी समजुत काढतांना हळुहळु अावाजात अाणि नंतर वेग अाणि स्वर वाढवत ,दबक्या पावलांनी येत वडिल 'टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले' म्हणत गुदगुल्या करायचे. त्यात 'प्राजक्ताची फुssssले' याच्यावर त्यांचा विशेष जोर असायचा.
 मागच्या बाकासहित सगऴयाच बुडत्यांना चाचणी निकालच्या नंतर ' मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं?  । कोकीळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं ? । तुलना करित बसायचं नसतं  , प्रत्येकाचं वेगळेपण असतं !' असं सांगणा-या मास्तरिण बाईंच्या चेह-याच रेष न रेष दिसते.  सकाळी सकाळी जेव्हा  अंगावरचं पांघरुण काढुन 'चला शाळेची वेळ होईल घाई करा , उठा ! ' असा हुकूम व्हायचा तेव्हा शेवटचे पाच मिनीटाची अधाशी झोप उपभोगतांना ' हो उठलेलोच अाहे' अाणि 'प्रत्यक्ष उठणे' ह्या दोघांच्या मधल्यावेळेत हाॅलमधुन रेडिअोतुन "दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचुन झुलायचेsss " हे एेकु यायचं तेव्हा वाटायचं उजाडलंय' कधी रविवारी दुपारीची झोप रेडिअोच्याच ' डोळ्यात सांजवेळी, आणू नकोस पाणी । त्या दूरच्या दिव्यांना, सांगू नको कहाणी ' ह्या स्वरांनी चळावायची.
शाळेतल्या हाफ चड्डया फुल झाल्या अाणि 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' ह्या अोळींनी भाबड्या जिवाला अाजुबाजुची हिरवळ बघायची हिम्मत अाली. हिम्मत फळाला नाही लागली तेव्हा 'भातुकलीच्या खेळामधले राजा अाणिक राणी' ने अाधार दिला.
मरण्यावरही शतदा प्रेम करायला लावणारा हा 'अानंदयात्री' जो नकळत्या वयापासुन नेहमीच जवळ होता तो 'गेला' तेव्हा अचानक मागच्या बाकावरची माझ्या शेजारची जागा कायमची अोकीबोकी झाल्या सारखं वाटलं. अाम्हा जिप्सीच्या टोळक्यातुन एक जिप्सी उठुन निघुन गेला.

- प्राजक्त 

Friday, January 1, 2016

रुक्माईच्या सावलीत : मटा मैफल २ जानेवारी १६

" किती ही काम येऊ , माझ्याच्यानं उरकतं नीट व्यवस्थित. आषाढाला तर केवढी लेकरं येतात! , एकपण जेवल्या बिगर जात नाही. तसंही रायांना पण आवडणार नाई कुणी उपाशी पोटी माघारी गेलं तर" अठ्ठावीस युगांच्या अनुभवामुळे जरास्सं रापलेलं विस्तिर्ण कपाळ, कपाळी रुपया शिक्क्या इतकं भलं मोठं कुंकू , त्यावर ठसठशीत तीन रेषा. पांढ-या केसांवर विसावलेला पदर, ठराविक वेळेनंतर डोक्यावरचं पदर सारखा करण्याची लकब अाणि पदर सारखा करतांना येणा-या बांगड्यांची किण्किण सावरत रूक्माई बोलत होती.

झालं असं कि पंढरीत गेलो तेव्हा नेहमीची वाट मोडुन आधी रुख्मायकडे गेलो. दिंडीरवनातुन रुक्मीणी रुसुन आली आणि लखुबाई झाली. मग लखुबाईला कुणी रुख्माई म्हणेल, कुणी रखुमाई, कुणी रुक्मीणीच. शांत बसुन राहीलो. वेळ कसा गेला कळालं नाही. भान आलं तेव्हा दर्शन वेळ संपुन  मंदिर दरवाजे बंद झाले होते. मी डावीकडच्या कोप-यातल्या मिठीभर मोठ्या दगडी खांबा पल्याड असल्याने कोणाला दिसलो नाही. थोडं इकडे तिकडे वाट शोधून शेवटी मी गाभा-यात शिरलो. तिथे जास्त आश्वस्थ ,शांत वाटायला लागलं मग विचार आला इथेच पडी टाकु आणि पहाटे काकडा आटोपून परतीला निघु. 

