Friday, December 25, 2015

बॅकबेंचर्स : २३ निबंध ( सामना २६ डिंसेबर )

तो पावसाळा अाला कि कागदी होड्या वाटायचा , हिवाळा अाला कि इवलुश्शे हातमोजे वाटायचा, उन्हाळा अाला कि छोट्याशा टोप्या वाटायचा. कुणी ते हसत हसत घेतसे , कुणी प्रश्न नजरेने बघतसे ,कुणी घाबरुन त्याला टाळत असे , कुणी त्याला तुच्छतेने झिडकारत असे पण त्याचा हा नित्यक्रम चालुच होता. पांढरी स्वच्छ दाढी पांढरे अस्ताव्यस्त केस, तेल नसल्याने भुरकट भुरकट. पांढरा स्वच्छ सदरा , भटकुन अाताशा धुरकट धुरकट. 
एकदा असं झालं , एेन उन्हाळात पाऊस अाला . बिचा-याची धांदल उडाली.. मग त्याने छोट्या टोप्यांना पालथं करुन होड्या म्हणुन वाटल्या. नंतर असं झालं एेन हिवाळ्यात रांजण उलथावं तशी उन्हं सांडली त्याने हातमोज्यांची विण उसवुन टोपी केली. एकदा तर एेन पावसाळ्यात कोरडी ठाक थंडी पडली. मग त्याने त्याच्याकडच्या सगळ्या कागदी होड्या शेकोटीत भस्म केल्या अाणि त्याभोवती शेकत बसला.
माणसांच ठिक होतं पण अाता ऋतुंचा पण भरवसा नाही ह्या विचाराने तो व्यथित होता. त्याच्या जवळच्या पोटलीत तो अाताशा तिनही वस्तु जपुन ठेवत असतो. कोणी सांगावं कधी कोणता ऋतु सुरु होईल.
हळुहळु त्यांचा ह्या सगळ्यावरचा विश्वास उडु लागला. आणि फक्त कागदी होड्या बनवण्याचा सपाटा सुरु केला. एक होडी तर खरीखुरी बनवली. आणि तेच घर. दिवसभर त्याच बसायचा. रात्री होडी उपडी करुन त्याखाली झोपायचा. येणाजाणा-यांच्या लेखी तो वेडा होताच, आता ठार वेडा झाला. मग त्याने कुठल्या तरी मरणासन्न अवस्थेत पडलेल्या एका कुत्र्याच्या छोट्या पिल्लाचा जीव वाचवला.आणि आपल्या घासातला घास त्याला काढुन दिला . नंतर एखाद्या नाक्यावरच्या जाहीरातीतल्या पोस्टरवर दिसावं तितकं ते पिलू गुटगुटीत दिसु लागलं. आता तो , त्याच्या होड्या आणि कुत्र्याचं पिलु असे तिघं नांदत होते. त्या कुत्र्याचं नावं ठेवलं हेत पृथ्वी, सगळ्या कागदी होड्यांवर एकच शब्द लिहला होता. ग्लोबल वाॅर्मिंग ग्लोबल वाॅर्मिंग. ग्लोबल वाॅर्मिंग.
" हि मागच्या बाकाची पोरं म्हणजे अगदीच डॅंबिस आहे. आता हा पहा , असा कधी निबंध असतो? ग्लोबल वाॅर्मिंग विषय दिला होता."
मॅडमने त्या बॅकबेंचरच्या निबंधाला शून्य मार्क दिले .



