Thursday, June 1, 2017

कुसुमाग्रजांच्या अखेर कमाईवरुन (विडंबन कि वास्तव)


मध्यरात्र उलटल्यावर
मंत्रालयातील पाच फायली
एका पायरीवर बसल्या
आणि टिपं गाळू लागल्या .
बीफबंदी म्हणाली," शेवटी मी झाले,
फक्त बेअकली जमावाची.”
नोटबंदी म्हणाली,"मी
फक्त डिजिटल धनदांडग्यांची."
सेंसोरबोर्ड म्हणाली," मी
फक्त असंस्कृत संस्कृतीरक्षकांची ."
दारूबंदी उद्गारली," मी तर
फक्त ५००मीटर अातल्यांची.”

शेतकरी हमीभावच्या फाईलने गळ्यातील गहिवर आवरला
आणि ती म्हणाली,
‘तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक वजन तरी
तुमच्या फायलीच्या पानांशी आहे.
माझ्या पानांशी मात्र
फ़क्त सरकारी धांडोळ्यातील लालफिती’
- प्राजक्त देशमुख


( तात्यासाहेबांचा आाशिर्वाद घेऊन)

No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...