Friday, October 16, 2015

बॅकबेंचर्स : १३ प्रश्नचिन्ह (सामना १७ अॉक्टोबर १५)

तो त्याचा उमेदीचा काळ होता. तो पहिल्या बाकावर बसायचा. इन्स्पेक्षन नावाचा भितीघालु प्रकारु त्यावेळी शाळेत होतसे. मराठीच्या सरांनी मोठ्या अभिमानाने त्याला उभं केलं अाणि म्हणाले " याला विचार प्रश्न." त्यांना त्याने जे उत्तर दिलं त्याचा मोबदला म्हणुन त्याची रवानगी शेवटच्या बाकावर झाली अाणि तो प्रथमपुरुषी एकवचनापासुन अंतिम पुरुषी अनेकवचनी झाला. म्हणजे 'हा हुशार मुलगा अाहे' पासुन 'ती सगळी मागची टुकार पोरं' असा बदल झाला.
नव्याने मुल्यशिक्षण नावाचा नविनच तास चालु झाला होता. सगऴयात पहिला वर्ग तो भरायचा. वर्गशिक्षक म्हणाले होते. "उद्या पासुन तुमचा मुल्यशिक्षणाचा पंधरा मिनीटाचा 'तास' घेणार अाहोत.(पंधरा मिनीटाचा तास ? त्याचं बालमन) यामध्ये तुम्हाला समाजोपयोगी अाणि व्यक्तिमत्व विकासासाठी लागणारे मुल्ये शिकवली जातील.अशा विनासायास शंभर पानी वहीतल्या मुल्यांच्या उता-यांचा किती उपयोग होईल याबद्दल माझ्या मनात चिडयुक्त शंका होती. अशातच एकदा मास्तरांना काय लहर अाली ते म्हणाले 'विचारा काही शंका विचारा, कोणताही प्रश्न जो तुम्हाला खुप दिवसापासुन छळतोय ,विचारा. गणीत,इतिहास,सामान्य ॹान काहीही असलं तरी विचारा.' तितकंच त्यांच्या 'जिॹासुपणा' ह्या मुल्याला चालना मिळो हा कदाचित मास्तरांचा अंदाज असावा. तसे नाना प्रश्न येऊ लागले. ' पृथ्वी गोलच कशावरुन ? , पाउस पडतो म्हणजे नेमके काय? , चिंचेला अांबे येतील का ?वगैरे कितीतरी कुतूहल शमवण्याचे काम मास्तर करत होते. अनेकवेळ लाव्ह्यासारखा दाबुन ठेवलेल्या त्याच्यातल्या ॹानपिपासु विद्यार्थ्याने उचल खाल्ली अाणि त्याने निश्चयाने हात उचलला अाणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
 " 'ज' जहाजेचा तर मग 'ण' बाणाचा अाणि 'ळ' बाळाचा कसा ? , प्रत्येक अाईसक्रिमवालाच्या गाड्याचे नाव सांवलिया का? , नवनाथ सोडुन रसवंतीगृहाला इतर नावे का नाही देत? ,जीव मारलेला अाहार मांसाहार मग वनस्पतींना सजीव नाही कशा ? पांढ-या झेब्राला काळे पट्टे असतात कि काळ्या झेब्र्याला पांढरे ? , शाळेच्या पहिल्या दिवशी , पहिलं वाक्य 'भारत माझा देश अाहे . सारे भारतीय बांधव..' मग शाळेत नाव घालतांना जातीचा दाख..... " त्याला मध्येच थांबवत त्या दिवसापासुन त्याची रवानगी झाली थेट मागल्या बाकावर झाली तेव्हा वर्गाच्या डोळ्यात हसुन हसुन पाणी होते अाणि मास्तरांच्या कपाळावर घामाचे.


- प्राजक्त


No comments:

Post a Comment

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...