Friday, December 18, 2015

बॅकबेंचर्स : २२ अखिल अाटपाट साहित्य संमेलन

तर झालं असं कि अाटपाट नगरात मराठी साहित्य संमेलन येऊ घातलं होतं. त्या निमित्ताने अध्यक्षांसोबत छोटेखानी चर्चासत्र अायोजित झालं. नगरात मी साहित्यिक असल्याची दबकी चर्चा होती. म्हणुन मला तिथे बोलवलं. चर्चासत्र सुरु झाले. अापापले प्रश्न विचारा असा एक अावाज अाला. सर, तुमचे साहित्य क्षेत्रातले योगदान काय? अध्यक्षश्री वदले " कित्येक साहित्य संमेलानात मी वक्ता म्हणुन गेलोय ,परिसंवादात सहभागी होतो, अनेक साहित्यिकांचे प्रश्न अाणि मुळ म्हणजे साहित्याच्या मुळप्रवाहात नसलेले ज्वलंत प्रश्नांना अाणण्यासंदर्भात मी विचारप्रबोधन करतो" ( माझे कान एेकलेल्या गोष्टींची टोटल लावत बसलेले) दुसरा प्रश्न : सर, तरुणांना मराठी साहित्याकडे वळवण्यासाठी काय करतो अाहोत ? " "तरुण ही अाजची शक्ती अाहे ,तरुणांचे प्रश्न ज्वलंत अाहे पण तरुणांना शेतक-यांचे प्रश्न माहित अाहे का ? का वंचित अाहे शेतकरी ? खेड्यातील साहित्य कुठे अाहे ? ( माझा मेंदू एेकलेल्या गोष्टींची सुसुत्रता लावत बसलेला ) तिसरा : सर, अचानक राजकारणातुन साहित्य क्षेत्रात यावंस का वाटलं ? " माझं मन नेहमीच हळवं होतं, अामचे श्रेष्ठी नेहमीच म्हणतसे कि पंत ,तुम्ही बुवा फारच हळवे. म्हणुन अाम्ही साहित्यात अालो. ( माझ्या मेंदूतले दोन्ही, डावे अाणि उजवे लोब्स् शहारले) चौथा प्रश्न : सर ,तुमची मराठी साहित्या समृद्धीसाठी पुढिल उपाययोजना काय ?  " शेतकरी कुठे अाहे ? शेतातली अोल कुठे अाहे ? शेताच्या वंचना कुठे अाहे ? कुठे अाहे मातीचं संचित ? अामच्या पक्षा....अापलं ते हे अामच्या साहित्य संमेलनाच्या नियामक मंडळाने काही ठोस पावलं उचलायचे ठरवले अाहे ते अाम्ही उचलुच पण सांस्कृतिक विण कशी अाणखी घट्ट होईल तेही अाम्ही बघु , इतकेच नाहीतर सांस्कृतिक अस्पृश्यता म्हणुन जी काही ह्या साहित्याला किड लागु पाहतेय त्याचं अाम्ही समुळ उच्चाटन करु अाणि त्यासाठी भरघोस निधीची मागणी अाम्ही केली देखील अाहे" ( माझा कानातुन रक्त येतंय का हे मी हळुच चपापलं )
पाचवा प्रश्न : तुमचा अावडता साहित्यिक कोण ? " अापल्या नांगराच्या लेखणीने जो जमिनीच्या पानावर सुंदर काव्य लिहतो तो प्रत्येक शेतकरी माझा अावडता साहित्यिक अाहे ( मी बसल्या बसल्या खुर्चीचा कापुस उकरला) चला चहा घेऊ या ! असं म्हणत ह्या चर्चासत्र नावाच्या लघुकथेचा शेवट झाला. अाणि हे सगळं मी तिथेच 'शेवटच्या खुर्चीवर' बसुन फक्त टिपत होतो. गेल्या तासाभरात नवोदित अप्रकाशित लेखकांचं भांबावले पण संमेलन कसं सोडवेल ?,  ज्यांच्या जिवावर साहित्य पसरतंय त्या प्रकाशकांची मदत कशी करता येईल ? काळाच्या पडद्या अाड जाणारं कुठेही लिखित नसलेलं लोकसाहित्याचं काय ? ह्याचा पुसट उल्लेख कुठेही अाला का हा विचार मी शेवटच्या खुर्चीवर करतच राहिलो.


- प्राजक्त (दै सामना )
१५ डिसेंबर १५

बॅकबेंचर्स : २१ राधागूज ( दै सामना )

