त्यावेळी असं होतं की सगळे ऋतु जागच्या जागी होते. म्हणजे अाता सारखं पावसाळ्यात भक्कं ऊन पडायचं नाही.हिवाळ्यात पाऊसाची सर यायची नाही.उन्हाळ्यात अाता सारख्या गारा पडत नव्हत्या. मागे पावसाळ्यात म्हणेमराठवाड्याला गारा झाल्या. नुसकानी किती हो ! बिचा-या मराठवाड्यासारख्या ठिकाणचं वाईट वाटतं. देवहीकाय अघोरखेळ्या म्हणावा, तो तिकडे एकतर गारा देतो किंवा दुष्काळ. साला पाऊस काही देत नाही. (कानालाहात…कानाला हात. माफी माफी. देवाला साला बोलुन गेलो)
तर तेव्हाच्या थंडीअल्याड दिवसात पलंगाची गादी उचकुन खालच्या कप्प्यातुन स्वेटरांचे बोचके निघायचे. मग दुस-या दिवशी ते सगळे स्वेटर धुतलेले असायचे.
अाणि दोरीवर हिवाळ्याची चाहुल वाळत घातलेली असायची. मोजुन ७ जुनला पाऊस विठुराया सारखा कटिसंन्यस्त हजर व्हायचा. अाणि परिक्षेची सट्टी गावाकडचे वेध उन्हाळा घेउनयायचा.
त्यावेळी सगळं सुरळीत होतं. पोस्ट्या पत्र वाटायचा, खाकी पत्रात माणसं दिसायची, कोणत्याही लाल डब्ब्याच्याबसमध्ये बसलं की ती अाजोळी गावाकडे नेऊन घालेलं असं वाटायचं, तार अाली की धडकी भरायची. अाता सारखेमिस वैगेरे कॉल्स नसायचे. असायचे तर फक्त ट्रंककॉल. मग अाजोळी गेलं की शेत हिरवंगार असायचं,कोळशाच्या बंबातुन पाणी तापायचं, पांढरीशुभ्र टुथपेस्ट अाणली असेल तरी गंमत म्हणुन अाजीची काळं मंजनवापरायचं, मग गोठ्यात शेळ्या-बैलं-गाई अाणि मोत्यासोबत उरलेला सबंध दिवस मावळायचा.
अशाच एका सुट्टीतली गोष्ट. जेव्हा गावी पोचलो तेव्हा वेशीवरच्या मारुतीच्या कपाळी अाठ्या असल्यागत सगळ्यालोकांच्या घोळक्यातल्या चर्चा यंदा तंग वाटल्या. अाणि घरी पोचेतो गोठ्यातल्या शेळ्यासुद्धा कमी दिसल्या. मगजसा जसा दिवस जात गेला तसं कळालं की रात्रीचा म्हणे 'जनावर येतं' गावात. जनावर येतं म्हणजे वाघं येतो.अाणि शेळ्या-बक-यांना नरडीचा घोट घेतो. नरडं धरुन रक्त पितो. मग लोकं हताशपणे दुस-या दिवशी ते मृत अर्धवट फाडलेल्या शेळ्यांचे देह पडक्या मंदिरामागे फेकुन द्यायचे. नंतर रात्रीतुन ते तिथुन सुद्धा नाहीसे व्हायचे.अशी चर्चा होती की जवळच्याच जंगलातुन दोन वाघ येतात म्हणे. हे तेव्हा कळालं जेव्हा वनविभागाने एकच वाघपकडला अाणि थोडे दिवस सर्व सुरळीत असल्याचा भास झाला अाणि पुन्हा एका अाठवड्यानंतर परत तोच खेळसुरु झाला.
रात्री सबंध घरदार अंगणात जेवतांना चर्चा रंगली की अाता काय ? उरल्या होत्या दोन शेळ्या . त्यात एक होतीमाझी गोंदी . म्हणजे जन्मापासुन त्या कोकराच्या कपाळावर दोन ठिपके होते. किरमिजी रंगाचे जिवघेणे ठिपके.
अाजीच्या सुरकुतल्या हनुवटीवर होते तसे ठिपके. माडीवर एकदा जुने फोटो काढुन चाळत बसलो तेव्हातरुणपणीच्या अाजीच्या हनुवटीवर दिसले. नंतर एकदा तिच्या रखरखीत राठ टाचा दाबताना ती झोपल्यावरनिरखुन पाहिलं तर सुरकुत्यांमध्ये दडलेले दिसले होते…हनुवटीचे ठिपके.
