दुरदुरवर फक्त कौलारु घरं , स्वत:ची सावली अापल्याच पायाशी सावलीला यावी असं माथ्यावरचं टळटळीत ऊन, अाणि ह्या राखाडी रुक्ष गराड्यात एक टंच लालकेशरी गुलमोहराचं झाडं. मागच्या जुलै-अॉगस्ट मधली गोष्ट. एका डॉक्युमेंट्रीच्या चित्रीकरणासाठी बुलढाण्याजवळच्या एका गावात गेलो होतो.रात्रीच्या विजेच्या लपंडावात निम्मी शिम्मी चार्ज झालेली बॅटरी परत चार्जींग करण्यासाठी अाम्ही ब्रेक घेतला. त्यावेळी गुलमोहराच्या झाडाखाली अाम्ही थकुन अक्षरश: मेल्यासारखे झोपलो. जरावेळाने शाळेच्या घंटेच्या अावाजाने मित्रांनी फक्त कुस बदलली पण मी डोळे किलकिले करत उठलो. मुलांचा फसफसणारा विजयोत्सव सांगत होता कि ती मधली सुट्टी होती. अगदी साध्या बसक्या चारअाठ खोल्याची शाळा, भिंतींवर भारतमाता, महाराष्ट्राचा नकाशा,पठडीतले सुविचार, बोसबाबु, गांधीबापु, डॉ अांबेडकर, शिवाजी महाराज, गाडगेबाबा इ. ठरलेली भित्तीचित्रं, मध्यभागी झेंडावंदनाची सोय,त्या भोवती गोलगोल खेळणारी मुलं, असं सगळं दृष्य. काही मुलं डबे खातं होती ,काही खेळत होती , काही मुलांची हचाबचा डबे खात कधी उँडारायला जातो अशी घाई दिसत होती. एका ठिकाणी अाभाळाला खोड अाणि पानं फुटावे असे पिंपळाचे झाड होते. त्या खाली दोन-तीन मुलं मला चक्क अभ्यास करतांना दिसली. मधल्यासुट्टीत अभ्यास करणारी मुलं अाणि गर्द झाडाखालची गच्च सावलीचा अानंद घेण्यासाठी मी तिथे गेलो. तिथं कळालं कि मास्तरांनी गृहपाठ म्हणुन निबंध लिहुन अाणायला लावला होता अाणि ह्या तीन बहाद्दरांनी काल शाळेला सुट्टी मारली होती म्हणुन अंगठे धरण्यापेक्षा ही मुलं मधलीसुट्टी सत्कार्णी लावतं होती. त्यातल्या एकाने वहीत पेन्सील टाकुन टपकन उडी मारली अाणि " झाsssलं ! म्हणत तो खेळण्यासाठी धावत सुटला अाणि जातांना बोंबलत गेला. "पंक्या, माझ्या वहीकडं लक्ष ठेव बेsss ! अालोच एक लिंगोरच्या हाणुन!" मी हळुच वही उघडुन त्याचा निबंध वाचायला सुरवात केली.
अाप्पा म्हणतात त्यांच्या लहानपणी पाऊस यायचा तेव्हा ते खालच्या मळ्यात सायकलीवरुन रपेट मारायचे अाणि गार वारा अंगाला झोंबायचा. मी पण कधीकधी गुपचूप थोडं पाणी डोक्यावर अोतुन सायकलीची रपेट मारतो. मग नुकत्याच अोसरलेल्या पावसातुन फिरल्यासारखं वाटतं अाणि लहानपणीचा अाप्पा झाल्याचा भास होतो. मला अाप्पा अावडतात,म्हणुन कदाचित मला पावसाळा अावडत असावा.