सगळ्यात शेवटच्या दगडावर बसुन राधी कान्ह्याबद्दल विचार करायची. “सगळाच दोष कृष्णावर कसा टाकायचा ना ? काही गोष्टी घडायच्या थोडीच टळतात. अाणि खरंतर सगळे म्हणतात कि तो देव अाहे , त्याला सातासमुद्रापलीकडंच जिथल्या तिथं बसुन कळतं , त्याला भविष्यही दिसतं , विश्व व्यापुनही श्रीशिल्लक उरणारा असा अाहे तो. पण असं असतं तर त्या दिवशी यमुनेवर सोबत जातांना त्याला लागलेली ठेच कशी चुकवता नाही अाली ? तो दगड कसा नाही दिसला ? सातासमुद्रापलीकडंच दिसणा-याला सातव्या वळणावरच दिसु नये ? मी त्याची बासरी गुलमोहराच्या उत्तरेकडच्या वडाच्या ढोलीत लपवली अाहे हे कळायला त्याला शोधा शोधा का करावी लागली ? कसंय कि एखाद्याला सगळ्यांनीच धीट म्हटल्यावर थोडासा निधडं व्हावं लागतं तसं झालं असेल त्याचं ।
कारण स्वत:च स्वत:ला विचारुन विचारुन थकलेल्या कृष्णाला मी अगतिक होऊन कुशीत रडतांना पाहिलंय । तो खेळिया असेलही पण डबडबत त्याच्या गालांवरुन अोघळणा-या पाण्याची चव मला खेळवु नाही शकत। कारण कुणी रोपटं जमीनीत लावुन 'इथं पुर्वीपासुन कशी हिरवळ अाहे' असं सांगुन फसवु शकतं पण त्याच्याच खोलात गेलं तर सगळं खरं-खोटं कळेल, कारण तुम्ही वरचेवर रोपटं लावु शकतात पण रोपट्याची मुळं कुणी खोलवर पसरवु नाही शकतं । म्हणुनच कान्हा जगाला फसवु शकतो मला नाही । देव केल्यावर देवागत वागावं लागतं म्हणुन त्याला मला सोडुन जावं लागलं असेल। 
ज्यांना दिवस सोबत नेत नाही आणि रात्र  सोबत देत नाही अशांची संध्याकाळ होतो कृष्ण.
आणि मग संध्येकडे कुणी वेळचं बंधन घालतं का? प्रत्येक येणा-या लाटेचं परतणं येण्याआधीच ठरलेलं असतं पण म्हणुन किना-यावरच्या  रेतीनं भिजणं थांबवावं का? 
तो मला एकदा म्हणालाही होता "लोक मला असामान्य म्हणतात. मी आज तुला सांगतो मी आहे असामान्य. म्हणजे अतिसामान्य आहे मी. 
स्वभावगुणाच्या सर्वात वरच्या थराचा स्वभावच माझ्याठायी आहे. म्हणजे थोडा आनंदी, काहीसा ख़ुश होणं नाही येत मला. मी होतो आनंदी. ज़रा वाईट होणं मला ठाऊक नाही मी होतो फक्त दुखी. सगळ्यात वरच्या थराचा स्वभाव. कुणी चांगलं वाटणं म्हणजे म्हणजे माझ्यालेखी फक्त प्रेम."

- प्राजक्त १२ डिसेंबर १५ 
दै सामना

बॅकबेंचर्स :२० ग ( दै सामना ५ डिसेंबर १५)

 तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. थोडं मोठं झालो तेव्हा पावसात कागदाच्या बोटीत, वहीतुन अस्ताव्यस्त फाडलेल्या पानांच्या उरलेल्या चुरगळीत सापडलीस. सायकलीच्या निसटल्या चैनीत , तिस-या दिवशी नखात अडकलेल्या ग्रिसच्या काजळीत सापडलीस. पहिल्यांदा जमलेल्या शिट्टीत, रात्री येळंमाळं शिट्टी वाजवतो म्हणुन अाजीने मारलेल्या टपलीत सापडलीस.एकदा रानात सापडलेल्या किड्याच्या शेपटाला दोरी लाऊन हॅलीकॉप्टर म्हणुन उडवण़्यात दोरी सकट तो किडा सकाळी कोळी जाळ्यात सापडला तिथं तू परत हरवलीस.
मधल्या काळात चहाकपाच्या गोल शिक्कयात , दोन बोटांमधल्या धुरातुनही भेटत राहिलीस तू. नंतर  कुणाकडुन काहीतरी हिसकवल्या गेल्यानंतरच्या विद्रोहातही तू भेटलीस. नाकारल्या, टाळल्या गेलेल्या दु:खातही मी म्हणत राहिलो कि “ त्यांना तर कुठेतरी रमायचं होतं पण अाता त्यांचा प्रवासपक्षी तुमच्याकडे जपा किंवा उडवुन द्या.एक दिवस माझीही हिच गत होईल त्या अाधी …. घ्या हा माझा उर अाणि मलाही माझ्या हक्काचा सूरा एकदाचा देऊन टाका." तेव्हा तू निश्चयाने भेटलीस.त्यावेळी तू निसटल्याची नोंद नाही माझ्याकडे.पण धुरकटल्याची अाहे.
मग काळाने घात केला अाणि अापण मोठे झालो. कुणीतरी डोळ्यात पाहिलं अाणि काळजात भरती अोहोटी झाली. मग त्याच कोणीतरी कायमचा निरोप घेतला तेव्हा अावेगाने भिडली अाणि तू सापडली परत. मग सावरीच्या झाडाची पांढरी म्हातारी जशी हळुहळु उडुन जाते तशी तू अलगद नकळत निसटत राहिलीस.अाणि पुन्हा बोटाला धरुन घेऊन गेलीस ते शेवटच्या बाकावर.
मोराचा जन्म लांडोराने प्राशान केलेल्या मोराच्या अश्रुने होतो तसं कारुण्यात गवसणा-या चैतन्यासारखी तू भेटली असावी असंही राहुन राहुन वाटतं. पण मोर म्हटलं कि लोकांना मोरपिस अाठवतो अाणि मोरपिस म्हटलं कि कृष्ण. पण मला मात्र कृष्ण म्हटलं कि रानावनात हरवलेलं,निसटलेलं एक मोरपीस शोधणारा मोरच अाठवतो. हि अजुन एक निसटल्याची खुण.
पण ह्या गवसण्या निसटण़्याच्या लपंडावात……. ग ‘कविते’ तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. 


- प्राजक्त दै सामना 
५ डिसेंबर

Monday, November 23, 2015

बॅकबेंचर्स : १९ शेवटाकडुन सुरवात

काल रात्री लिहता लिहता पेन उघडंच राहिलं अाणि झोपी गेलो.पेन टेबलावरुन घरंगळत खाली पडला अाणि नदी वहावी तशी शाई वहात गेली . मध्यरात्री त्याचा माग घेत घेत निघालो तर एका शाळेत पोहचलो . अनेक वर्ष बंदिस्त असलेली शाळा. जाळं जळमटं, वेली पानं सारुन अात गेलो.