झोपण्याआधी परवानगी घ्यावी म्हणुन म्हटलं " रखुमाई , आज रात्रीपुरती विठ्ठल होती का? म्हणजे झोपायला आजचा आसरा देती का ?" माई म्हणाली ," वा रे लेका ! आसरा देणार मी आणि तरी 'विठ्ठल होता का?' विचारुन शेवटी सगळं पुण्य त्यांच्या खात्यात ना ? लई शाहजोग झालाय हो तू " मी  म्हणालो " तसं नाही आई , आपली एक पद्धत म्हणुन बोललो ग " मग ती 'गम्मत केली रे' अशा अर्थाने डोळे मिचकावत डोकीपदर सारखा करत हसली. तिथेच कोप-यात घोंगडी आंथरुन देत म्हणाली " हां , तू पड इथं. संकोचु नको .तो वर मी काहीतरी खायचं पाहते तुझं" मला भूक लागलीय हे तिला कसं कळालं वगैरे असले फालतू प्रश्न मला पडले नाही. पण जे प्रश्न पडले होते ते तिच्या नजरेतून सुटले नाही. ती पीठ मळत म्हणाली 'हां बोल बोल ...कशाला अडखळलाय? " 
मी विचारलं "माई, फोटो,ग्रंथ-गाथा,आख्यायिका-भजनात सगळीकडे विठ्ठल-रुख्माई असंच ऐकलं - वाचलंय पण पंढरीत तुम्ही वेगळाले का? "

" बाईईई..., एवढ्याशा जीवाला पेच किती रे ?  डोक्यात इतक्या बाभळी ठेऊ नये. चल ,आधी जेवून घे" असं म्हणत रुख्माई चुलीत निखारे फुंकत आणि पुनव-अवस,पुनव-अवस करत भाक-या आलथ्या पालथ्या करत बोलायला लागली . " इतक्या वेळ डोक्यात बाभळ ठेउ नये. पिकेस्तोवर काटा पायात ठेउ नये. बघं कसंय थोडं चिडले होते त्यांच्या वर एकदा उगा. म्हणुन तडक रुसुन मागे जाऊन बसले. खरं सांगु का हे रुसणं-बिसणं निमित्त होतं .खरं माझ्या डोक्यात होतं कि कृष्ण जन्माच्या वेळी मी रुक्मीणी होते पण जगात नाव त्या राधीचंच झालं. मनात सुप्त इच्छा होती कि असं प्राकृतपेक्षा नावारुपाने युगानुयुगं राया सोबत नाव जोडुन पहावं.भले मग लांब राहु पण जसं राधाकृष्ण आहे तसं विठ्ठोबा-रखुमाई पाहु. मग तसं झालंही . पण तुला सांगते आपल्याला चांदण्यांचं अप्रुप पण त्यासाठी आभाळाला अंधार भोगावा लागतो तसंय हे. माझ्या वाटेला नावासकट जगणं अालं पण ती राधी काय भोगत असेल तिची तिच जाणो. मी मागे बसुन सगळं बघत असते. हेऽऽ गर्दीचे लोट पंढरीरायांच्या मागच्या दरवाजातुन माझ्या दारी येतात . त्याच्या चेह-यावरचं भारावलंपण लपत नाही. माझ्यासमोर येऊनही त्यांचं रुप पाहिल्याचा आनंद त्यांच्या चेह-यांवर दिसतो मला. 'तिथं' गेलं कि भारावणं अालंच मग तो निळसर कान्हा असो कि काळा विठू. कधी कधी हेच वैष्णव लोक भजनात दंग होऊन तल्लीन होतात अाणि नाचु लागतात तेव्हा त्या गर्दीत कोणाच्या तरी मागे येऊन विठुराया डोकावुन गेल्याचा भास होतो . नाचता नाचता कंबरेवर हात ठेऊन उंच उड्या मारत 'ठ्ठला ईठ्ठला' ह्या तालावर नाचणारे बालगोपाल पाहिले कि डोळ्यासमोर सहस्त्र पांडुरंग असल्याचा भास होतो. भास ? " मी म्हणालो " पण माई , देवाला राग,लोभ नसतो ना मग तू तरी चिडली कशी ?" " रुख्माई हसली म्हणाली , दैवबिव वलंय सारुन बरं का चिडता येतं , अंतर असलं तरच अावेगाने भिडता येतं. दोन बोटांमध्ये अंतर अाहे म्हणुन सख्याची बोटं त्यात मावतात अाणि एकवेळ सांधता येते हे द्वापारयुगात शिकवलंय यांनीच मला . आणि तेव्हा शिकले ही बरंच . वारक-यांची भरल्या डोळ्यांची गर्दी माझ्या समोर येते.तेव्हा त्याच्या भारावल्या डोळ्यात त्यांनी अात्ताच पाहुन अालेला पांडुरंग तरळत राहतो. मग मी बुचकाळ्यात पडते. कारण त्यांच्या डोळ्यात जर पांडुरंग दिसतो तर मी म्हणजे पांडुरंग कि पांडुरंग म्हणजे मी? मग मी उभ्या उभ्या पायच्या अंगठ्याने खाली वीट चपापते. वीट असली तर ? पण इतक्या वर्षात ठिसुळ झालेली वीट आता असेल नसेल ?   मग वैष्णवांनी टेकवलेलं डोकं उचलंल कि मी त्याच्या डोळ्यातले सावळे ढग पाहुन मनोमन त्याच्या पाया पडते.हे  असं सगळं समाधान लाभतं आणि  असा सगळा त्रासही..." 

