Monday, December 5, 2016
Sunday, November 20, 2016
दोन ठिपके ( मटा : मोहर)
त्यावेळी असं होतं की सगळे ऋतु जागच्या जागी होते. म्हणजे अाता सारखं पावसाळ्यात भक्कं ऊन पडायचं नाही.हिवाळ्यात पाऊसाची सर यायची नाही.उन्हाळ्यात अाता सारख्या गारा पडत नव्हत्या. मागे पावसाळ्यात म्हणेमराठवाड्याला गारा झाल्या. नुसकानी किती हो ! बिचा-या मराठवाड्यासारख्या ठिकाणचं वाईट वाटतं. देवहीकाय अघोरखेळ्या म्हणावा, तो तिकडे एकतर गारा देतो किंवा दुष्काळ. साला पाऊस काही देत नाही. (कानालाहात…कानाला हात. माफी माफी. देवाला साला बोलुन गेलो)
तर तेव्हाच्या थंडीअल्याड दिवसात पलंगाची गादी उचकुन खालच्या कप्प्यातुन स्वेटरांचे बोचके निघायचे. मग दुस-या दिवशी ते सगळे स्वेटर धुतलेले असायचे.
अाणि दोरीवर हिवाळ्याची चाहुल वाळत घातलेली असायची. मोजुन ७ जुनला पाऊस विठुराया सारखा कटिसंन्यस्त हजर व्हायचा. अाणि परिक्षेची सट्टी गावाकडचे वेध उन्हाळा घेउनयायचा.
त्यावेळी सगळं सुरळीत होतं. पोस्ट्या पत्र वाटायचा, खाकी पत्रात माणसं दिसायची, कोणत्याही लाल डब्ब्याच्याबसमध्ये बसलं की ती अाजोळी गावाकडे नेऊन घालेलं असं वाटायचं, तार अाली की धडकी भरायची. अाता सारखेमिस वैगेरे कॉल्स नसायचे. असायचे तर फक्त ट्रंककॉल. मग अाजोळी गेलं की शेत हिरवंगार असायचं,कोळशाच्या बंबातुन पाणी तापायचं, पांढरीशुभ्र टुथपेस्ट अाणली असेल तरी गंमत म्हणुन अाजीची काळं मंजनवापरायचं, मग गोठ्यात शेळ्या-बैलं-गाई अाणि मोत्यासोबत उरलेला सबंध दिवस मावळायचा.
अशाच एका सुट्टीतली गोष्ट. जेव्हा गावी पोचलो तेव्हा वेशीवरच्या मारुतीच्या कपाळी अाठ्या असल्यागत सगळ्यालोकांच्या घोळक्यातल्या चर्चा यंदा तंग वाटल्या. अाणि घरी पोचेतो गोठ्यातल्या शेळ्यासुद्धा कमी दिसल्या. मगजसा जसा दिवस जात गेला तसं कळालं की रात्रीचा म्हणे 'जनावर येतं' गावात. जनावर येतं म्हणजे वाघं येतो.अाणि शेळ्या-बक-यांना नरडीचा घोट घेतो. नरडं धरुन रक्त पितो. मग लोकं हताशपणे दुस-या दिवशी ते मृत अर्धवट फाडलेल्या शेळ्यांचे देह पडक्या मंदिरामागे फेकुन द्यायचे. नंतर रात्रीतुन ते तिथुन सुद्धा नाहीसे व्हायचे.अशी चर्चा होती की जवळच्याच जंगलातुन दोन वाघ येतात म्हणे. हे तेव्हा कळालं जेव्हा वनविभागाने एकच वाघपकडला अाणि थोडे दिवस सर्व सुरळीत असल्याचा भास झाला अाणि पुन्हा एका अाठवड्यानंतर परत तोच खेळसुरु झाला.
रात्री सबंध घरदार अंगणात जेवतांना चर्चा रंगली की अाता काय ? उरल्या होत्या दोन शेळ्या . त्यात एक होतीमाझी गोंदी . म्हणजे जन्मापासुन त्या कोकराच्या कपाळावर दोन ठिपके होते. किरमिजी रंगाचे जिवघेणे ठिपके.
