अाजकालच्या धक्काधकीच्या लाईफस्टाईलमध्ये ….. हो हो ! 'धक्का’धकी म्हणायचंय मला ‘प्रिंटींगमिस्टेक' किंवा माझं अशुद्धलेखन नाही ते . म्हणजे कसंय दर दुस-या दिवशी कसलीतरी ब्रेकिंग न्युज, कुठेतरी धक्कादायक बातमीचा 'अाखों देखा हाल’ अापल्या फोनवर चित्रासकट येतो. तर अाजकालच्या ह्या धक्काधकीच्या लाईफस्टाईलमध्ये अापली अभिव्यक्ती अाणि संवेदनांची तिव्रता कमी झालीय का? असा प्रश्न पडु लागलाय. शुद्ध मराठीत म्हणायचं झालं तर 'अापल्या इमोशन्स अाणि फिलींग्जची इंटेंसीटी कमी झालीय का ?’ म्हणजे काहीही घडो, कितीही तीव्र असो पण अात खळबळ शून्य.
श्वास अाणि उच्छवासाप्रमाणे नियमित अंतरावर मोबाईलचा मेसेज बॉक्स शुकशुक करुन बोलवत राहतो. एखादा किरकोळ विनोद असो किंवा एखादी ‘पुलं लेवल’ची कोटी असो, वाचणारा गंभीर मुद्रेने, शुन्य नजरेने रिप्लाय देतो LOL. LOL म्हणजे असं सांगायचं असतं कि मी इकडे खळखळुन हसलो. किंवा असाही रिप्लाय जातो ROFL. ROFL म्हणजे अरे तुझ्या विनोदामुळे मी इकडे जमिनीवर गडाबडा लोळुन हसतोय. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती अशी कि चेह-याचे भाव शून्य, नजरेतला अानंद शून्य अाणि महत्वाचं म्हणजे अात खळबळ शून्य.
रस्त्यांने चालणारे दिसतील. चालतांना पावलांचे अावाज कमी अाता किपॅडचे अावाज जास्त येतात.सगळेच ‘अंगठेबहाद्दर'.कधी कुणाला अानंद किंवा काळीज पिळवटणारं दु:ख झालंच तर अाधी 'स्टेटस अपटेड’ होतो मग ग्रुप मेसेज मध्ये बातमी जाते. नंतर प्रत्यक्ष घरात बातमी सांगितली जाते. अशा प्रकारे मानसिक अाधार पण अाता व्हर्च्युअल झालाय.जेवण महत्वाचं कि टिव्ही ह्या संभ्रमात जेवत जेवत टिव्ही बघतांना किंवा टिव्ही बघत बघत जेवतांना ‘अाणखी दोन शेतक-यांची अात्महत्या’ ही बातमी चालु असतांना दुसरा घास कालवलाच कसा जाऊ शकतो हे माझ्यासाठी कोडंच अाहे. अशा वेळेस चॅनेल बदलाल पण डोक्यातला विचार खरकट्या हातासारखे धुवू नाही शकत. नंतर हात धुतांना बेसिनच्या नळाचीही खळबळ होते पण अापल्या अात खळबळ शून्य.
लहानपणी गिरकी गिरकी खेळायचो. वर आभाळाकडे बघत, मागे मान टाकुन गर गर गिरकी घ्यायची. मग थांबलो कि समोरचे सगळे जग एकमेकांत मिसळून जायचे. पांढ-यांत लाल, लालमध्ये पिवळा, बिल्डिंगमधे रस्ता, रस्तामधुन ढग, ढगामधुन पिंपळाच्या पारंब्या सगळं जग उलट पालट होऊन जायचं. अंगणात चाफ्याचं झाडं होतं. गरगरत जात आधार म्हणुन त्याला धरलं कि परत हळूहळू सगळं जागेवर यायचं. अाता अाधाराला अंगण नाही, अंगणामध्ये चाफा नाही. चाफा अाणि मोबाईल दोन्ही सायलेंट मोडवर. अाणि सायलेंट मोड असल्याने अात खळबळ शून्य
कुणी म्हणेल तंत्रशिक्षण पुढारलं अाहे वगैरे वगैरे. हो पुढालंय ना. सगळं जग पुढे जातंय वगैरे वगैरे.हो जातंय ना. मग जर तेच अापण अंगिकारलं तर चुकलं कुठे वगैरे वगैरे?नाहीच चुकलं पण गुलॹार म्हणतात तसं पानं उलटवतांना जीभेवर जी पुस्तकपानांची चव रेंगाळते ती मजा ह्या क्लिकमध्ये कुठे हो? तंत्र नको सोडुया पण छोट्या गोष्टींमधली मजा तशीच अनुभवुन पाहु. इतकंच कि मित्राकडे गेल्यावर नेहमीसारखं घराखालुन मिस् कॉल देण्याऎवजी त्याला पुर्वीसारखा एकदा तार स्वरात अावाज देऊन पाहु. टिव्हीवरच्या कॉमेडी नाईटसोबत कधीतरी तळहातावर भवरा फिरवल्यावरची हुळहुळसुद्धा अनुभवुन पाहु. एसी जिममध्ये ट्रेडमीलवर घाम घाळतोच पण एखाद्या सकाळी जिमखान्याच्या रस्त्यावरचा गुलमोहर तुडवुन पाहु. चालतांना शेवटचा घाम कधी अाला होता ? पळतांना पायात शेवटचा गोळा कधी अाला होता? हसतांना पोटात शेवटचा मुरडा कधी अाला होता ? मिश्किलपणे मित्राच्या डोळ्यात संत्र्याचे साल शेवटचं कधी पिळलं होतं ? पिंपळाची सळसळ शेवटची कधी ऎकली होती ? ह्या प्रश्नांचा मागेमागे गेलं कि सापडेल खरं उत्तर. कोणत्या प्रश्नाचं उत्तर ? हाच प्रश्न कि 'अात शेवटची खळबळ कधी झाली होती ?'
- प्राजक्त ( मटा १८ एप्रिल १५)
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31833&articlexml=18042015004023
No comments:
Post a Comment