जेवणखान आटोपत हात धुवून निवांत बसतांना मी म्हटलं " आई ? जर द्वापारवेळी इतका त्रास झाला होता तर आता पुन्हा त्यालाच का निवडावं ग तू  ? " 

रुख्माई म्हणाली " पुन्हा ? पुन्हा वगैरे असं काही नसतं रे. पारिजातकाच्या खाली बसल्यावर हि ओंजळीत फुलं पडणार आणि झाडाखाली बसलेला नसाल तरी वा-याचा झुळूकेने ते ओंजळीत येणारंच. एकदा झोकुन द्यायचं म्हटलं कि तीर काय आणि तळ काय. 
मुकामार 'निळा'शार निबर होत 'काळा' होतो. "
 इतकंच.

-प्राजक्त देशमुख




बॅकबेंचर्स : २४ कोलाज ( सामना २/०१/१६)

रात्री मोकळ्या अाकाशाखाली पहुडलो अमावस्या होती.दुख:अाणि अमावस्या जास्त काळ टिकत नाही मास्तर म्हणायचे. टिकत वरुन अाठवलं , त्याच्या अारशाला टिकली लावलेली अाहे ती त्याने काढली नाही कधीच तिची अाठवण म्हणुन राहु दिली अाहे. अारशावरुन अाठवलं, अाताशा बाजारात पुर्वी सारखे हसतमुख अारसे मिळत नाही म्हणे ? बाजारावरुन अाठवलं , सगळ्याचाच बाजार मांडलाय अाजकाल ...मैत्रीचा,भावनेचा, नात्यांचा सगळाच. नात्यांवरुन अाठवलं, परवा जाॅगिंग ट्रॅकवर एक भणंग माणुस दिसला शुन्यात नजर लावुन बसला होता. कुणीतरी म्हणे तो जिच्यासाठी इथे अाला ती कधीच त्याची नव्हतीच. जॉगिंग ट्रॅक वरुन अाठवलं , अाजकाल सगळेच पळताय कशाचा तरी मागे ,काही तरी शोधायला ,काही तरी पकडायला , कोणापासुन तरी लांब जायला पण पळताय फक्त. कुठे जायचं माहित नाही पण डोक्यात एकच मंत्र घुमत असावा त्यांच्या कि पळत रहा. मंत्रावरुन अाठवलं अामचे एक सर होते त्यांनी एक मंत्र दिला होता " हा हि काळ निघुन जाईल" हा मंत्र लिहुन ठेवा असं म्हणायचे ते अाणि अति दु:खात असला किंवा अति अानंदाच्या माजात असला कि हा मंत्र एकदा वाचा असं ते सांगायचे. मी त्याला महामृत्यंजय मंत्र म्हणायचो. दु:खावरुन अाठवलं. राधेचं पुढे काय झालं हे शोधता येईल , कृष्णाचं काय झालं हे माहितीच अाहे पण अनय पुढे काय झालं हे कुणी शोधलंय का ? त्याचं दु:ख मोठ कि त्याचं सुख? कृष्णावरुन अाठवलं , काल