.......
“……पण मी काय म्हणते ? मुलं नोकरीधंद्याला लागली कि अाईवडिलांनी अापले निर्णय लादु नये ना? देवाने अक्कल दिली अाहे ना? काय वाटतं तुला ?" माझ बसमधला प्रवास चालु होता तेव्हा शेजारी बसलेल्या एका टापटाप मुलीशी जुजबी अोळख निघाली “अोह यां यां ! तुमच्या मागच्या वी-चारच्या प्रयोगाला अाले होते मी,मस्तच झाला होता शो” नंतर अोळख अजुन वाढली कारण “अरेच्या तुम्ही तमक्याचे-अमुकांचे-फलाण्याचे-ढि
'हवामानाचा पॅटर्न बदललाय त्याला कोण काय करणार ? 'बिटी चिंतांच्या' बी-बियाणांची पैदास तणमाजोरी झालीय. अतीवापरामुळे मातीचा पोत अाणि पत खाली आलीय. अाताशा ‘मुठी’ उगवण्यागत मातीची पत राहिली नाही. 'अाता कोणती पिके घ्यावी?’ ह्यावर अनेक राष्ट्रांकडुन स्वयंस्पष्ट मतं मागावलीय. तोवर बारा सदस्यीय समितीला परत सिंगापुर,इंडोनेशि या अाणि बॅंकॉकचा अर्धवट सोडुन यावा लागलेला दौरा करावा लागेल. परवानगी मिळावी. संबंधित दस्ताऎवज जोडलेला. अभ्यास दौरा करतांना काही नागरिकांचे मत नोंदवले अाहे त्यातील एका नागरिकाचे मत पुढीलप्रमाणे. एक जख्खड वृद्ध ज्याच्याकडे जमीन जुमला म्हणुन एक चिमटीतली आणि एक कानशिलामागची बिड़ी होती. त्या वृद्धाने सांगितलंय कि
जिथे प्रश्न रुजतात तो मातीच्या ‘टोपोसाईलचा’ थर, जिथे सर्वाधिक उपयुक्त पोषक घटक असतात तो उघडा पडलाय.
नव्याने कोणताही अादर्श ह्या मातीत रुजवला गेला नसल्याने अाणि मातीमध्ये उपजत असलेल्या पोषक घटकाची प्रमाणापेक्षा जास्त शोषण झाल्याने Nutrient Defeciency तयार झाली अाहे. अाणि ह्या अपुर्ण पोषित किंवा कुपोषित मातीमधुन निघणा-या वाफेतुन जे काही ढग तयार झाले अाहेत त्या ढगांमुळेच यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त अाठ्या पडल्या अाहे. नव्या अादर्शांचा अतिरिक्त पुरवठा करणे क्रमप्राप्त अाहे परंतु त्याचाही अनुषेश इतक्यात भरुन निघेल अशी शक्यता कमीच."
गाडीने एकदम ब्रेक मारला. आणि मी क्रांतीकारी झोपेतून जागा झालो. पेपर तसाच हातात होता. सरासरीपेक्षा जास्त पावसाची बातमी आणि बाहेरचं वातावरण एकमेकांना पुरक होतं. मुंबई महामार्ग स्थानक जवळ येत होतं. मी शेजारच्या काकांना विचारलं 'तुम्ही दरवर्षी वारीला जातात पण दर वर्षी काहीतरी तक्रार असतेच. कधी घशाला कोरड पडावी इतका दुष्काळ तर कधी भरल्या ताटात धक्का लागुन चूकुन पाण्याचा ग्लास कलंडुन झालेला विचका. तरी का वाट पाहता दर वर्षी आषाढीवारीची ? एव्हाना महामार्ग बस स्थानक आलं. पाऊस चालुच होता. मी पावसाचा जोर ओसरावा म्हणुन थांबुन राहीलो. काका पावसाची पर्वा न करत एका हाताने धोतर धरुन झपाझप पावलं टाकत दिसेनासे झाले. जाता जाता त्यांनी उत्तर दिलं "ते आमचं आपसातलं आहे" त्याच्या त्या उत्तरामध्ये मला आधी भेटलेली मुलगी आणि आता भेटलेले काका दोघं दिसले आणि काही ओळी मनात उमटल्या.
पाऊस आला न आला , हे आमचे आम्ही पाहु.
ते विठ्ठल आणि माझे , आपसातील भांडण आहे.
....लोकांच्या 'अापसातील'च्या व्याख्या किती बदलतात नाही ?
- प्राजक्त
- प्राजक्त
( महाराष्ट्र टाईम्स २० फेब्रुबारी २०१५ )
http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=20022015004008
No comments:
Post a Comment