Friday, April 10, 2015

ट्राफीकनामा ( मटा ११ मार्च १५)

उफराट्या स्टाईलने लाईफ जगणं वेगळं अाणि अस्सल जगण्याला स्टाईल म्हणुन जगत राहिलं कि होते ती लाईफस्टाईल वेगळी. पण हा साधा रस्ता शहराच्या घाई गदारोळात अाणि चमचमत्या मॉल्सच्या थाटात हरवत चाल्लंय.
कसंय शहरात उद्यानं नाही अाणि असलीच तर भकास. ती उद्यानं कचराकुंडीवरच्या पावसासारखी दिसतात. गोदाघाटावर कोणाकोणाच्या वाट्याचं धुणं धुत बसलेली नदी नंतर ह्याच पावसाने वाहत राहते. ह्या नदीच्या एकदम मध्याभागी एखादी शिळा बांधता अाली पाहिजे. जिथे फक्त एकाला उभं राहायची जागा असावी अाणि त्या जागेवर उभं राहायला महानगरपालिकेकडुन अागाऊ बुकींग करावं लागावं. मग खळखळत्या पाण्यात सुर्यडुबीला एकांतात अशा शिळेवर जाऊन उभं राहल्यावर कळतील शहराला वेड लागण्याची कारणं.
सिग्नल पाळणे म्हणजे तर भित्रेपणाचं लक्षण झालंय. तुम्ही शहाण्या बाळासारखे सिग्नलवर उभे राहतात अाणि मागची घायकुतीला अालेली जमात तुम्हाल हैराण करुन सोडते. अाणि जाता जाता ऎकु जाईल अशा अावाजात ‘हरिश्चंद्राची अौलाद…!’ अशी शिवी ही हासडतील. ह्या अशा घायकुतीच्या जमाती असो कि सिग्नलवरची निराश झालेली हरिश्चंद्रांच्या अौलादी असो हे सगळेजण सिग्नलवर फुगेवाल्यांसारखेच सैरभैर दिसतीलच. अाजकाल ह्याच सिग्नलवर एकवेळ तृतियपंथीयांची फरशीवर फरशी अापटावी अशी स्पष्ट टाळी ऎकु येईल पण ट्राफिक पोलीसाची शिट्टी कुठेच ऎकु येणार नाही. अशात ही बेबंद ट्रॅफिक सिग्नल्स वेडी नाही तर काय होणार?
सिग्नलवरच्या बेबंद रांगेत उभं राहणं म्हणजे भिक्षेपात्र घेऊन उभं राहणं अाहे कि काय इतका कमीपणा वाटु लागलाय. पुर्वी 'अाज सुट्टी अाहे' म्हणुन बाहेर पडाणारे अधिक असायचे. अाता 'अाज सुट्टी अाहे गर्दी,गजबज जास्त असेल' म्हणुन घरात टिव्ही समोर ध्यान लाऊन बसलेले अधिक असतात. एखाद्याच्या मागे जाऊन उभं राहणं हे ना अापणाला मान्य असतं , ना कुणी अापल्या पोरांना हे शिकवतं. अाधीपासुनच मुलांना हेच शिकवलं जातं कि नेहमी रांगेच्या पहिल्या टोकाला तुम्ही कसे असले पाहिजे. मग त्यासाठी त्यांना लावा कराटे क्लास, लावा वैदिक मॅथ्स, लावा डान्स क्लास, लावा गायनाचा ध्यास. अरे काय चाल्लंय काय? मग अशाने शहरातली मुलं वेडी नाही तर काय होणार ?
नाक्यावरचं कचराकुंडीच्या ठिकाणी ‘ कचरा कचराकुंडीतच टाका’ ही पाटी ‘ कचरा कचराकुंडीच्या अासपास टाकला तरी चालेल’ अशी वाचुन तिथल्या वासाच्या घाणीने चार फुटावरुन कचरा भिरकवुन दिला जातो. मग त्या कच-यामधले कागदाचे बोळे, कांद्याचे टरकलं सैरभैर होतात अाणि फेर धरुन ट्रॅफिक तुंबलेल्या शहराच्या भटकंतीला निघतात. अाणि शहराच्या अाडोशाला जिथे अाधीच पाऊस तुंबलेला असतो तिथे जाऊन विसावतात. अाधीच तुंबलेलं, ही नवी विटंबना, अशाने पावसाला वेड नाही तर काय लागेल? 
अाताशा कोणाला कुठे पोहोचायचं असेल तर वेळेत निघायची जबाबदारी वेळ देणा-याची असते. कारण वेळ देणा-याने अर्धा तास अगाऊची सांगायला पाहिजे हे गृहितक जवळ जवळ ठरलेलं असतं.  चार वाजता भेटायची वेळं ठरली कि माणसं चारला भांग पाडतात. मग उशीराने चिडचिडत घर सोडुन सगळे निघतात. अाणि दिसेल त्याच्यावर डाफरत रस्त्याने प्रवास करत राहतात. खरतरं शहरात चेहरे कमी अारसे जास्त फिरतात. तुमची चिडचिड,तुमची शिवी, तुमचं स्मित, तुमचा खळखळाट फिरुन परत तुमच्याकडेच येतो. अाता अायुष्यभर 'अाजकाल पुर्वीसारखे अारसे मिळत नाही बाजारात' अशी तक्रार करत राहिले तर अारशांना वेड नाही तर काय लागेलं?
गंमत अशी अाहे कि ह्या शहरात घाई सगळ्यांना अाहे पण पोहोचायचं कुठंच नाही. अशाने शहराला वेड नाही लागेल तर काय?

- प्राजक्त ( मटा ११/०४/१५)


No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...