जून मध्ये पाऊसाची सुरवात होते असं पुस्तकात लिहलं अाहे. पण अा मच्याकडे जून मध्ये साथीचा रोग येतो.त्या रोगाला काय म्हणतात माहित नाही पण लोक इकडे तिकडे फोन करुन "अाला का?" "कुठवर अा ला?" "ह्या वेळेला असावा हो ना?" , "थोडथिडका का होईना पण अाहेच " असं बरळायला लागतात. काही लोक तर मुर्खासारखा पैसा खर्च करुन कौ लाच्या अाणि घराच्या फटी पक्क् या सिमेंटने बुजवतात. ह्या साथी च्या रोगामुळे दरवर्षी ह्याच ऋतुत खुप लोकं मरतात. सुरेखाचा बाबा असाच साथीच्या रोगामुळे मेला. पण सकाळी त्याला म्हणे झाडावरुन खाली उतरवला असं कळालं. इतकं अाजारी असतांना झाडावर जाऊच नये असं मला तरी वाटतं. ह्या साथीचं रोगाच एक सोडलं तर बाकी नावं ठेवण्यासारखं काही नाही.म्हणुन मला असं वाटतं कि मला बहुतेक पावसाळा हा ऋतु अावडत असावा.
जय हिंद.
- प्राजक्त
"माझा अावडता ऋतू"
शाळेत शिकवत जरी असले तरी जन्माला अाल्यापासुन मी कधी तीन ऋतू पाहिले नाही. अामच्या विदर्भाकडं फक्त उन्हाळा असतो. अाणि हिवाळ्यात रात्रीपुरता गारवा असतो. बाकी भुगोलात शिकवलेलं खरं असंल तर पावसाळा हा माझा सगळ्यात अावडता ऋतू असु शकतो. पावसात उभं राहिलं कि म्हणे अंगावरुन थेंब निथळतात. दिन्या,पंक्या अाम्ही पकडा-पकडी खेळुन दमलो की घामाच्या धारा लागतात अाणि अंगावरुन जमीनीवर थेंब निथळतात तेव्हा अाम्ही "पाउस अाला,पाउस अाला" असं म्हणतो. तेव्हा खुप मजा येते म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. माझ्यामध्ये कधी कधी जादु अाहे असं वाटतं,कारण माझ्या घामाचा थेंब जमिनीवर पडल्यावर तसाच वाफ होऊन गायब होतो जसा अाईचा गरम तव्यावरचा पाण्याचा शिपकारा गायब होतो. पावसात म्हणे सगळीकडे हिरवं हिरवं होतं. मी एकदा चित्रकलेच्या तासाला तसं चित्र पण काढुन पाहिलं. अामच्या कडे जे तेलकट खडु अाहे त्यात पांढरा अाणि हिरवा खडु कशाला अाहे हे मला अाज पर्यंत कळालंच नाहीए. म्हणुन मी मित्रांचे पण हिरवे खडु घेऊन सगळीकडे हिरवळ दाखवली.पण पोरं खुप हसले म्हणाले 'असं हिरवं कधी असतं का?' म्हणुन मी ते चित्र माझ्या उशीच्या खोळात लपवुन ठेवलं अाहे.मला ते चित्र अावडतं, म्हणुन मला पावसाळा अावडतं असावा. अामच्या इथं एक किराणा दुकानदार दर जून मधे रंगीत छत्र्या विकायला अाणतो. त्या दुकानदाराला अाम्ही नेहमी "सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?" असं चिडवतो. तो खुप चिडतो अाणि दगडं घेऊन अामच्या मागे लागतो. तेव्हा पंक्या हळुच बरणीतुन चार-पाच खोब-या गोळ्या काढतो. फुकटच्या खोब-या गोळ्या जास्त गोड का लागतात माहित नाही पण अाम्हाला त्या खुप अावडतात. हे फक्त ह्याच ऋतुत घडतं म्हणुन मला पावसाळा अावडत असावा. अाप्पा म्हणतात त्यांच्या लहानपणी पाऊस यायचा तेव्हा ते खालच्या मळ्यात सायकलीवरुन रपेट मारायचे अाणि गार वारा अंगाला झोंबायचा. मी पण कधीकधी गुपचूप थोडं पाणी डोक्यावर अोतुन सायकलीची रपेट मारतो. मग नुकत्याच अोसरलेल्या पावसातुन फिरल्यासारखं वाटतं अाणि लहानपणीचा अाप्पा झाल्याचा भास होतो. मला अाप्पा अावडतात,म्हणुन कदाचित मला पावसाळा अावडत असावा.
जून मध्ये पाऊसाची सुरवात होते
जय हिंद.
- प्राजक्त