विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो ऽऽ !
हा विंचू चावल्यावर 'काय मी करु?' अशी निदान विचारणा तरी होते. मग एकनाथ बुवा कोणता विंचू चावल्यावर काय उतारा घ्यायचा ते सांगतात.
पण औरंगाबादच्या 'संत एकनाथ नाट्यमंदीराच्या' ढिसाळ नियोजनाचा आणि सांस्कृतिक अनास्थेचा विंचू कितेक रंगकर्मींना चावुन झाला. चावलेल्यांनी बोंबाबोंब करुन ठणाणा करुन झाले. पण उतारा सोडाच निदान 'कोण बोंबलतोय' ह्याकडे साधे ढुंकूनही पहाण्याचे धारीष्ट्य औरंगाबाद महानगरपालिकेकडे नसावे हे अगम्य अाहे.
प्रशांत दामलेंनी मागे ह्याच रंगमंदिराच्या मोडक्या व्यवस्थेचे फोटो टाकले होते. पण हा ‘विंचुचावा’ पालिकेला इतका सवयीचा झाला असावा कि विंचवाच्या ह्या विषाची पालिकेच्या निबर शरीराला सवय झाली असावी. ह्या विषाबद्दल पालिकेच्या शरीरात आता ‘अॅन्टीरेझिसटन्सी’ तयार झाली आहे.
दामलेंनी एकदा नाशिकच्या कालिदास बाबत हेच केले होते. पण तिथली यंत्रणा खडबडून जागी झाली आणि काही कोटी रुपये पालिकेने मंजुर करुन आता जुलै २०१७ पासुन कालिदास रंगमंदिर नुतनीकरणासाठी बंद होत आहे. ह्यात दामलेंची रंगभुमीविषयची अास्था अाहेच पण स्थानिक रंगकर्मी, महत्वाची वृत्तपत्रे यांनी हा विषय एेरणीवर घेतल्यामुळे हे शक्य झाले. अाणि अर्थात नाशिक पालिका यंत्रणेने हि टिका जिव्हारी लावुन घेतली अाणि लागलीच कामाला लागले हेही नसे थोडके.
पण औरंगाबादच्या 'संत एकनाथ नाट्यमंदीराच्या' ढिसाळ नियोजनाचा आणि सांस्कृतिक अनास्थेचा विंचू कितेक रंगकर्मींना चावुन झाला. चावलेल्यांनी बोंबाबोंब करुन ठणाणा करुन झाले. पण उतारा सोडाच निदान 'कोण बोंबलतोय' ह्याकडे साधे ढुंकूनही पहाण्याचे धारीष्ट्य औरंगाबाद महानगरपालिकेकडे नसावे हे अगम्य अाहे.
प्रशांत दामलेंनी मागे ह्याच रंगमंदिराच्या मोडक्या व्यवस्थेचे फोटो टाकले होते. पण हा ‘विंचुचावा’ पालिकेला इतका सवयीचा झाला असावा कि विंचवाच्या ह्या विषाची पालिकेच्या निबर शरीराला सवय झाली असावी. ह्या विषाबद्दल पालिकेच्या शरीरात आता ‘अॅन्टीरेझिसटन्सी’ तयार झाली आहे.
दामलेंनी एकदा नाशिकच्या कालिदास बाबत हेच केले होते. पण तिथली यंत्रणा खडबडून जागी झाली आणि काही कोटी रुपये पालिकेने मंजुर करुन आता जुलै २०१७ पासुन कालिदास रंगमंदिर नुतनीकरणासाठी बंद होत आहे. ह्यात दामलेंची रंगभुमीविषयची अास्था अाहेच पण स्थानिक रंगकर्मी, महत्वाची वृत्तपत्रे यांनी हा विषय एेरणीवर घेतल्यामुळे हे शक्य झाले. अाणि अर्थात नाशिक पालिका यंत्रणेने हि टिका जिव्हारी लावुन घेतली अाणि लागलीच कामाला लागले हेही नसे थोडके.
नाशिक पालिका जागी झाली कारण ती झोपली होती. औरंगाबाद पालिका झोपेचं सोंग घेत असावी अशी दाट शंका येते.
