त्यावेळी असं होतं की सगळे ऋतु जागच्या जागी होते. म्हणजे अाता सारखं पावसाळ्यात भक्कं ऊन पडायचं नाही. हिवाळ्यात पाऊसाची सर यायची नाही.उन्हाळ्यात अाता सारख्या गारा पडत नव्हत्या.( गारांवरुन बिचा-या मराठवाड्यासारख्या ठिकाणचं वाईट वाटतं. देवही काय अवलिया म्हणावा तो तिकडे एकतर गारा देतो किंवा दुष्काळ. साला पाऊस काही देत नाही.)
तर पलंगाची गादी उचलुन खालच्या कप्प्यातुन स्वेटरचे गाठोडे निघायचे. मग दुस-या दिवशी ते सगळे स्वेटर धुतलेले असायचे. अाणि दोरीवर हिवाळ्याची चाहुल वाळत घातलेली असायची. मोजुन ७ जुनला पाऊसराया हजर व्हायचा. अाणि परिक्षेची सट्टी गावाकडचे वेध उन्हाळा घेउन यायचा.त्यावेळी सगळं सुरळीत होतं.पोस्ट्या पत्र वाटायचा. खाकी पत्रात माणसं दिसायची. कोणत्याही लाल डब्ब्याच्या बसमध्ये बसलं की ती अाजोळी ,गावाकडे नेऊन घालेल असं वाटायचं. तार अाली की धडकी भरायची. अाता सारखे मिस वैगेरे कॉल्स नसायचे. असायचे तर फक्त ट्रंककॉल. मग अाजोळी गेलं की शेत हिरवंगार असायचं. कोळशाच्या बंबातुन पाणी तापायचं. पांढरीशुभ्र टुथपेस्ट अाणली असेल तरी गंमत म्हणुन अाजीची काळी दंतमंजन वापरायची. मग गोठ्यात शेळ्या-बैलं-गाई अाणि मोत्या सोबत उरलेला सबंध दिवस मावळायचा.
अशाच एका सुट्टीतली गोष्ट. जेव्हा गावी पोचलो तेव्हा वेशी वरच्या मारुतीच्या कपाळी अाठ्या असल्यागत सगळ्या लोकांच्या घोळक्यातल्या चर्चा तंग वाटल्या. अाणि घरी पोचलो तर गोठ्यातल्या शेळ्यासुद्धा कमी दिसल्या. मग जसा जसा दिवस जात गेला तसं कळालं की रात्रीचा म्हणे 'जनावर येतं' गावात (म्हणजेच वाघं येतो) अाणि शेळ्या-बक-यांना मानगुटीला धरुन रक्त पितो. मग लोक हताशपणे दुस-या दिवशी ते मृत -अर्धवट फाडलेल्या शेळ्यांचे देह फेकुन द्यायचे अाणि नंतर रात्रीतुन ते तिथुन सुद्धा नाहीसे व्हायचे. अशी चर्चा होती की जवळच्याच जंगलातुन दोन वाघ येतात म्हणे. हे तेव्हा कळालं जेव्हा वनविभागाने एकच वाघ पकडला अाणि थोडे दिवस सर्व सुरळीत असल्याचा भास झाला अाणि पुन्हा एका अाठवड्यानंतर परत तोच खेळ सुरु झाला. रात्री सबंध घरदार अंगणात जेवतांना चर्चा रंगली की अाता काय ? उरले होते दोन शेळ्या . त्यात एक होती माझी गोंदी . म्हणजे जन्मापासुन त्या कोकराच्या कपाळावर तीन ठिपके होते. अाजीच्या सुरकुतल्या हनुवटीवर होते तसे ठिपके. माडीवर एकदा जुने फोटो काढुन चाळत बसलो तेव्हा तरुणपणीच्या अाजीच्या हनुवटीवर दिसले . तेव्हानंतर निरखुन पाहिल्या वर एकदा सुरकुत्यांमध्ये दडलेले दिसले होते. अाणकी एक गावातलाच दोस्त होता नुकता नुकता दहावीत गेला असेल तेव्हा एकदा त्याची अावडतीची मुलगी दाखवत म्हणाला होता " ती लाल रिबीनीची पाहिली दिसतेय का ? तीच अाहे 'माझीवाली' . मी सहज विचारलं " तुझीवाली म्हणजे सगळं दोन्हीबाजुंनी पक्कं झालंय तर". तर तो म्हणतो कसा "फक्त इकडेच लागलीय रे अाग . पोचेल तिकडे पण पोचेल. तुला सांगतो तिच्या हनुवटीवरचे ते तीन गोंदलेले ठिपके म्हणजे अाकाशातला 'समर ट्रॅंगल' अाहे रे गड्या.( नंतर अंगणात झोपल्यावर त्या खगोलशास्त्री विभुतीने अकिला ,सायग्नस अाणि लायरा असे तिन तारे दाखवुन समर ट्रेंगल कशाला म्हणतात ते सांगितलं.) "
तर ते ठिपके पण ह्या माऊलीने कसे पाहिले तर त्याचा मित्राची गिरणी होती पिठाची. तिथे मित्राच्या जागी हा उभा राहिला 'पांढरा विठ्ठल' बनुन अाणि मग ह्याने तो ट्रेंगल पाहिला.
