एकदा असं झालं , एेन उन्हाळात पाऊस अाला . बिचा-याची धांदल उडाली.. मग त्याने छोट्या टोप्यांना पालथं करुन होड्या म्हणुन वाटल्या. नंतर असं झालं एेन हिवाळ्यात रांजण उलथावं तशी उन्हं सांडली त्याने हातमोज्यांची विण उसवुन टोपी केली. एकदा तर एेन पावसाळ्यात कोरडी ठाक थंडी पडली. मग त्याने त्याच्याकडच्या सगळ्या कागदी होड्या शेकोटीत भस्म केल्या अाणि त्याभोवती शेकत बसला.
माणसांच ठिक होतं पण अाता ऋतुंचा पण भरवसा नाही ह्या विचाराने तो व्यथित होता. त्याच्या जवळच्या पोटलीत तो अाताशा तिनही वस्तु जपुन ठेवत असतो. कोणी सांगावं कधी कोणता ऋतु सुरु होईल.
हळुहळु त्यांचा ह्या सगळ्यावरचा विश्वास उडु लागला. आणि फक्त कागदी होड्या बनवण्याचा सपाटा सुरु केला. एक होडी तर खरीखुरी बनवली. आणि तेच घर. दिवसभर त्याच बसायचा. रात्री होडी उपडी करुन त्याखाली झोपायचा. येणाजाणा-यांच्या लेखी तो वेडा होताच, आता ठार वेडा झाला. मग त्याने कुठल्या तरी मरणासन्न अवस्थेत पडलेल्या एका कुत्र्याच्या छोट्या पिल्लाचा जीव वाचवला.आणि आपल्या घासातला घास त्याला काढुन दिला . नंतर एखाद्या नाक्यावरच्या जाहीरातीतल्या पोस्टरवर दिसावं तितकं ते पिलू गुटगुटीत दिसु लागलं. आता तो , त्याच्या होड्या आणि कुत्र्याचं पिलु असे तिघं नांदत होते. त्या कुत्र्याचं नावं ठेवलं हेत पृथ्वी, सगळ्या कागदी होड्यांवर एकच शब्द लिहला होता. ग्लोबल वाॅर्मिंग ग्लोबल वाॅर्मिंग. ग्लोबल वाॅर्मिंग.
" हि मागच्या बाकाची पोरं म्हणजे अगदीच डॅंबिस आहे. आता हा पहा , असा कधी निबंध असतो? ग्लोबल वाॅर्मिंग विषय दिला होता."
मॅडमने त्या बॅकबेंचरच्या निबंधाला शून्य मार्क दिले .
No comments:
Post a Comment