त्याने नोकरी शोधतांना सोयीच्या शहरांची जेव्हा यादी केली तेव्हा त्या यादीमध्ये पुढे कंसात सरासरी पावसाचे प्रमाण पण लिहलं होतं. इतका त्याला पाऊस जवळचा होता. जन्मत:च त्याच्या तब्येतीमुळे त्याला काही दिवस काचेच्या पेटीत ठेवलं होतं तेव्हा अाजुबाजुला कापसाची गादी केली होती. कदाचित त्यामुळे त्याला ढगांची इतकी अोढ असावी ,असा माझा अापला अंदाज. पाऊस अाला कि हातातलं काम सोडुन पाहुणा अाल्यागत त्याचा पाहुणचार करायचा. म्हणे "पाऊस चालु असतांना जर भिजलं नाही किंवा खिडकीत बसुन पाऊस पाहिला नाही तर पावसाचा अनादर होतो" . मी म्हणालो "राया, मग थंडीत स्वेटर नको घालु, उन्हाळ्यात दुपारच्याला टळटळीत ऊन खा. ह्यांना अनादर नाही होय ?" मग तो म्हणायचा "कर मस्करी पण माझ्या अायुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी पावसातच झाल्याय म्हणुन .... " त्याचं वाक्य अर्धवट राहिलं किंवा त्याने तसं ठेवलं. मग थोड्या वेळात तो परत बोलायला लागला " कुठल्याशा वैदुच्या नादी लागुन अाप्पांनी घरातल्या बाळंतपणं घरीच केली. बाळाच जन्म नैसर्गिकचं व्हायला हवा असा त्यांचा हट्ट.तसंही अामच्या खेड्यामध्ये फार सुविधा नव्हत्या. शहरात जायला अाधी कच्ची पायवाट मग बैलगाडी अाणि नंतर दोन बस अासा प्रवास करावा लागे. अाधीच दोनदा मेलेले थंड गोळे जन्माला घातले म्हणुन अामच्या अाईला शंभर बोल ऎकावे लागायचे. माझ्यावेळी तसं झालं नाही. थडथडत्या उडत्या टाळु ने मी जन्म-मृत्यु मधला तोल सांभाळला. अाणि अंगावर हिरव्या टपो-या नसा मोजत अाई झोपी गेली. परत माझे रडणे थांबेना म्हणुन विरोध पत्करुन मला जगवायला अाईने शहराचा रस्ता धरला. तेव्हा वाटेत पाऊस होता. नंतर मोठा होत गेलो. उनाड होतोच पण अभ्यास कधी चुकवला नाही. पण एकदा शाळेची पिशवी अाणि पुस्तकं अोली केली म्हणुन शिक्षकाने अंगठे धरुन शाळेच्या पटांगणात उभं केलं.अाणि पहिल्यांदा शिक्षा झाली. तेव्हा पाऊस होता. डॉक्टर जसे दिवसातुन दोन-तीन वेळा अौषध देतो तसा अौषधाला अामच्या गावात तीन वेळा वीज यायची. त्यातही रात्री नसायचीच. तेव्हा दुर खिडकीत 'ती' पहिल्यांदा दिसली अाणि कंदिलाची ज्योत वर-खाली करुन अामचे सावल्यांचे संवाद रंगले. तेव्हा पाऊस होता. दुरुन बघण्या-लाजण्या पलिकडे काही झालं नाही.ती वेळ-वय-काळ तसाच होता. मी पुढच्या शिक्षणासाठी शहरी अालो. तीच्याही दारात मंडप सजला. मी लग्नाला जाऊ शकलो नाही पण सुमीने पत्रात तिच्या लग्नाबद्दल कळवलं होतं.