तर असा हा गोंदलेल्या ठिपक्यांचा प्रवास मला त्या कोकराच्या कपाळी दिसला म्हणुन मी तिला नाव दिलं 'गोंदी'. पुढची रात्र गेली अाणि शेकोटी,अाग , मशालींचे प्रयत्न वाया घालवंत एक शेळी परत फस्त करुन उरली फक्त माझी गोंदी. वनविभागाचे लोक यायला एक दिवस अजुन होता अाणि अाणखी एक रात्र कशीही करुन गोंदीला कसं जगवायचं हा खल पुन्हा सुरू झाला.
शेवटी असं ठरलं की घरासभोती खड्डा करुन सापळा राचायचा अाणि गोंदी च्या सभोती सर्व पुरुष मंडळींनी लाठ्या-काठ्या अाणि मशाली पेटवतं गोलाकारात झोपायचं म्हणजे वाघ लांबुनच निघुन जाईल.
अाता मध्यभागी गोंदीला बांधुन ठरल्याप्रमाणे सगळे अाजुबाजुला झोपले. मी ही जरावेळ गप्पांमध्ये लहान श्रोता म्हणुन सहभागी होतो. मग अाजोबाने तीच वाघासाठीची काठी माझ्यावर उगारल्याने माझा बाहेर झोपण्यात खोडा पडला.
त्या दिवशी मला लौकरच जाग अाली अाणि अगदी सकाळी मी पहिले धावत अंगणात गेलो. दुरुन सर्व झोपलेले दिसत होते अाणि मध्ये गोंदी सुद्धा झोपलेली दिसली तेव्हा मनात हायसं वाटलं. मी घाईने सगळ्यांना उठवलं.
तर पलंगाची गादी उचलुन खालच्या कप्प्यातुन स्वेटरचे गाठोडे निघायचे. मग दुस-या दिवशी ते सगळे स्वेटर धुतलेले असायचे. अाणि दोरीवर हिवाळ्याची चाहुल वाळत घातलेली असायची. मोजुन ७ जुनला पाऊसराया हजर व्हायचा. अाणि परिक्षेची सट्टी गावाकडचे वेध उन्हाळा घेउन यायचा.त्यावेळी सगळं सुरळीत होतं.पोस्ट्या पत्र वाटायचा. खाकी पत्रात माणसं दिसायची. कोणत्याही लाल डब्ब्याच्या बसमध्ये बसलं की ती अाजोळी ,गावाकडे नेऊन घालेल असं वाटायचं. तार अाली की धडकी भरायची. अाता सारखे मिस वैगेरे कॉल्स नसायचे. असायचे तर फक्त ट्रंककॉल. मग अाजोळी गेलं की शेत हिरवंगार असायचं. कोळशाच्या बंबातुन पाणी तापायचं. पांढरीशुभ्र टुथपेस्ट अाणली असेल तरी गंमत म्हणुन अाजीची काळी दंतमंजन वापरायची. मग गोठ्यात शेळ्या-बैलं-गाई अाणि मोत्या सोबत उरलेला सबंध दिवस मावळायचा.
