Friday, December 18, 2015

बॅकबेंचर्स : २२ अखिल अाटपाट साहित्य संमेलन

तर झालं असं कि अाटपाट नगरात मराठी साहित्य संमेलन येऊ घातलं होतं. त्या निमित्ताने अध्यक्षांसोबत छोटेखानी चर्चासत्र अायोजित झालं. नगरात मी साहित्यिक असल्याची दबकी चर्चा होती. म्हणुन मला तिथे बोलवलं. चर्चासत्र सुरु झाले. अापापले प्रश्न विचारा असा एक अावाज अाला. सर, तुमचे साहित्य क्षेत्रातले योगदान काय? अध्यक्षश्री वदले " कित्येक साहित्य संमेलानात मी वक्ता म्हणुन गेलोय ,परिसंवादात सहभागी होतो, अनेक साहित्यिकांचे प्रश्न अाणि मुळ म्हणजे साहित्याच्या मुळप्रवाहात नसलेले ज्वलंत प्रश्नांना अाणण्यासंदर्भात मी विचारप्रबोधन करतो" ( माझे कान एेकलेल्या गोष्टींची टोटल लावत बसलेले) दुसरा प्रश्न : सर, तरुणांना मराठी साहित्याकडे वळवण्यासाठी काय करतो अाहोत ? " "तरुण ही अाजची शक्ती अाहे ,तरुणांचे प्रश्न ज्वलंत अाहे पण तरुणांना शेतक-यांचे प्रश्न माहित अाहे का ? का वंचित अाहे शेतकरी ? खेड्यातील साहित्य कुठे अाहे ? ( माझा मेंदू एेकलेल्या गोष्टींची सुसुत्रता लावत बसलेला ) तिसरा : सर, अचानक राजकारणातुन साहित्य क्षेत्रात यावंस का वाटलं ? " माझं मन नेहमीच हळवं होतं, अामचे श्रेष्ठी नेहमीच म्हणतसे कि पंत ,तुम्ही बुवा फारच हळवे. म्हणुन अाम्ही साहित्यात अालो. ( माझ्या मेंदूतले दोन्ही, डावे अाणि उजवे लोब्स् शहारले) चौथा प्रश्न : सर ,तुमची मराठी साहित्या समृद्धीसाठी पुढिल उपाययोजना काय ?  " शेतकरी कुठे अाहे ? शेतातली अोल कुठे अाहे ? शेताच्या वंचना कुठे अाहे ? कुठे अाहे मातीचं संचित ? अामच्या पक्षा....अापलं ते हे अामच्या साहित्य संमेलनाच्या नियामक मंडळाने काही ठोस पावलं उचलायचे ठरवले अाहे ते अाम्ही उचलुच पण सांस्कृतिक विण कशी अाणखी घट्ट होईल तेही अाम्ही बघु , इतकेच नाहीतर सांस्कृतिक अस्पृश्यता म्हणुन जी काही ह्या साहित्याला किड लागु पाहतेय त्याचं अाम्ही समुळ उच्चाटन करु अाणि त्यासाठी भरघोस निधीची मागणी अाम्ही केली देखील अाहे" ( माझा कानातुन रक्त येतंय का हे मी हळुच चपापलं )
पाचवा प्रश्न : तुमचा अावडता साहित्यिक कोण ? " अापल्या नांगराच्या लेखणीने जो जमिनीच्या पानावर सुंदर काव्य लिहतो तो प्रत्येक शेतकरी माझा अावडता साहित्यिक अाहे ( मी बसल्या बसल्या खुर्चीचा कापुस उकरला) चला चहा घेऊ या ! असं म्हणत ह्या चर्चासत्र नावाच्या लघुकथेचा शेवट झाला. अाणि हे सगळं मी तिथेच 'शेवटच्या खुर्चीवर' बसुन फक्त टिपत होतो. गेल्या तासाभरात नवोदित अप्रकाशित लेखकांचं भांबावले पण संमेलन कसं सोडवेल ?,  ज्यांच्या जिवावर साहित्य पसरतंय त्या प्रकाशकांची मदत कशी करता येईल ? काळाच्या पडद्या अाड जाणारं कुठेही लिखित नसलेलं लोकसाहित्याचं काय ? ह्याचा पुसट उल्लेख कुठेही अाला का हा विचार मी शेवटच्या खुर्चीवर करतच राहिलो.


- प्राजक्त (दै सामना )
१५ डिसेंबर १५

No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...