अाजीच्या सुरकुतल्या हनुवटीवर होते तसे ठिपके. माडीवर एकदा जुने फोटो काढुन चाळत बसलो तेव्हातरुणपणीच्या अाजीच्या हनुवटीवर दिसले. नंतर एकदा तिच्या रखरखीत राठ टाचा दाबताना ती झोपल्यावरनिरखुन पाहिलं तर सुरकुत्यांमध्ये दडलेले दिसले होते…हनुवटीचे ठिपके.
अाणखी एक गावातलाच दोस्त होता नुकता नुकता दहावीत गेला असेल तेव्हा एकदा त्याची अावडतीची मुलगीदाखवत म्हणाला होता " ती लाल रिबीनीची पाहिली दिसतेय का ? तीच अाहे 'माझीवाली' . मी सहज विचारलं "तुझीवाली म्हणजे सगळं दोन्हीबाजुंनी पक्कं झालंय तर". तर तो म्हणतो कसा "फक्त इकडेच लागलीय रे अाग .पोचेल तिकडे पण पोचेल. तुला सांगतो तिच्या हनुवटीवरचे ते दोन गोंदलेले ठिपके म्हणजे अाकाशातला 'समरट्रॅंगल' अाहे रे गड्या. त्यातल्या दोघांसारखे. नंतर रात्री अंगणात झोपल्यावर त्या खगोलशास्त्री विभुती दोस्ताने अकिला ,सायग्नस अाणि लायरा असे तिन तारे दाखवुन समर ट्रेंगल कशाला म्हणतात ते सांगितलं. ते एेकतांना मीअंगावर अाजीने शिवलेल्या गोधडी खाली माझ्या शहरीपणाची लक्तरं वगैरे लपवलीय असं झालं होतं.
तर ते ठिपके. पण ह्या माऊलीने कसे पाहिले तर त्याचा मित्राची गिरणी होती पिठाची. तिथे मित्राच्या जागी हा उभाराहिला 'पांढरा' विठ्ठल बनुन अाणि मग ह्याने तो ट्रेंगल पाहिला.
तर असा हा गोंदलेल्या ठिपक्यांचा प्रवास मला त्या कोकराच्या कपाळी दिसला म्हणुन मी तिला नाव दिलं 'गोंदी'.पुढची रात्र गेली अाणि शेकोटी,
अाग , मशालींचे प्रयत्न वाया घालवंत एक शेळी परत फस्त करुन उरली फक्तमाझी गोंदी. वनविभागाचे लोक यायला एक दिवस अजुन होता अाणि
अाणखी एक रात्र कशीही करुन गोंदीलाकसं जगवायचं हा खल पुन्हा सुरू झाला.
शेवटी असं ठरलं की घरासभोती खड्डा करुन सापळा राचायचा अाणि गोंदी च्या सभोती सर्व पुरुष मंडळींनीलाठ्या-काठ्या अाणि मशाली पेटवतं गोलाकारात झोपायचं म्हणजे वाघ लांबुनच निघुन जाईल. कारण प्रश्नफक्त एका रात्रीचा होता. दुस-या दिवशी वनविभागवाले येणार होते.
अाता मध्यभागी गोंदीला बांधुन ठरल्याप्रमाणे सगळे अाजुबाजुला झोपले. मी ही जरावेळ गप्पांमध्ये लहान श्रोताम्हणुन सहभागी होतो. मग अाजोबाने तीच वाघासाठीची काठी माझ्यावर उगारल्याने माझा बाहेर झोपण्यात खोडापडला. मी माडीवर दुलईत शिरल्या शिरल्या बाहेरच्या गप्पांची उजळणीकरत मेल्यागत झोपलो.
दुस-या दिवशी मला लौकरच जाग अाली अाणि अगदी सकाळी मी पहिले धावत अंगणात गेलो.
दुरुन सर्वझोपलेले दिसत होते अाणि मध्ये गोंदी सुद्धा झोपलेली दिसली तेव्हा मनात हायसं वाटलं. धावत जवळ गेलो.
जवळ गेल्यावर पाहिलं तर गोंदीच्या गळ्याजवळ दात रोवलेलं नवे दोन गोंदण होतं अाणि इतक्या सराईतपणेमाणसांच्या गर्दीतुन नरडीचा घोट कोणी कसा घेऊ शकतो हा अाजपर्यंतचा अामचा चर्चेचा विषय अाहे.
