Monday, October 26, 2015

बॅकबेंचर्स : १४ मेणबत्ती ( सामना २४ अॉक्टोबर १५)

झालं असं कि मुख्याध्यापकच्या कॅबीनबाहेर मोठा गदारोळ चालु झाला.पालकांची गर्दी झाली. शिक्षकदिना नंतरचा दुसराच दिवस." शाळेत असं काहीही शिकवतात का ?" वगैरे असे प्रश्न विचारत पालक लोकं हात नाचवत भांडत होते. कसं बसं सगऴयांना अात बसवलं अाणि शांत केलं. मुख्याध्यापक सरांनी विचारलं "नक्की अडचण काय अाहे ? " मग एक एक जण बोलु लागला. मग सरांना लक्षात अालं कि हि सर्व मंडळी एकाच वर्गातल्या विद्यार्थ्याीची अाहे. मग सरांनी सगळ्या पालकांना कॉन्फरंस रुमला वाट पहायला लावली. सर स्वत: ज्या वर्गाचा हा गोंधळ होता तिथे गेले तुकडी 'फ' . तिथे जाऊन चालु तास थांबवुन मास्तरांना बाहेर थांबायला सांगितलं. वर्ग बंद केला. अाणि खड्या अावाजात प्रश्न विचारला " काल शिक्षकदिनाला 'सामान्या ॹान' हा विषय कोण शिकवत होतं ? " शेवटच्या बेंचवरुन मी हळुच हात वर केला. "पुढे ये" ढग गडगडावे तसा सरांचा बेस मधला अावाज गडगडला. मी बुचकाळ्यात पडलो. पहिल्या बेंचवरचा ढापण्या जसा 'संत चेहरा' करुन बसलेला असतो तसे निरागस भाव मी डोळ्यापुढे अाणायचा प्रयत्न केला. मग मुख्याध्यापक म्हणाले " रामायणात राम-रावणा युद्धा मध्ये कोण जिंकलं ?" कोणी २+२ किती ? इतका सोपा प्रश्न विचाराल्यावर जितके निवांत होतात तितका निवांत झालो. अाणि नजरेत नजर रोखुन,शाबासकीच्या अपेक्षेने उत्तर दिलं " रावण" 
सरांच्या कानातुन धूर येत असावा असा मला भास झाला. पण कदाचीत ते कानावरचे थरथरणारे केस असावेत अशी मी उभ्या उभ्या स्वत:ची समजुत घातली. ( "कानावर केस असणारे मोठे विचारवंत अाणि हुशार असतात बरंका!" उगाच अाजोबांचे शब्द अाठवले)चोरट्या नजरेने वर्गातल्या कोप-यातल्या टिळकांच्या फोटोला मनातल्या मनात नमन केले. सर म्हणाले " तुझ्या अशा सांगण्यामुळे सगळे पालक भांडायला अाले अाहे, " त्यानंतर सर निमुट माझ्या जागेवर मागच्या बाकावर बसले अाणि म्हणाले सांग रावण विजेता कसा सांग ?" मी  सुरु झालो " प्रत्येक राजाची अशी अट असते कि शत्रु राजाने अापल्या राज्यात पराभुत झाल्या शिवाय किंवा मेल्या नंतरच पाय ठेवावा. अाणि वैकुंठनरेश विष्णुचा अवतार असलेल्या प्रभु रामाने लंकेत पाय ठेवला तेव्हा रावणाने प्राण सोडले होते. शिवभक्त रावणाला त्याच्या निष्ठेमुळे मरणोत्तर वैकुंठात जावे लागले.म्हणजेच प्रभु रामाच्या हयातीत रावणाने श्रीहरीरामाच्या राज्यात प्रवेश केला होतात.सबब रावणाने टेक्निकली युद्ध जिंकले." सर वैतागुन उपरोधाने म्हणाले "हे परम ॹानी मुला, हे असले ॹान चुक कि बरोबर च्या पलीकडे ठेवुन इतरांसोबर वाटायचे धाडस का केलेस? तुझे ॹान मेण अाहे ते असे पेटवुन वितळुन जाईल. जपुन ठेव."  
त्यावर मी उत्तरलो "दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. "
मुख्याध्यापक सर त्यानंतर अाठवडाभर रजेवर होते.

- प्राजक्त 
(दै. सामनासाठी )


No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...