अाणि हे ही कळवलं होतं कि तिच्या निरोपाच्या वेळी पाऊस होता. नोकरीही शोधली मनासारखी , मनासारख्या शहरात शोधली. मुलाखतीच्या पहिल्या दिवशी सगळ्या टापटिप गर्दीमध्ये मीच एकटा मार्तंडबा दिसत होतो. कारण त्या दिवशीही पाऊस होता. अाताशा दहा वर्ष झाली नोकरीला. काम-पगार-जबाबदा-या वाढत गेल्या. फक्त त्यांचा क्रम उलट-पालट झाला इतकंच. मग अाई-अाप्पानी स्थळं शोधलं अाणि एक चंद्र माझ्या अाभाळात चिकटवुन दिला. अाई-बाप म्हणाले बस झालं अाता जवळपासच्या शहरात नोकरी शोध. दुरच्या शहरात वेगळी भाषा, वेगळे वळण , वेगळ्या पद्धती ह्या भोळीला मानवतील नाही मानवतील देव जाणे. पण अामच्या गावी म्हणावा तसा पाऊस नाही पण हे कारण देणंही शक्य तर नव्हतं.माझाही चंग नव्हता पण प्रयत्न करायला काय जातंय म्हणुन तिला विचारुन पाहिलं. ती तशी शिकली सवरलेली पण खुप नोकरी वैगेरेचा तिचा अट्टहास नव्हता.अगदी साधारण चारचौघाचं असतं तसं अामचं जोडपं. तिच्या अाणि घरच्या संमतीने अाहे त्याच पावसात ...अ ! अाय मीन अाहे त्याच शहरात अाम्ही राहु लागलो. तीला हवं तसं हवं तितकं घर सजवु दिलं. संगीताची अावड म्हणुन तशी शिकवणी सुरु केली. पण अगदीच गावाकडुन नव्या शहरात ते ही तिस-याच भाषेत त्या मुळे हळुहळु तिची छुपी नाराजी दिसु लागली. तशी तीने कधी बोलुनही दाखवली नाही.पण मलाच ती गोष्ट कधी कधी खटकायची. सवय झालं की सगळं सुरळीत होईल ह्या अाशेवर अाम्ही दोघेही होतो. ती जिव
तोडुन सवय लाऊ पहात होती अाणि तिचा हा असा जिव तोडणं मला अावडत नव्हतं. मग शेवटी निर्णय घेतला माझं अावडतं शहर जिथे मी म्हातारा होण्याचे स्वप्न पाहिले होते ते सोडायचा अाणि तिला विचारलं " राणी, हे शहर सोडुया का? अापण अापल्या गावाजवळच्या शहरात जाऊया ? हे बघ अाजच पेपरला एक जाहिरात अालीय. मोठ्या कंपनीत ,माझ्याच हुद्दयाचे अाणि इतक्या किंवा देवाच्या कृपेने जास्त पगारात मिळु शकेल नोकरी. पुढच्या अाठवड्यात मुलाखत अाहे. तू म्हणत असशील तर जाऊया का? " ती जास्त काही बोल्ली नाही पण तीच्या डोळ्यात पाऊस होता.
- प्राजक्त
दै सामना-२१/जून'१४
तोडुन सवय लाऊ पहात होती अाणि तिचा हा असा जिव तोडणं मला अावडत नव्हतं. मग शेवटी निर्णय घेतला माझं अावडतं शहर जिथे मी म्हातारा होण्याचे स्वप्न पाहिले होते ते सोडायचा अाणि तिला विचारलं " राणी, हे शहर सोडुया का? अापण अापल्या गावाजवळच्या शहरात जाऊया ? हे बघ अाजच पेपरला एक जाहिरात अालीय. मोठ्या कंपनीत ,माझ्याच हुद्दयाचे अाणि इतक्या किंवा देवाच्या कृपेने जास्त पगारात मिळु शकेल नोकरी. पुढच्या अाठवड्यात मुलाखत अाहे. तू म्हणत असशील तर जाऊया का? " ती जास्त काही बोल्ली नाही पण तीच्या डोळ्यात पाऊस होता.
- प्राजक्त
दै सामना-२१/जून'१४
nice!!
ReplyDelete