शेवटी मित्रमंडळीच्या शंका कुशंकांना वाव देत चाललेला लपंडावाला पुर्णविराम देत त्या दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतलाच. तसाही कित्येक वर्षांपासुन दोघांच्या कुटूंबांमध्ये घरोबा होताच. त्यामुळे भेटीगाठी ह्या अगदीच नावाला उरल्या होत्या. अाता एक अौपचारिक बैठक ठरली. इतिहासाने नोंद ठेवावी अशी वरपक्ष अाणि वधुपक्षाची न भुतो न भविष्यती अशी कांदेपोह्यांची बैठक.
तसे दोघांच्या कुटूंबांत जातपात हा विषय नगण्य होता. पण योगायोगाने दोघं समकुलिन असल्याने प्रेमविवाहात कळीचा ठरणारा तो ही मुद्दा चर्चापटलावर अाला नाही. " गर्मी काय वाढलीय ना ? " पासुन तर "धीस ब्लडी सिस्टिम इज करप्ट" पर्यंत सर्व गप्पा झाल्या. वरपिता मिश्किलपणे म्हणाले "आपण वर्तुळाच्या त्रिज्येवरच फिरतोय.मुद्द्याच्या मध्यबिंदुबद्दल कोणी बोलतच नाही?" इच्छुक वरवधु सोडुन सगळे गदगद हसले. इच्छुक वरवधु सोपस्कर म्हणुन फिसकले. " अाता मुलांनीच ठरवल्यावर अापण काय करणार" वधुमाता वदल्या. मग वरमाता म्हणाल्या "पण बाई , सांगुन,सवरुन ,विचारलं तरी. नाही का ?" एव्हाना वरवधुच्या डोळ्यांतुन गप्पा चालु होत्या. त्या गप्पा पाहुन वधुची लहान बहिण दात विचकत होती अाणि व़धु तिच्याकडे मोठे डोळे करुन 'गप्प बस्स जरा' असे मुकसंदेश देत होती.वरपिता म्हणाले " पण अामचे महाशय महाअाळशी अाहे. जुलैच्या पहिल्या बुधवारी केस कापायला मागे लागलं तर तो अॉगस्टच्या शेवटच्या रविवारी जातो." वधुमाता म्हणाल्या " अामच्या देवीला तर केस वाढव,केस वाढव म्हणुन थकलो. दुस-या महिन्यात कात्री लावुन येते पार्लरला जाऊन." वरपिता "अहो कॉलेज मध्ये ब्लॅकलिस्टेड होता तो. वडिलांना घेऊन या असं पत्र अालं होतं" वधुने गुंजारव केले " हो पण पुढच्या वर्षी 'सर्वोत्तम विद्यार्थी' म्हणुन पण निवडल होतं त्याला." " अं... त्या कार्यक्रमाला वडिलांनाच घेऊन गेलो होतो" वरदेवास ही पहिल्यांदा कंठ फुटला. सगळे परत मनसोक्त हसले. मग जरावेळ कार्यालय,तारिख,वार,पाहुण्यांची संख्या वगैरे अशी भरकटलेली चर्चा वधुमाताने पुढचं वाक्य टाकुन रुळावर अाणली." हि शाळेत असतांना मला ही बोलवलं होतं. एका मुलीच नाकंच तोडलं होतं तीने. तेव्हापासुन कराटे बंदच केलं बाई अाम्ही तीच" पण वधुने परतवला तसा हा वार परतवायला वराकडे काहीच नव्हतं म्हणुन त्याने फक्त ग्लासभर पाणी रिचवले. "अहो हिला तर पोह्यांचा डबा कुठे ठेवलाय ते सांगता येतं का पहा" असं वधुमाताने सांगतांनाच वधु बहिनीने "घ्या ना समोसे गार होतील" असा अाग्रह केला. वरपिता म्हणाले "अहो अामच्या भगवंताला बाजारातले कांद्याचे भाव तरी ठाऊक असतील का शंका अाहे" अशा प्रकारे तिला 'पोह्यांचा न सापडणारा डब्बा' अाणि 'त्याला कांद्यांचे माहित नसलेले भाव' ही चर्चा "शेवटी बॅकबॅंचर होती वाया कशी जाईल ,पठ्ठी " , " अरे वा ! हा सुद्धा बॅकबेंचर की" इथे येऊन संपली. अाणि वरवधुंनी "लग्न होतंय ना? हां मग बास ! "हा मंत्र पुटपुट होईल ती मानहानी सहन केली.अाणि एकदाचे कांद्यात पोहे न्हाले.- प्राजक्त
Friday, October 2, 2015
बॅकबेंचर्स : ११ कांदापोहे (३ अॉक्टोबर १५)
Subscribe to:
Post Comments (Atom)
अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)
मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...
-
1) Shripad Deshpande : काही-काही गोष्टी लहानपणापासून माझी तंद्री लावणाऱ्या. म्हणजे गरम गरम कातळावर तांब्याच्या पेल्यातून पाणी सोडलं त...
-
जिंदगीभर कोइ गम तो ढो ता नही जख्म धो भी लेगा की दर्द धोता नही खुदको कोस कर कहा मैने अपने अापसे इसकदर कोइ अपनी जान खोता नही ...
No comments:
Post a Comment