'हंडाभर चांदण्या'च्या प्रयोगाच्या निमीत्ताने हा अनुभव आला. प्रवेशालाच जाहिरातीसाठी बोर्ड ठेवण्याच्या जागेपासुनच आबाळ सुरु होते. आत गेल्यावर सगळीकडे धुळीचं साम्राज्य. संडास बाथरूममधली दुर्गंधी, बॅसिनचे भांडे गायब, दुस-या ठिकाणी बेसिन होते पण नळ गायब, मोढे-लेव्हल्सची दुर्दशा तर अफाट, पाण्याचे मशिन धुळखात, नाटकासाठी लागणारे साधे टेबल-खुर्ची उपलब्ध नाही, प्रकाशयोजना हा प्रकार रंगमंदिरात प्रयोगासाठी आवश्यक असतो हेच ह्यांना ठाऊक नसावे की काय अशी शंका येण्याइतपत भीषण परिस्थिती आहे. पर्यायी बाहेरुन प्रकाशयोजना मागवावी लागते पण ती पुरवणारे पण निव्वळ कामचलाऊ अाणि मद्दड, त्यात परत रंगमंदिराच्या वायरीच्या जंजाळात शॉर्टसर्किट, चालु प्रयोग अंधार झाल्यामुळे थांबावावा लागणं आणि स्टेजवर शिडी(घोडा) आणुन वायरींगच्या जाळ्यातुन दुरुस्ती करणे आणि पुन्हा 'पाॅज' वर असलेले नाटक सुरु होणे हे नाट्यमंदीरासाठी किती लाजिरवाणे आहे अाणि नाटकाच्या फ्लोसाठी किती किळसवाणे अाहे. एखादे मांजर चालू नाटकात राजरोसपणे शतपावली करत रंगमंचावर फिरत असते. मनपाच्या शाळेतले तांदळांचे गोदाम आहे कि रंगमंदीराचे ग्रीनरुम? अशी बकाल अवस्था. खुर्च्यांचा पत्ताच नाही, जमिनीवर फतकल घालुन बसा अाणि करा मेकअप.
असे असुनही हि अडथळ्याची शर्यत पार करत नाटकानंतर औरंगाबादकरांनी उभे राहुन मानवंदना दिली. एक स्थानिक ज्येष्ठ रंगकर्मीं ताईंनी सर्वांसमक्ष 'रंगकर्मी म्हणुन हे नाटक पहाता आलं हे भाग्य आहे पण औरंगाबादकर म्हणुन नाट्यगृहामुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल लाज वाटते.’ असे जाहिर उद्गार काढले.
एका स्थानिक नाट्यकर्मीला समस्त औरंगाबादकरांतर्फे बाहेरुन येणा-या संघाची रंगमंदिरच्या आबाळतेमुळे जाहीर माफी मागावी लागते हे एका शहरासाठी किती दुर्देवी आहे. प्रयोगानंतर प्रत्येक रसिक येऊन कौतुक करत होता पण एकनाथच्या दुरावस्थेबद्दल शहराचा नागरिक म्हणुन खजिल होत उसासे सोडत होता.
एका स्थानिक नाट्यकर्मीला समस्त औरंगाबादकरांतर्फे बाहेरुन येणा-या संघाची रंगमंदिरच्या आबाळतेमुळे जाहीर माफी मागावी लागते हे एका शहरासाठी किती दुर्देवी आहे. प्रयोगानंतर प्रत्येक रसिक येऊन कौतुक करत होता पण एकनाथच्या दुरावस्थेबद्दल शहराचा नागरिक म्हणुन खजिल होत उसासे सोडत होता.
'किती वर्षापासुन पालिका एकाच पक्षाकडे आहे' असं काही बोललं तर मग त्याला राजकिय स्वरुप प्राप्त होईल. पण ते ही वास्तव आहे. इतकी वर्ष शहराच्या सांस्कृतिक उत्थानासाठी रंगमंदीरांचे रुपडे पालटण्यापेक्षा शहराच्या नामकरणावर शक्ती खर्च करण्यात वाफा दवडणा-यांकडुन फार अपेक्षा ठेवणे उचित नाही.
शहराची एक सांस्कृतिक भुक असते जी पुर्ण न झाल्यास शहराचे बौद्धीक कुपोषण वाढायला लागते. शहरातले रंगकर्मी, नाट्यरसिक ह्यांना आवाज बुलंद करण्याची गरज आहे.
समाजाला मनोरंजनातुन प्रबोधन करणारे आणि भारुडं लिहणा-या, एकनाथांचा वारसा सांगणा-या शहराला आणि रंगमंदीराला हे दिवस यावे हे अनाकलनीय आहे.
औरंगाबाद नाट्यरसिकांनी दिलेल्या प्रतिसादाला नमन. त्यांचा हा रंगमंदिराच वनवास लौकर संपो हि संत एकनाथाकडे प्रार्थना.
एकनाथ रंगमंदिर म्हणत असेल ...
विंचू चावला वृश्चिक चावला । अनास्थेचा विंचू चावला । तम घाम शहरासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
पालिका इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा । आळसगुण मागे सारा । इच्छाशक्ती लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
कर्म उतारा देऊन । अवघा सारिला आळसगुण । किंचित राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥
- प्राजक्त २६ जुन २०१७
- प्राजक्त २६ जुन २०१७
No comments:
Post a Comment