कपाळावर दोन जिवघेणे गोदणं असलेल्या गोंदीच्या नरड्यावर नवे दोन 'जीवघेणे' गोंदण होते.
गोंदी कायमची झोपलेली होती.
- प्राजक्त ११ नोव्हेंबर २०१६
पाखरथवा ( मटा मोहर २ जानेवारी २०१७)
मागे एक चुकलेला पाखरथवा परतीची वाट विचारत, परतीच्या खाणाखुणा सांगत माझ्याकडे अाला. मी उंचावर बसलेलो होतो. माझ्या अवतीभवती गोलाकार गलका मांडत माझ्या अंगावर, कधी खांद्यावरुन ते त्यांच्या परतीच्या ठिकाणाची अोळख सांगत होते. अाणि त्यांच्या विसाव्याच्या ठिकाणाचा पत्ता विचारत होता तो चुकलेला पाखरथवा.
“…ते नाही का ? कारखान्यांच्या चिमण्यांएेवजी गर्द वडाच्या सांदीअाडुन सुर्य उगवतो, प्रार्थनाबिर्थनास्थळां एेवजी बसक्या टेकाडामागे जिथे सुर्य विझतो,
अाणि ते नाही का, जिथल्या फांदीच्या नितळसर पिवळकांत पाकळ्यांअाडुन कुणाचेही, कोणतेही क्लेश केशरक्लांत अाणि मोहक वाटतात, पानगळीला तिथल्या झाडाचं एखाद पानं जेव्हा भिरभिरत खाली पडतं तेव्हा पाण्यात असंख्य शुभेच्छुक तरंग उमटतात.”
अाणखी खाणाखुणा सांगत काही म्हणाले कि, “…अाणि ते नाही का ? तिथे गच्च रान अाहे, अाणि जवळच पानथळीसुद्धा. गुरांच्या रोजच्या पानथळीवरच्या ये-जा मुळे तिथल्या गर्द रानात एक पायवट तयार झालीय, अाणि त्याच्या दुतर्फा असलेल्या केशरीकिरमिजी फुलांच्या सड्यामुळे लांबुन ती वाट एखाद्या सलज्ज नवविवाहितेच्या भरलेल्या भांगेसारखी दिसते.”
पंख हवेत उंचावत चोचीनं पंखाच्या अातल्या बाजुला चोचवणारं एक पाखरु अचानक थांबलं. “….हां ! हां ! अाणि ते नाही का ते…ढाक्याचं झाडं. त्या झाडाच्या पानाचं द्रोण करुन तिथल्या नदीचं पाणी प्यायलो तर तो थंडावा अगदी पोटापर्यंत डुचमळेलेला जाणवतो. तिथली समजंस नदी अलिकडे, उंचावर वांड धबधबा अाहे. अाणि कमंडलुसारख्या घनघुमटदार डोंगराच्या घळईतुन अर्घ्य दिल्यागत खाली येते. अाणि सुर्य विझणा-या टेकाडाच्या पोटात एक कातळभोर मंदीर कोरलं अाहे. सुर्य विझल्यानंतर अंधारुन यायच्या अात तिथल्या गाभा-यात कुणीतरी दिवा लावतं. अाणि हे सगळं दुरुन पाहतांना तो सुर्य तिथे मंदीरात निजायला गेल्यासारखं वाटत राहतं.”
दुडक्याचालीचे दोन पाखरं दोन-दोन उड्या मारत पुढे अाले. “ …तिथे नाही का ? दुपारी रानातच थांबलं तर सांदीतुन अारपारणा-या सुर्यकिरणांमुळे खाली उजेडसावल्यांचे किनखाबी गालीचे अंथरल्यासारखे वाटतात. अाणि जिथे फुलचुख्या फुलपाखरांच्या रंगांवर पैजा लागतातच पण फुलपाखरु फुलावरुन निसटल्यानंतर ते फूल किती उसासेयुक्त झोके घेत राहिलं ह्यावरही पैजा लागतात.”
