Thursday, February 19, 2015

अापसातील ( मटा २० फेब १५)


.......
“……पण मी काय म्हणते ? मुलं नोकरीधंद्याला लागली कि अाईवडिलांनी अापले निर्णय लादु नये ना? देवाने अक्कल दिली अाहे ना? काय वाटतं तुला ?" माझ बसमधला प्रवास चालु होता तेव्हा शेजारी बसलेल्या एका टापटाप मुलीशी जुजबी अोळख निघाली “अोह यां यां ! तुमच्या मागच्या वी-चारच्या प्रयोगाला अाले होते मी,मस्तच झाला होता शो” नंतर अोळख अजुन वाढली कारण “अरेच्या तुम्ही तमक्याचे-अमुकांचे-फलाण्याचे-ढिकणे अाहात ? धिस इज अमेझिंग ! सच्च अ स्मॉल वर्ल्ड ! ” मग मला जेव्हा तिने अापणचा,तुम्हीचा,तू केला त्यानंतर तिने तिच्या चिडचिडीची रद्दीच बाहेर काढली. (मनात म्हटली ही असेल ‘हां भैय्या तोलो इसको अौर बतावो कितना दिया. इंग्लीश पेपर हय हां निटसे बतावो ) तिच्या बापुड्या अाईला म्हणे मागल्या मंगळवारी स्वप्न पडलं होतं कि मुलीची तब्येत ठिक नाही. मग अाईने हिच्याकडे धोशा लावला कि 'एकदा येऊन जा.नजरे खालुन गेली म्हणजे बरं असतं.’ असं उगाच काहीही कारण काढुन बोलवलं म्हणुन ह्या देवीचा त्रागा चालु होता. नंतर हिने तिच्या आणि आईमधलं आपसातील झालेली भांडणं ती कशी जिंकली हे सांगत माझ्या १७ डुलक्या वाया घालवल्या. नशिबाने देवी पुढ्च्या स्थानकावर अंतर्धान पावल्या. परत मला डुलकी लागली. प्रवासातली माझी झोप ही इतकी शिघ्र अाहे कि ‘पुढे गतीरोधक अाहे’ ह्या पाटीनंतर जेव्हा खराखु-या गतिरोधकावर गाडी अादळते तेव्हा माझी झोप मोडलेली असु शकते. असो. तर मुद्दा असा कि माझा बस मधला कंटाळवाणा प्रवास चालुच होता. नंतर एक उभा असलेला गृहस्थ माझ्या शेजारी बसला. तो शेतकरी होता हे त्याने ‘व्यापा-याकडुन पैसे अाणयला गेलो होतो मुंबईला. पण भूंड्या पावसामुळे खप नाही पाहिजे तसा. म्हणुन नाही मिळाले पैसे…’ हे सांगितल्यावर कळालं. मध्ये-मध्ये थोडा कंटाळा अाला कि मी मोबाईल वरुन फेसबुक चाळत होतो. अाताशा कोणी कधी कसं वागावं ह्याला ताळमेळच राहिला नाही. म्हणजे बघा हिवाळ्यात पाऊस पडतोय , पावसाळ्यात ठिक्कं ऊन होतं , हां उन्हाळ्यात सुर्य जरा दहा-तेरा हजार किमी अलीकडे सरकलाय कि काय इतकं ऊन होतं. मग अशातच अगदी नको तेव्हा ,नको तितका पाऊस अाला कि कुणीतरी बरळतं फेसबुकवरुन “wow its pakoda time….Feeling चिंब-बिंब वगैरे” .पुर्वी लोक काही घडले कि लोकांना सांगायचे. अाता ह्या सोशल नेटवर्किंगमुळे लोकांना सांगायला काहीतरी घडवतात. प्रवास चालुच होता.मला प्रवासात खिडकी व्यतिरिक्त कोणाशी बोलायला अावडत नाही. मी शेजारच्या काकांकडुन पेपर घेतला अाणि वाचत बसलो.  “यंदा राज्यात सरासरी पेक्षा जास्तच आठ्या पडल्या”.सगळीकडे किचकीच वगैरे….कुणी कडमडलं...कुणी बडबडलं…..काहींचं तोंड वाकडं झालं. सालाबादाप्रमाणे विठ्ठलाला साकडं झालं. मग सरकारने स्थापलेल्या बारा सदस्यीय समितीने बॅंकॉक अाणि पट्टायाला अभ्यास दौरा काढला.  बारा सदस्यांनी बारा महिन्यांतुन वेळ टोलवत कसाबसा डिसेंबरात दौरा अाटोपला. डिसेंबरअखेर अहवाल अालासुद्धा. निष्कर्ष पुढिलप्रमाणे : 
