" किती ही काम येऊ , माझ्याच्यानं उरकतं नीट व्यवस्थित. आषाढाला तर केवढी लेकरं येतात! , एकपण जेवल्या बिगर जात नाही. तसंही रायांना पण आवडणार नाई कुणी उपाशी पोटी माघारी गेलं तर" अठ्ठावीस युगांच्या अनुभवामुळे जरास्सं रापलेलं विस्तिर्ण कपाळ, कपाळी रुपया शिक्क्या इतकं भलं मोठं कुंकू , त्यावर ठसठशीत तीन रेषा. पांढ-या केसांवर विसावलेला पदर, ठराविक वेळेनंतर डोक्यावरचं पदर सारखा करण्याची लकब अाणि पदर सारखा करतांना येणा-या बांगड्यांची किण्किण सावरत रूक्माई बोलत होती.
झालं असं कि पंढरीत गेलो तेव्हा नेहमीची वाट मोडुन आधी रुख्मायकडे गेलो. दिंडीरवनातुन रुक्मीणी रुसुन आली आणि लखुबाई झाली. मग लखुबाईला कुणी रुख्माई म्हणेल, कुणी रखुमाई, कुणी रुक्मीणीच. शांत बसुन राहीलो. वेळ कसा गेला कळालं नाही. भान आलं तेव्हा दर्शन वेळ संपुन मंदिर दरवाजे बंद झाले होते. मी डावीकडच्या कोप-यातल्या मिठीभर मोठ्या दगडी खांबा पल्याड असल्याने कोणाला दिसलो नाही. थोडं इकडे तिकडे वाट शोधून शेवटी मी गाभा-यात शिरलो. तिथे जास्त आश्वस्थ ,शांत वाटायला लागलं मग विचार आला इथेच पडी टाकु आणि पहाटे काकडा आटोपून परतीला निघु.
झोपण्याआधी परवानगी घ्यावी म्हणुन म्हटलं " रखुमाई , आज रात्रीपुरती विठ्ठल होती का? म्हणजे झोपायला आजचा आसरा देती का ?" माई म्हणाली ," वा रे लेका ! आसरा देणार मी आणि तरी 'विठ्ठल होता का?' विचारुन शेवटी सगळं पुण्य त्यांच्या खात्यात ना ? लई शाहजोग झालाय हो तू " मी म्हणालो " तसं नाही आई , आपली एक पद्धत म्हणुन बोललो ग " मग ती 'गम्मत केली रे' अशा अर्थाने डोळे मिचकावत डोकीपदर सारखा करत हसली. तिथेच कोप-यात घोंगडी आंथरुन देत म्हणाली " हां , तू पड इथं. संकोचु नको .तो वर मी काहीतरी खायचं पाहते तुझं" मला भूक लागलीय हे तिला कसं कळालं वगैरे असले फालतू प्रश्न मला पडले नाही. पण जे प्रश्न पडले होते ते तिच्या नजरेतून सुटले नाही. ती पीठ मळत म्हणाली 'हां बोल बोल ...कशाला अडखळलाय? "
झोपण्याआधी परवानगी घ्यावी म्हणुन म्हटलं " रखुमाई , आज रात्रीपुरती विठ्ठल होती का? म्हणजे झोपायला आजचा आसरा देती का ?" माई म्हणाली ," वा रे लेका ! आसरा देणार मी आणि तरी 'विठ्ठल होता का?' विचारुन शेवटी सगळं पुण्य त्यांच्या खात्यात ना ? लई शाहजोग झालाय हो तू " मी म्हणालो " तसं नाही आई , आपली एक पद्धत म्हणुन बोललो ग " मग ती 'गम्मत केली रे' अशा अर्थाने डोळे मिचकावत डोकीपदर सारखा करत हसली. तिथेच कोप-यात घोंगडी आंथरुन देत म्हणाली " हां , तू पड इथं. संकोचु नको .तो वर मी काहीतरी खायचं पाहते तुझं" मला भूक लागलीय हे तिला कसं कळालं वगैरे असले फालतू प्रश्न मला पडले नाही. पण जे प्रश्न पडले होते ते तिच्या नजरेतून सुटले नाही. ती पीठ मळत म्हणाली 'हां बोल बोल ...कशाला अडखळलाय? "
मी विचारलं "माई, फोटो,ग्रंथ-गाथा,आख्यायिका-भजनात सगळीकडे विठ्ठल-रुख्माई असंच ऐकलं - वाचलंय पण पंढरीत तुम्ही वेगळाले का? "