एक पाखरु बळे बळे पाय अोढत समोर अालं अन् दिर्घ श्वासानंतर कंपावलेले बुब्बूळ स्थिरावत म्हणालं , “…ते नाही क…” , पाखरु अर्ध्यातच थांबलं. निबिड झालेल्या अावाजातला कंप थोपवत परत धिरवटल्या अावाज ते म्हणालं ,” ….ते नाही का… तिथे चाफाच्या एका झाडावर एक खोपा अाहे. सगळे म्हणायचे कि उंच आणि घुमटदार झाडावरच खोपे रचावे. तरीहि एका क्षीणपंखी पक्षिणीची झेप पोचणार नाही वर म्हणुन एका खुळप्या पाखरानं खाली चाफ्यावर बांधला होता खोपा. त्या पंखामधली क्षीणता पसरत गेली नंतर पक्षिणीच्या अंगभर आणि त्या खोप्याच्या वाट्याला गुलाबी कुजबुज शहारे आलेच नाही कधी. म्हणुन 'उंचावरच खोपे असावे' ह्या बुजूर्गी फांट्यांच्या म्हणण्याला बळ आलंय आताशा. तो एकटा खोपा फक्त हेलकावे घेतो आता.....वारा असो नसो. आणि त्या खोप्याचा मालकपाखरु आणखी खाली चाफ्याच्या पायाशी बसुन बघत राहतो वर फक्त."
पाचेक गुंड घोळक्यांचे पाखरं, एक पत्ता धड विचारता येत नाही अशा अविर्भावात पुढं आले, " .... अरे ते नाही का पिवळ्या सोनसळीसारखं फुलं येतात तिथं वळणावरच्या वेलीला. आणि त्याच्या फुलांचा फक्त गंध हुंगायला बहात्तर कस्तुरीयुक्त हरणांचे तांडे येतात. आताशा त्यांना कस्तुरीची जागाही माहीत झालीय,आता मुर्खासारखे रानभैरी हिणवत नाही कुणी त्यांना."
" ... आणि रात्री नाही का आभाळ कुठून सुरु होतं ?आणि जमिन कुठे ? हे न कळण्याइतपत गच्च तारकांच्या जत्थ्याचं प्रतिबिंब तलावात पडलेलं असतं. खरंच एकटक पाहीलं तर रात्र आणि पहाटेच्या उंबरठ्याच्यावेळी, खुरट्या कवीनं सांगितलंय तसं निळंबिळं नाही तर जांभळंमिट्टं दिसतं आभाळं. जिथल्या चंद्राची कोर पाहुन कुण्या मंजुळेचं कपाळ आठवावं आणि निरखून पहात राहील तर कोरी खालीच आत्ता ती डोळे उघडेलंसं वाटतं राहतं. जिथल्या पावसाला पानाफुलांतुन गाळून येत असल्याने सगळे 'सुगंधअर्क' म्हणतात, हिवाळ्याला 'दुलईधुकं' आणि उन्हाळ्याला 'चिडकाबिब्बा' म्हणतात.
पाखरांना खुणा आठवत गेल्या. गलका वाढत गेला.
तुम्ही सगळे काल हसत होते ना ? वरती थव्याकडे पहात,थव्यातुन मागे पडलेल्या, थव्याचा वेगाशी वेग राखत धडपडणा-या एका नवख्या पाखराकडे पहात तुम्ही सगळे काल हसत होते ना ?
तो मीच होतो. त्यांच्या विसाव्याच्या खाणाखुणा ऐकुन रहावलंच नाही मला. मग स्वत:ला झोकुन दिलं आणि त्यांच्यात सामिल झालो होतो मी.
Sunday, November 6, 2016
कोलाज : ( मोहर : मटा)
रात्री मोकळ्या अाकाशाखाली पहुडलो अमावस्या होती. दु:ख अाणि अमावस्या जास्त काळ टिकत नाही मास्तर
म्हणायचे. टिकत वरुन अाठवलं, मित्राच्या अारशाला टिकली लावलेली अाहे ती त्याने काढली नाही कधीच तिची
अाठवण म्हणुन राहु दिली अाहे. अारशावरुन अाठवलं, अाताशाबाजारात पुर्वी सारखे हसतमुख अारसे मिळत नाही म्हणे?
