सरांच्या कानातुन धूर येत असावा असा मला भास झाला. पण कदाचीत ते कानावरचे थरथरणारे केस असावेत अशी मी उभ्या उभ्या स्वत:ची समजुत घातली. ( "कानावर केस असणारे मोठे विचारवंत अाणि हुशार असतात बरंका!" उगाच अाजोबांचे शब्द अाठवले)चोरट्या नजरेने वर्गातल्या कोप-यातल्या टिळकांच्या फोटोला मनातल्या मनात नमन केले. सर म्हणाले " तुझ्या अशा सांगण्यामुळे सगळे पालक भांडायला अाले अाहे, " त्यानंतर सर निमुट माझ्या जागेवर मागच्या बाकावर बसले अाणि म्हणाले सांग रावण विजेता कसा सांग ?" मी सुरु झालो " प्रत्येक राजाची अशी अट असते कि शत्रु राजाने अापल्या राज्यात पराभुत झाल्या शिवाय किंवा मेल्या नंतरच पाय ठेवावा. अाणि वैकुंठनरेश विष्णुचा अवतार असलेल्या प्रभु रामाने लंकेत पाय ठेवला तेव्हा रावणाने प्राण सोडले होते. शिवभक्त रावणाला त्याच्या निष्ठेमुळे मरणोत्तर वैकुंठात जावे लागले.म्हणजेच प्रभु रामाच्या हयातीत रावणाने श्रीहरीरामाच्या राज्यात प्रवेश केला होतात.सबब रावणाने टेक्निकली युद्ध जिंकले." सर वैतागुन उपरोधाने म्हणाले "हे परम ॹानी मुला, हे असले ॹान चुक कि बरोबर च्या पलीकडे ठेवुन इतरांसोबर वाटायचे धाडस का केलेस? तुझे ॹान मेण अाहे ते असे पेटवुन वितळुन जाईल. जपुन ठेव."
मुख्याध्यापक सर त्यानंतर अाठवडाभर रजेवर होते.