अशाच एका सुट्टीतली गोष्ट. जेव्हा गावी पोचलो तेव्हा वेशी वरच्या मारुतीच्या कपाळी अाठ्या असल्यागत सगळ्या लोकांच्या घोळक्यातल्या चर्चा तंग वाटल्या. अाणि घरी पोचलो तर गोठ्यातल्या शेळ्यासुद्धा कमी दिसल्या. मग जसा जसा दिवस जात गेला तसं कळालं की रात्रीचा म्हणे 'जनावर येतं' गावात (म्हणजेच वाघं येतो) अाणि शेळ्या-बक-यांना मानगुटीला धरुन रक्त पितो. मग लोक हताशपणे दुस-या दिवशी ते मृत -अर्धवट फाडलेल्या शेळ्यांचे देह फेकुन द्यायचे अाणि नंतर रात्रीतुन ते तिथुन सुद्धा नाहीसे व्हायचे. अशी चर्चा होती की जवळच्याच जंगलातुन दोन वाघ येतात म्हणे. हे तेव्हा कळालं जेव्हा वनविभागाने एकच वाघ पकडला अाणि थोडे दिवस सर्व सुरळीत असल्याचा भास झाला अाणि पुन्हा एका अाठवड्यानंतर परत तोच खेळ सुरु झाला. रात्री सबंध घरदार अंगणात जेवतांना चर्चा रंगली की अाता काय ? उरले होते दोन शेळ्या . त्यात एक होती माझी गोंदी . म्हणजे जन्मापासुन त्या कोकराच्या कपाळावर तीन ठिपके होते. अाजीच्या सुरकुतल्या हनुवटीवर होते तसे ठिपके. माडीवर एकदा जुने फोटो काढुन चाळत बसलो तेव्हा तरुणपणीच्या अाजीच्या हनुवटीवर दिसले . तेव्हानंतर निरखुन पाहिल्या वर एकदा सुरकुत्यांमध्ये दडलेले दिसले होते. अाणकी एक गावातलाच दोस्त होता नुकता नुकता दहावीत गेला असेल तेव्हा एकदा त्याची अावडतीची मुलगी दाखवत म्हणाला होता " ती लाल रिबीनीची पाहिली दिसतेय का ? तीच अाहे 'माझीवाली' . मी सहज विचारलं " तुझीवाली म्हणजे सगळं दोन्हीबाजुंनी पक्कं झालंय तर". तर तो म्हणतो कसा "फक्त इकडेच लागलीय रे अाग . पोचेल तिकडे पण पोचेल. तुला सांगतो तिच्या हनुवटीवरचे ते तीन गोंदलेले ठिपके म्हणजे अाकाशातला 'समर ट्रॅंगल' अाहे रे गड्या.( नंतर अंगणात झोपल्यावर त्या खगोलशास्त्री विभुतीने अकिला ,सायग्नस अाणि लायरा असे तिन तारे दाखवुन समर ट्रेंगल कशाला म्हणतात ते सांगितलं.) "
तर ते ठिपके पण ह्या माऊलीने कसे पाहिले तर त्याचा मित्राची गिरणी होती पिठाची. तिथे मित्राच्या जागी हा उभा राहिला 'पांढरा विठ्ठल' बनुन अाणि मग ह्याने तो ट्रेंगल पाहिला.
तर असा हा गोंदलेल्या ठिपक्यांचा प्रवास मला त्या कोकराच्या कपाळी दिसला म्हणुन मी तिला नाव दिलं 'गोंदी'. पुढची रात्र गेली अाणि शेकोटी,अाग , मशालींचे प्रयत्न वाया घालवंत एक शेळी परत फस्त करुन उरली फक्त माझी गोंदी. वनविभागाचे लोक यायला एक दिवस अजुन होता अाणि अाणखी एक रात्र कशीही करुन गोंदीला कसं जगवायचं हा खल पुन्हा सुरू झाला.
शेवटी असं ठरलं की घरासभोती खड्डा करुन सापळा राचायचा अाणि गोंदी च्या सभोती सर्व पुरुष मंडळींनी लाठ्या-काठ्या अाणि मशाली पेटवतं गोलाकारात झोपायचं म्हणजे वाघ लांबुनच निघुन जाईल.
अाता मध्यभागी गोंदीला बांधुन ठरल्याप्रमाणे सगळे अाजुबाजुला झोपले. मी ही जरावेळ गप्पांमध्ये लहान श्रोता म्हणुन सहभागी होतो. मग अाजोबाने तीच वाघासाठीची काठी माझ्यावर उगारल्याने माझा बाहेर झोपण्यात खोडा पडला.
त्या दिवशी मला लौकरच जाग अाली अाणि अगदी सकाळी मी पहिले धावत अंगणात गेलो. दुरुन सर्व झोपलेले दिसत होते अाणि मध्ये गोंदी सुद्धा झोपलेली दिसली तेव्हा मनात हायसं वाटलं. मी घाईने सगळ्यांना उठवलं.
जवळ गेल्यावर पाहिलं तर गोंदीच्या गळ्याजवळ दात रोवलेलं नवे दोन गोंदण होतं अाणि इतक्या सराईतपणे माणसांच्या गर्दीतुन नरडीचा घोट कोणी कसा घेऊ शकतो हा अाजपर्यंतचा अामचा चर्चेचा विषय अाहे.गोंदी कायमची झोपलेली होती.
- प्राजक्त
(२६/४/१४ दै.सामना )