मागच्या बाकावरचे म्हणजे मागे राहणारे असाच नाही होत. कधी कधी मागे राहुन गेलेले असाही होतो हे मला त्या दिवशी कळालं. संध्याकाळ होऊन गेलेली होती. परतीचं गुरं गोठ्यात , काही हौदाजवळ येऊ उभी राहिली होती. पण त्याला एक वासरु कुठं दिसत नव्हतं. तेच त्याच्या अावडतं वासरु ,तो त्याला 'वसु' म्हणायचा. वसुच्या कपाळावर केशरी किरमीजी रंगाचा ठिपका होता म्हणुन त्याला तो सर्वात प्रिय होता. त्याचे अाईवडिल म्हणाले " येतंय अाण कुठं जातंय ते . चल तू जेऊन घे" मग भरभर जेवुन "अाज खुप झोप येतेय" असा बहाणा करुन तो झोपायला माडीवर गेला. अाणि तिथली त्याची नेहमीची पाच कौल काढुन वरतुन उडी टाकली.तो लगबगीने टोर्च अाणि काठी घेऊन निघाला.
माळरानावर नेहमीच्या रुईजवळ पाहिलं. पाणवठ्यावर पाहिलं. जवळच एका टेकडीवर जिथे तो नसायची शक्यता जास्त होती तिथेही जाऊन पाहिलं. .कितीवर्षापासुन कोरडी विहीर होती. तिथे पडली असेल असा विचार खुप वेळ टाळुन तिथे डोकवायलाच नको असं त्याच्या मनात होत होतं पण शेवटी भिती होती तरी मनामध्ये देवाचा धावा करत करत करड्या विहरीत डोकवुन पाहिलं. तर तिथे ही पहिल्यांदा 'बरं झालं इथं नाही' असं त्याच्या मनातुन उमटलं. एव्हाना रात्र झाली होती. पुर्ण चंद्राची रात्र होती. त्याचे पाय शोधुन शोधुन दगडाचे झाले होते. भिती , अंधार असे विचार त्याच्या डोक्यात शिवले सुद्धा नाही. घरी तो नसल्याने गोंधळ झाला असेल हा विचारसुद्धा त्याला शिवला नाही कारण तो रात्री झोपायला माडीवर गेला कि परत सकाळीच खाली येतसे.
माळरानावर नेहमीच्या रुईजवळ पाहिलं. पाणवठ्यावर पाहिलं. जवळच एका टेकडीवर जिथे तो नसायची शक्यता जास्त होती तिथेही जाऊन पाहिलं. .कितीवर्षापासुन कोरडी विहीर होती. तिथे पडली असेल असा विचार खुप वेळ टाळुन तिथे डोकवायलाच नको असं त्याच्या मनात होत होतं पण शेवटी भिती होती तरी मनामध्ये देवाचा धावा करत करत करड्या विहरीत डोकवुन पाहिलं. तर तिथे ही पहिल्यांदा 'बरं झालं इथं नाही' असं त्याच्या मनातुन उमटलं. एव्हाना रात्र झाली होती. पुर्ण चंद्राची रात्र होती. त्याचे पाय शोधुन शोधुन दगडाचे झाले होते. भिती , अंधार असे विचार त्याच्या डोक्यात शिवले सुद्धा नाही. घरी तो नसल्याने गोंधळ झाला असेल हा विचारसुद्धा त्याला शिवला नाही कारण तो रात्री झोपायला माडीवर गेला कि परत सकाळीच खाली येतसे.
अाताशा गारठा वाढु लागला होता. निळीशार रात्र अाणि सांदीझाडामधले काजवे टपटपु लागले. एक हवेची झुळूक यायची अाणि काजवे हवेत उडायचे. असं वाटायचं चांदण्यांना पंख लागलेत. रात्र गडद झाली पण त्याला घरी परतावंसं वाटलं नाही. त्याने विचार केला इथेच एखाद्या झाला खाली पडी टाकु अाणि पहाटे जरा उजाडलं कि परत शोध सुरु करु. तिथेच चिंचेच्या झाडाखाली तो पहुडला. पाय ठसठसत होते. अंग ठणकत होतं. एका गार झुळूकेत त्याला झोप लागली सुद्धा. झोपेत पण तो वेगवेगळी ठिकाणं फिरुन बघत होता. थंडीची धार वाढली तो कुडकुडायला लागला.नंतर जरावेळाने त्याचीच त्याला उब यायला लागली अाणि तो परत शांत झोपी गेला. झोपेत त्याला असं वाटलं कि तो वसुच्या कुशीत झोपला अाहे. वसु पण थकुन भागुन त्याच्या सोबत झोपी गेलीय. पहाटे पहिल्या प्रहराला त्याच्या तोंडावर कुणीतरी वडाच्या पारंब्या मारल्यागर भास झाला. पण पहाटेची झोप ती कशाला त्याला अावरतेय. तिथेच झाडाखाली बाहेर अालेल्या मुळाला उशाशी अाणखी घट्ट धरुन तो झोपी गेला. जरावेळाने त्याला अर्धजागृत अवस्थेत विचार अाला कि अापल्या चिचेची मुळं इतकी बाहेर तर नाही. अाणि तो वडाच्या झाडाखाली नाही तर चिंचेखाली होता. ताडकन त्याला जाग अाली. पाहतो तर वसु खरोखरच त्याच्या जवळ होती. अाणि तो तिच्याच कुशीत होता. जी त्याला मुळं वाटतं होती ते वसुचे पाय होते. अाणि सवयीप्रमाणे हलवलेल्या शेपटाचा भास त्याला वडासारखा झाला होता. कुठे ? कधी ? कसा ? ह्या विचारात न पडता त्याने वसुला मिठी मारली अाणि घराकडे निघाला. घरी जाताच त्याला अाई म्हणाली "कुठ गेलता सकाळी सकाळी?" तो म्हणाला " अासचं सहजं" अाई "म्हटलं होतं ना येईल कुठं जातंय" त्या दोघांवरुन हात फिरवुन कानावर बोटं मोडुन अाई म्हणाली " वसु ग माझी बाय ती "
-प्राजक्त
No comments:
Post a Comment