'हवामानाचा पॅटर्न बदललाय त्याला कोण काय करणार ? 'बिटी चिंतांच्या' बी-बियाणांची पैदास तणमाजोरी झालीय. अतीवापरामुळे मातीचा पोत अाणि पत खाली आलीय. अाताशा ‘मुठी’ उगवण्यागत मातीची पत राहिली नाही. 'अाता कोणती पिके घ्यावी?’ ह्यावर अनेक राष्ट्रांकडुन स्वयंस्पष्ट मतं मागावलीय. तोवर बारा सदस्यीय समितीला परत सिंगापुर,इंडोनेशिया अाणि बॅंकॉकचा अर्धवट सोडुन यावा लागलेला दौरा करावा लागेल. परवानगी मिळावी. संबंधित दस्ताऎवज जोडलेला. अभ्यास दौरा करतांना काही नागरिकांचे मत नोंदवले अाहे त्यातील एका नागरिकाचे मत पुढीलप्रमाणे. एक जख्खड वृद्ध ज्याच्याकडे जमीन जुमला म्हणुन एक चिमटीतली आणि एक कानशिलामागची बिड़ी होती. त्या वृद्धाने सांगितलंय कि
जिथे प्रश्न रुजतात तो मातीच्या ‘टोपोसाईलचा’ थर, जिथे सर्वाधिक उपयुक्त पोषक घटक असतात तो उघडा पडलाय.
नव्याने कोणताही अादर्श ह्या मातीत रुजवला गेला नसल्याने अाणि मातीमध्ये उपजत असलेल्या पोषक घटकाची प्रमाणापेक्षा जास्त शोषण झाल्याने Nutrient Defeciency तयार झाली अाहे. अाणि ह्या अपुर्ण पोषित किंवा कुपोषित मातीमधुन निघणा-या वाफेतुन जे काही ढग तयार झाले अाहेत त्या ढगांमुळेच यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त अाठ्या पडल्या अाहे. नव्या अादर्शांचा अतिरिक्त पुरवठा करणे क्रमप्राप्त अाहे परंतु त्याचाही अनुषेश इतक्यात भरुन निघेल अशी शक्यता कमीच." 
गाडीने एकदम ब्रेक मारला. आणि मी  क्रांतीकारी झोपेतून जागा झालो. पेपर तसाच हातात होता. सरासरीपेक्षा जास्त पावसाची बातमी आणि बाहेरचं वातावरण एकमेकांना पुरक होतं. मुंबई महामार्ग स्थानक जवळ येत होतं. मी शेजारच्या काकांना विचारलं 'तुम्ही दरवर्षी वारीला जातात पण दर वर्षी काहीतरी तक्रार असतेच. कधी घशाला कोरड पडावी इतका दुष्काळ तर कधी भरल्या ताटात धक्का लागुन चूकुन पाण्याचा ग्लास कलंडुन झालेला विचका. तरी का वाट पाहता दर वर्षी आषाढीवारीची ?  एव्हाना महामार्ग बस स्थानक आलं. पाऊस चालुच होता. मी पावसाचा जोर ओसरावा म्हणुन थांबुन राहीलो. काका पावसाची पर्वा न करत एका हाताने धोतर धरुन झपाझप पावलं टाकत दिसेनासे झाले. जाता जाता त्यांनी उत्तर दिलं "ते आमचं आपसातलं आहे" त्याच्या त्या उत्तरामध्ये मला आधी भेटलेली मुलगी आणि आता भेटलेले काका दोघं दिसले आणि काही ओळी मनात उमटल्या. 
पाऊस आला न आला , हे आमचे आम्ही पाहु.
ते विठ्ठल आणि माझे , आपसातील भांडण आहे. 
 ....लोकांच्या 'अापसातील'च्या व्याख्या किती बदलतात नाही ?

- प्राजक्त
( महाराष्ट्र टाईम्स २० फेब्रुबारी २०१५ )
http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=20022015004008

No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...