बाजारावरुन अाठवलं, सगळ्याचाच बाजार मांडलाय अाजकाल ...मैत्रीचा,भावनेचा,नात्यांचा सगळाच. नात्यांवरुन
अाठवलं, परवा जाॅगिंग ट्रॅकवर एक भणंग माणुस दिसला शुन्यात नजर लावुन बसला होता. कुणीतरी म्हणे तो
जिच्यासाठी इथे अाला ती कधीच त्याची नव्हतीच. जॉगिंग ट्रॅक वरुन अाठवलं, अाजकाल सगळेच पळताय कशाचा तरी मागे,काही तरी शोधायला ,काही तरी पकडायला, कोणापासुन तरी लांब जायला पण पळताय फक्त.
कुठे जायचं माहित नाही पण डोक्यात एकच मंत्र घुमत असावा त्यांच्या कि पळत रहा. मंत्रावरुन अाठवलं अामचे एक सरहोते त्यांनी एक मंत्र दिला होता "हा हि काळ निघुन जाईल" हा मंत्र लिहुन ठेवा असं म्हणायचे ते अाणि अति दु:खातअसलात किंवा अति अानंदाच्या माजात असलात कि हा मंत्र एकदा वाचा असं ते सांगायचे. मी त्याला 'महामृत्यंजय मंत्र' म्हणायचो. दु:खावरुन अाठवलं. राधेचं पुढे काय झालं हे शोधता येईल , कृष्णाचं काय झालं हे माहितीच अाहे पण अनयचं पुढं काय झालं हे कुणी
शोधलंय का ? त्याचं दु:ख मोठं कि त्याचं सुख?
कृष्णावरुन अाठवलं, काल मुर्तीवाल्याची एक हातगाडी रस्त्यावरुन जात होती सगळ्या मुर्त्यांवर कपडा टाकुन ठेवला
होता, कदाचित गोडवुन मधुन दुकानात नेत असावा तो. त्यात नाक्यावरल्या कृष्णाच्या देवळासमोरुन जातांना त्याला
एक दगड दिसला नाही अाणि हातगाडी किंचीत वरखाली झाली. तेव्हा मीरेच्या मुर्तीच्या हातातली एकतारी खाली
पडली. ती त्याला दिसली नाही मला दिसली. अंगावर काटा अाला. ती एकतारी मी कृष्णाच्या देवळात नेउन ठेवली
तेव्हा कृष्णाच्या डोक्यावरचं जास्वंदीचं फुल वारा वाहत नसतांना खाली पडलं. जास्वंदावरुन अाठवलं एका मित्राचा
घराबाहेर खुप जास्वंद लावलेले होते, त्याला जास्वंद खुप अावडायचा . इतकाकि त्याच्या त्या घराचं नाव पण
जास्वंदच होतं. पण जेव्हा मला कळालं कि जास्वंद लावायला त्याने तिथला खुप अाधीपासुनचा बहरलेला गुलमोहर
तोडलाय तेव्हापासुन मी त्याच्या घरी जाणं कमी केलं. गुलमोहरावरुन अाठवलं यंदा ऊन जास्त होतं त्यामुळे
गुलमोहराची सावली जास्त थंड जाणवायची त्या झाडाखाली. भगभगत्या उन्हामुळे अचानक झाडाने पेट घेतल्यासारखा दिसतो मला गुलमोहर नेहमी.
भगभगण्या वरुन अाठवलं, राणी पद्मिनीने चित्तोडगडावर सोळा हजार रजपुत सख्यांसोबत जौहर केला होता तेव्हा त्या तडतडत्या अग्निशिखांमध्ये भगभगतांना कुणी साधा चित्कारही काढला नव्हता. राणी पद्मिनीवरुन अाठवलं.
अाता प्रत्येकीनेच जौहर पेटावावा पण त्यांना त्रास देणा-याला त्यात ढकलण्यासाठी स्वत: जळुन जाण्यासाठी नाही.
ढकलण्यावरुन अाठवलं मला अाठवीमधुन नववीत ढकलं होतं तेव्हा मास्तरीण बाई म्हणाल्या होत्या अाता तरी अभ्यासकरशील ना रे ? मी तुझ्या घरी नाही सांगणार हं !त्यांचा मुलाने मागच्याच महिन्यात नापास व्हायच्या भितीने अात्महत्या केली हे मला नंतर कळालं. नापास वरुन अाठवलं पुढच्या अाणि मधल्या बेंचवरचे अभ्यासात पुढे असतात म्हणुन अायुष्यात पण पुढे असतातपण मागच्या बेंचवरचे
अभ्यासात जरी मागे असले तरी अायुष्यात मागे असतीलच हा नेम नाही. स्वानुभव.