अाणखी एक गावातलाच दोस्त होता नुकता नुकता दहावीत गेला असेल तेव्हा एकदा त्याची अावडतीची मुलगीदाखवत म्हणाला होता " ती लाल रिबीनीची पाहिली दिसतेय का ? तीच अाहे 'माझीवाली' . मी सहज विचारलं "तुझीवाली म्हणजे सगळं दोन्हीबाजुंनी पक्कं झालंय तर". तर तो म्हणतो कसा "फक्त इकडेच लागलीय रे अाग .पोचेल तिकडे पण पोचेल. तुला सांगतो तिच्या हनुवटीवरचे ते दोन गोंदलेले ठिपके म्हणजे अाकाशातला 'समरट्रॅंगल' अाहे रे गड्या. त्यातल्या दोघांसारखे. नंतर रात्री अंगणात झोपल्यावर त्या खगोलशास्त्री विभुती दोस्ताने अकिला ,सायग्नस अाणि लायरा असे तिन तारे दाखवुन समर ट्रेंगल कशाला म्हणतात ते सांगितलं. ते एेकतांना मीअंगावर अाजीने शिवलेल्या गोधडी खाली माझ्या शहरीपणाची लक्तरं वगैरे लपवलीय असं झालं होतं.
तर ते ठिपके. पण ह्या माऊलीने कसे पाहिले तर त्याचा मित्राची गिरणी होती पिठाची. तिथे मित्राच्या जागी हा उभाराहिला 'पांढरा' विठ्ठल बनुन अाणि मग ह्याने तो ट्रेंगल पाहिला.
तर असा हा गोंदलेल्या ठिपक्यांचा प्रवास मला त्या कोकराच्या कपाळी दिसला म्हणुन मी तिला नाव दिलं 'गोंदी'.पुढची रात्र गेली अाणि शेकोटी,
अाग , मशालींचे प्रयत्न वाया घालवंत एक शेळी परत फस्त करुन उरली फक्तमाझी गोंदी. वनविभागाचे लोक यायला एक दिवस अजुन होता अाणि
अाणखी एक रात्र कशीही करुन गोंदीलाकसं जगवायचं हा खल पुन्हा सुरू झाला.
शेवटी असं ठरलं की घरासभोती खड्डा करुन सापळा राचायचा अाणि गोंदी च्या सभोती सर्व पुरुष मंडळींनीलाठ्या-काठ्या अाणि मशाली पेटवतं गोलाकारात झोपायचं म्हणजे वाघ लांबुनच निघुन जाईल. कारण प्रश्नफक्त एका रात्रीचा होता. दुस-या दिवशी वनविभागवाले येणार होते.
अाता मध्यभागी गोंदीला बांधुन ठरल्याप्रमाणे सगळे अाजुबाजुला झोपले. मी ही जरावेळ गप्पांमध्ये लहान श्रोताम्हणुन सहभागी होतो. मग अाजोबाने तीच वाघासाठीची काठी माझ्यावर उगारल्याने माझा बाहेर झोपण्यात खोडापडला. मी माडीवर दुलईत शिरल्या शिरल्या बाहेरच्या गप्पांची उजळणीकरत मेल्यागत झोपलो.
दुस-या दिवशी मला लौकरच जाग अाली अाणि अगदी सकाळी मी पहिले धावत अंगणात गेलो.
दुरुन सर्वझोपलेले दिसत होते अाणि मध्ये गोंदी सुद्धा झोपलेली दिसली तेव्हा मनात हायसं वाटलं. धावत जवळ गेलो.
जवळ गेल्यावर पाहिलं तर गोंदीच्या गळ्याजवळ दात रोवलेलं नवे दोन गोंदण होतं अाणि इतक्या सराईतपणेमाणसांच्या गर्दीतुन नरडीचा घोट कोणी कसा घेऊ शकतो हा अाजपर्यंतचा अामचा चर्चेचा विषय अाहे.
कपाळावर दोन जिवघेणे गोदणं असलेल्या गोंदीच्या नरड्यावर नवे दोन 'जीवघेणे' गोंदण होते.
गोंदी कायमची झोपलेली होती.
- प्राजक्त ११ नोव्हेंबर २०१६
No comments:
Post a Comment