" बाईईई..., एवढ्याशा जीवाला पेच किती रे ? डोक्यात इतक्या बाभळी ठेऊ नये. चल ,आधी जेवून घे" असं म्हणत रुख्माई चुलीत निखारे फुंकत आणि पुनव-अवस,पुनव-अवस करत भाक-या आलथ्या पालथ्या करत बोलायला लागली . " इतक्या वेळ डोक्यात बाभळ ठेउ नये. पिकेस्तोवर काटा पायात ठेउ नये. बघं कसंय थोडं चिडले होते त्यांच्या वर एकदा उगा. म्हणुन तडक रुसुन मागे जाऊन बसले. खरं सांगु का हे रुसणं-बिसणं निमित्त होतं .खरं माझ्या डोक्यात होतं कि कृष्ण जन्माच्या वेळी मी रुक्मीणी होते पण जगात नाव त्या राधीचंच झालं. मनात सुप्त इच्छा होती कि असं प्राकृतपेक्षा नावारुपाने युगानुयुगं राया सोबत नाव जोडुन पहावं.भले मग लांब राहु पण जसं राधाकृष्ण आहे तसं विठ्ठोबा-रखुमाई पाहु. मग तसं झालंही . पण तुला सांगते आपल्याला चांदण्यांचं अप्रुप पण त्यासाठी आभाळाला अंधार भोगावा लागतो तसंय हे. माझ्या वाटेला नावासकट जगणं अालं पण ती राधी काय भोगत असेल तिची तिच जाणो. मी मागे बसुन सगळं बघत असते. हेऽऽ गर्दीचे लोट पंढरीरायांच्या मागच्या दरवाजातुन माझ्या दारी येतात . त्याच्या चेह-यावरचं भारावलंपण लपत नाही. माझ्यासमोर येऊनही त्यांचं रुप पाहिल्याचा आनंद त्यांच्या चेह-यांवर दिसतो मला. 'तिथं' गेलं कि भारावणं अालंच मग तो निळसर कान्हा असो कि काळा विठू. कधी कधी हेच वैष्णव लोक भजनात दंग होऊन तल्लीन होतात अाणि नाचु लागतात तेव्हा त्या गर्दीत कोणाच्या तरी मागे येऊन विठुराया डोकावुन गेल्याचा भास होतो . नाचता नाचता कंबरेवर हात ठेऊन उंच उड्या मारत 'ठ्ठला ईठ्ठला' ह्या तालावर नाचणारे बालगोपाल पाहिले कि डोळ्यासमोर सहस्त्र पांडुरंग असल्याचा भास होतो. भास ? " मी म्हणालो " पण माई , देवाला राग,लोभ नसतो ना मग तू तरी चिडली कशी ?" " रुख्माई हसली म्हणाली , दैवबिव वलंय सारुन बरं का चिडता येतं , अंतर असलं तरच अावेगाने भिडता येतं. दोन बोटांमध्ये अंतर अाहे म्हणुन सख्याची बोटं त्यात मावतात अाणि एकवेळ सांधता येते हे द्वापारयुगात शिकवलंय यांनीच मला . आणि तेव्हा शिकले ही बरंच . वारक-यांची भरल्या डोळ्यांची गर्दी माझ्या समोर येते.तेव्हा त्याच्या भारावल्या डोळ्यात त्यांनी अात्ताच पाहुन अालेला पांडुरंग तरळत राहतो. मग मी बुचकाळ्यात पडते. कारण त्यांच्या डोळ्यात जर पांडुरंग दिसतो तर मी म्हणजे पांडुरंग कि पांडुरंग म्हणजे मी? मग मी उभ्या उभ्या पायच्या अंगठ्याने खाली वीट चपापते. वीट असली तर ? पण इतक्या वर्षात ठिसुळ झालेली वीट आता असेल नसेल ? मग वैष्णवांनी टेकवलेलं डोकं उचलंल कि मी त्याच्या डोळ्यातले सावळे ढग पाहुन मनोमन त्याच्या पाया पडते.हे असं सगळं समाधान लाभतं आणि असा सगळा त्रासही..."
जेवणखान आटोपत हात धुवून निवांत बसतांना मी म्हटलं " आई ? जर द्वापारवेळी इतका त्रास झाला होता तर आता पुन्हा त्यालाच का निवडावं ग तू ? "
रुख्माई म्हणाली " पुन्हा ? पुन्हा वगैरे असं काही नसतं रे. पारिजातकाच्या खाली बसल्यावर हि ओंजळीत फुलं पडणार आणि झाडाखाली बसलेला नसाल तरी वा-याचा झुळूकेने ते ओंजळीत येणारंच. एकदा झोकुन द्यायचं म्हटलं कि तीर काय आणि तळ काय.
मुकामार 'निळा'शार निबर होत 'काळा' होतो. "
इतकंच.
-प्राजक्त देशमुख
इतकंच.
-प्राजक्त देशमुख
व्वा !!!
ReplyDeleteअप्रतिम !!!!