Sunday, April 16, 2017

झालं अास्सं अासलं कि.... ( मटा मोहर१७ एप्रिल)

.... झालं फक्त असं आसंल कि तो गारपीटग्रस्त शेतकरी वावरात गेला आसंलमुताचा पण ओघळ हू देणारी, पाण्यासारखं जे पाताळ येईल त्याला पाऊस म्हुन प्यून घेणारी मराठवाडी जमीन. त्यांचं कणीस पण कापूस आणि ऊस पण कापूस. वावरात पांढरं प्हाची सवय हुती त्याच्या डोळ्यांनला. ह्या खेपेला पण त्याला गेल्या गेल्या ह्येss सग्गळीकडं पांढरं पांढरं दिसलं आसंल. वितभर जमिनीत एवढाल्ले कापुस? माॅलमधल्या सिनेमाच्या इंटरवलीला पाॅपकाॅर्न फसफसावे तसे ? गडी हरखला आसंल. पैसाच पैसा. तोंडात चिरुट शिलगल्याचं स्वप्न पहात त्यानं कानाची बिडी फेकुनच दिली आलं. एवढाल्लं पांढरं पाहुन जाऊन बिलगलाच आसंल. पण येरवी 'ममईला जाताना काम हू दे रे' असं म्हणीत जी वावरातली मुठभर माती कपाळाला लावयचा तिथंच आता ओंजळभर थंड बर्फ हाती लागला आसंल. म्हणजे लुकसानीच कि परत !
आता लुकसानीला राजाच्या कानी घालणं गरजेचं असतंय कि नाई
मग तोच ओंजळभर बर्फ पुरावा म्हणुन मंत्रालयात घ्यून गेला आसंल. आता त्याचंच शेत आस्तं तर ठाऊक आस्तं कि व्हिर कुटंय, बुजगावनं कुटंय. तिथं मंत्रालयाच्या बिल्डींगीत राजाचं दालंन हुडकाया टाईम गेला आसनंच कि ? हुडकल्यावर बोंबला आसंल "लुकसानी द्या !" 
राजानं अदबीने विचारलं आसंलहे बळीराजा सर्वात अाधी नमन तुला. अाता सांग, कसली नुकसानी हवी रे तुला ? "
हा बोंबला आसंल " हे प्हा ! याची." पण तिथं मुठ उघडून पाहतो तो काय 'मुठ मोकळी?' हाय का अाता झाली ना पंचाईत.
आत्ता तर गार चटका होता हाताला, हात बधिरुन गेलेले.
मग गारा गेल्या कुठं?
आता लुकसानीची भरपाई कोणत्या तोंडानं मागणार?  'मंत्रालयाच्या साव्व्या मजल्यावर येईस्तो मुठ पॅकबंद ठुवाची' ह्या प्रतिज्ञेत कुठंच कसुर नव्हती तरी पण हे आक्रीत घडलं कसं?
'पांढरा कापुस नाही, बर्फ हुता' हे कळाल्यावर जसा भैसाटला तसाच 'मुठीत बर्फ नाही, गारट बधीरता हुती' हे कळाल्यावर भैसाटला आसंल
मंग क्येला आकांडतांडवघोष्णा-बिष्णा धील्या अासंन, ईंड्रेल प्युन घ्यायची धमकी धीली अासंल, बिल्डिंगीच्या गच्चीवरुन उडी मारायची धम्की धीली अासंल. मोक्कार अाकांडतांडव.
अय ! मंत्रालयाच्या साव्व्या मजल्यावर यून आकांडतांडव? संविदानाच्या विरोदाते हे ? हाणतेच्यायलातेचा ! निबार हाणला
एका फटक्यात मातकट शर्टावर(जो पुर्वी ढवळा आसंल) लाल लाल डाग. आणि आपल्याकडं फेल आत्महत्यावाल्याच्या हातात मानसोपचार मददीवाल्याचा पत्ता देण्याआधी आत्महत्याच्या  गुन्ह्याची नोंद टेकवली जाते. हे माहीत नसेल त्याला. नवखं दिसतंय ते. गेलं परत. ममईला यायचे दोन कारणं झाल्ये अासतीन त्याला एक मंत्रालयात अाणि एक पोलीस टेशनात हजेरी.
 अाता वावरात बसल्या बसल्या एका हाता गुन्हा नोंदवल्याचा कागद अाणि गारांचा केलेला बर्फगोळा हातात धरुन बसल्यावर त्याला कागद जास्त गारधोंड वाटला अासंन.
उद्या देवबिवकृपेने त्याच्या फूटभर जमिनीत खंडीभर कापुस उगला तरी तो कापुसच आहे कि बर्फ ह्याची शहानिशा त्याने आधी करायलाच हवी कि नको. अाणि खिशात दोनशे रुपायची गोची अासली तरी बर्फ नेतांना तिनशे ब्हात्तर रुपायचा बेसिक थरमासामधी न्यायला पाहिजे कि नको ? तर असंय सगळंम्हून त्याला झालेली मारहाण ही बरोबरचे म्हना असं प्रायमरीत तरी वाट्टंय

तर येकंदरीत असं झालं असंल असं आपलं मला वाटतंय ब्वा ! ते मरो दे ! अायपेल च्या एॅडा सुरु झाल्या टिव्हीवर पाहिल्या का ? यंदा निस्ता धुमशान अासंन प्हायं !

- प्राजक्त । २५ मार्च २०१७


No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...