मुर्तीवाल्याची एक हातगाडी रस्त्यावरुन जात होती सगळ्या मुर्त्यांवर कपडा टाकुन ठेवला होता , कदाचित गोडवुन मधुन दुकानात नेत असावा तो. त्यात नाक्यावरल्या कृष्णाच्या देवळासमोरुन जातांना त्याला एक दगड दिसला नाही अाणि हातगाडी किंचीत वरखाली झाली तेव्हा मीरेच्या मुर्तीच्या हातातली एकतारी खाली पडली.ती त्याला दिसली नाही मला दिसली. अंगावर काटा अाला ती एकतारी मी कृष्णाच्या देवळात नेउन ठेवली तेव्हा कृष्णाच्या डोक्यावरचं जास्वंदीच फुल वारा वाहत नसतांना खाली पडलं. जास्वंदीवरुन अाठवलं एका मित्राचा घराबाहेर खुप जास्वंद लावलेले होते ,त्याला जास्वंद खुप अावडायचा .इतका त्याच्या त्या घराचं नाव पण जास्वंदच होतं. पण जेव्हा मला कळालं कि जास्वंद लावायला त्याने तिथला खुप अाधीपासुनचा बहरलेला गुलमोहर तोडला तेव्हापासुन मी त्याच्या घरी जाणं कमी केलं.गुलमोहर वरुन अाठवलं यंदा ऊन जास्त होतं त्यामुळे गुलमोहराची सावली जास्त थंड जाणवायची त्या झाडाखाली. भगभगत्या उन्हामुळे अचानक झाडाने पेट घेतल्यासारखा दिसतो मला गुलमोहर नेहमी. भगभगण्या वरुन अाठवलं, राणी पद्मिनीने चित्तोडगडात सोळा हजार रजपुत सख्यांसोबत जौहर केला होता तेव्हा त्या तडतडत्या अग्निशिखांमध्ये भगभगतांना कुणी चित्कारही काढला नव्हता. राणी पद्मिनीवरुन अाठवलं अाता प्रत्येकीने जौहर पेटावावा पण त्यांना त्रास देणा-याला त्यात ढकलण्यासाठी स्वत: जळुन जाण्यासाठी नाही. ढकलण्यावरुन अाठवलं मला अाठवी मधुन नववीत ढकलं होतं तेव्हा मास्तरीण बाई म्हणाल्या होत्या अाता तरी अाभ्यास करशील ना रे ? मी तुझ्याघरी नाही सांगणार हं . त्यांचा मुलाने मागच्याच महिन्यात नापास व्हायच्या भितीने अात्महत्या केली हे मला नंतर कळालं. नापास वरुन अाठवलं  पुढच्या अाणि मधल्या बेंचवरचे अभ्यासात पुढे असतात म्हणुन अायुष्यात पण पुढे असतात पण मागच्या बेंचवरचे अभ्यासात जरी मागे असले तरी अायुष्यात मागे कधीच नसतात.



अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...