स्वानुभवावरुन आठवलं .. जास्त एकटं राहु नये. प्रत्येकवेळी 'डोळ्यात काहीतरी गेलं' हे कितीदा पटणार ना लोकांना? लोकांवरुन आठवलं .. मांजर आडवं गेल्यावर साताठ पावलं मागेबिगे जातात म्हणे लोकं. तेवढ्यात तिला गाडीने वगैरे
उडवलच तर मग खरं अपशकुन कोणाचा ? मांजरीवरुन आठवलं... तिच्या उरातली घरघर आणि 'मौतं का कुआं'
मधल्या फटफटीची घरघर ही आपल्या जगण्याची घरघरी सारखीच ऐकु येत असेल का ?
जगण्याच्या घरघरीवरुन आठवलं... सितेच्या त्यागाचा उहापोह करणारे उर्मिलेबद्दल अवाक्षर का काढत नसावे ?
लक्ष्माणाचा निरोप जाऊ दे पण निदान वनवासाला जातानाची पाठमोरी आकृती तरी तिला पहायला मिळाली असेल?
किंवा धुळीतली पावलं? नसेलच. कारण अयोध्येत त्या दिवशी वादळ होतं म्हणे!
वादळावरुन आठवलं ब-याचं दिवसात कविता लिहणं झालं नाही.
कवितेवरुन आठवलं मागे मी चारचौघात माझी जखम उघडी केली तर चारचौघांसोबत येणारे जाणारेही थांबुन "वाह क्या बात है" म्हणाले होते. जखमेवरुन आठवलं...
अश्वत्थामाने एकदा वाळु रगडुन पहायला काय हरकत आहे ? हा विचार करुन मी एकदा गर्दीत आवाज दिला होता. 'अश्वत्थामाऽऽऽ'. तेव्हा सगळीच कारुण्यमय गर्दी वळुन माझ्याकडे पहायला लागली.
गर्दीवरुन आठवलं... एकदा हातातुन आरसा पडला तेव्हा तुकड्या तुकड्यांमधली माझीच गर्दी चांदण्यासारखी पसरली होती. इच्छा मागायला आकाशातला एखादा 'मी' तुटायची वाट पाहीली असती पण विरक्तीला पोचुन
तुटण्या-यापुढे इच्छा मांडल्या तर त्याला, ता-याला डिवचल्यासारखं होईल ह्या विचाराने मी गप राहतो.
ता-यावरुन आठवली रात्र.
अश्वत्थामाने एकदा वाळु रगडुन पहायला काय हरकत आहे ? हा विचार करुन मी एकदा गर्दीत आवाज दिला होता. 'अश्वत्थामाऽऽऽ'. तेव्हा सगळीच कारुण्यमय गर्दी वळुन माझ्याकडे पहायला लागली.
गर्दीवरुन आठवलं... एकदा हातातुन आरसा पडला तेव्हा तुकड्या तुकड्यांमधली माझीच गर्दी चांदण्यासारखी पसरली होती. इच्छा मागायला आकाशातला एखादा 'मी' तुटायची वाट पाहीली असती पण विरक्तीला पोचुन
तुटण्या-यापुढे इच्छा मांडल्या तर त्याला, ता-याला डिवचल्यासारखं होईल ह्या विचाराने मी गप राहतो.
ता-यावरुन आठवली रात्र.
रात्री मोकळ्या अाकाशाखाली पहुडलो अमावस्या होती. दु:ख अाणि अमावस्या जास्त काळ टिकत नाही.
मास्तर म्हणायचे....
- प्राजक्त ५ नोव्हेंबर २०१६
Subscribe to:
Posts (Atom)
अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)
मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...
-
1) Shripad Deshpande : काही-काही गोष्टी लहानपणापासून माझी तंद्री लावणाऱ्या. म्हणजे गरम गरम कातळावर तांब्याच्या पेल्यातून पाणी सोडलं त...
-
जिंदगीभर कोइ गम तो ढो ता नही जख्म धो भी लेगा की दर्द धोता नही खुदको कोस कर कहा मैने अपने अापसे इसकदर कोइ अपनी जान खोता नही ...