 शाळेच्या बाकड्यावर गिरवलेले XOXO खेळ सापडले , बिना टोपणाचे पेन सापडले तसे बिना पेनाचे टोपनही सापडले , एक शाईची छोटीशी बसकी रिकामी बाटली सापडली , एक गच्च शाईचं भिजलेलं  सुकलेलं थारोळं सापडलं , शाईचा एक तिरकस सपकारा सापडला , बाकाला कच्च बांधलेली रिबीन सापडली.....वेणी बांधली असेल कोणाची तरी. फळ्यावर पुसट गुणाकार,भागाकार, साईन,थिटा,कॉस, प्रमेय सापडली. कौलांमधुन येणारा निळसर प्रकाश सापडला , डाव्या कोप-यात चिमणीचा विस्कटलेला खोपा होता , मागच्या कोप-यात कबुतरांचा घुमत्कार होता त्यांचा खोपा कधीच कुणाला कधी का नाही सापडला देव जाणे.त्यांच देवा सारखं झालं होतं जाणवायचं पण दिसायचं नाही. वैतागुन टेबलवर छडी अापटली होती तेव्हा पुढचा तुटलेला तुकडा सापडला. सणावरात भिंती चौकटींना पताके लावले होते. त्यांचे रंगविटके अवशेष सापडले. मारलेला कागदाचा बोळा , बोळ्यामधे शाळा सुटल्यावर भेटण़्याचे ठिकाण सापडले. महापुरुषांचे फोटो ज्यावर लटकवले ते खिळे सापडले. फोटो नसलेल्या ठिकाणी भिंतीच्या शुभ्र चौकोटी सापडल्या. महापुरुषांचे फोटो उंच टांगायचे हे अाता चुकीचं वाटतं. नजरेच्या सरळ रेषेत ठेवले असते तर 'डोक्यावरचा विषय' म्हणुन सोडुन दिला नसता. ख्रिस्त टांगावे तसे महापुरुषांचे फोटो मुल्यांसकट टांगुन दिल्यासारख्या भिंती अाता भकास वाटतात. फळ्याच्या तळावरुन बोट फिरवल्यावर खडुची भुकटी सरळ रेषेत खाली पडत गेली. तिथेच खाली काही शिल्लकीतले खडु सापडले. शिक्षकांनी त्यांच्या कपाटातुन खडु अाणायला सांगितला कि खडु घेऊन पाण्याची टाकी , स्वच्छतागृह , मित्राचा वरच्या मजल्यावरचा वर्ग, अशी सगळी विश्वभ्रमंती करुन खडु अाणला जायचा. फळ्याचा कोप-यातली पटावर , हजर, गैरहजर अशी बेरीज वजबाकी सापडली ज्यात  पटावर ह्या विचित्र शब्दाचा अर्थ कितीतरी दिवस लावत होतो नंतर कळालं 'पट' हा मुळ शब्द अाहे. 
परिक्षा संपल्या , शाळा सोडायचा दिवस होता तेव्हा मास्तरांनी फळ्यावर लिहलं होतं " उद्यापासुन परिक्षा " हे पुसट शब्दही सापडले. त्यानंतर शाळेची जागाच बदलली अाणि इथे फक्त अवशेष उरले , अाठवणी उरल्या ज्या नंतर पडक्या झाल्या.  सगळं सापडलं पण वर्गाच्या शेवटीची बाकांची रांग नाहिशी होती. बॅकबेंच ?काही मुलं फक्त शिक्षण घेऊन बाहेर पडतात. बॅकबेंचर्स बेंचच्या वृत्तीसकट बाहेर पडतात.

- प्राजक्त २३ नोव्हेंबर २०१५


Saturday, November 21, 2015

बॅकबेंचर्स : १८ तो अाणि हा ( दै सामना २१/११/१५)

हा नोकरीवाला,तो धंदेवाला .हा अगदी गरीब नाही पण व्यवस्थित घर चालु अशी नोकरी, तो गडगंज श्रीमंत असा व्यावसायिक. याची नोकरी म्हणजे ८ तासाचा मालक, व्यवसाय म्हणजे तो २४ तास नोकर.   हा बहाद्दर मेडिकल लिव टाकुन लोणावळ्याला जायला मोकळा,त्याच्या जीवाला घोर मी सुट्टी घेतली तर हे सगळं बघणार कोण ?  ह्याला जरा हात मोकळा करायला वर्षभराचे प्लानिंग करायला लागणार,त्याला पैशाची चणचण नाही. हा घाण्याला जुंपलेला बैल असा याचा समज,तो त्याच्या मर्जीचा मालक असा त्याचा समज.  ह्याला कधी 'सॅलरी हॅज बिन क्रेडीटेड' चा एसएमएस येतो अशी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातली रुखरुख,त्याला महिना संपायला आला की पगार वाटायची कटकट. ह्याला शनिवार रविवार जोडुन येणा-या सुट्ट्यांचं अप्रुप,त्याला सुट्टी माहीत नाही, त्याला सणवारात बॅंकेचे व्यवहार बंद असतील ही चिंता. हा सुट्टी मॅनेज करत चार आॅप्शनमधुन एक देव निवडतो,तो वेळ काढुन देवदेव करत नवे देव हुडकून काढतो.
हा त्याच ट्राफीकमध्ये बसमधून विचार करतोय आयुष्यात एकदा चारचाकी घ्यायचीच ,त्याला ट्राफीकचं,पार्किंगचं टेंशन,तो म्हणतो 'देशात पब्लिक ट्रांसपोर्ट सुधारली पाहीजे'.
कधीकधी ह्याची बायको काही घेऊनच येत नाही म्हणुन वैतागलेली, त्याची बायको काहीही घेऊन येता म्हणुन कंटाळलेली.  कधीकधी हा तिला कुठे घेऊनच जात नाही म्हणुन ती रुसूबाई, तो तिला कुठही घेऊन जातो म्हणुन ती खट्टूबाई . हिला वाटायचं धंदेवाईक मिळाला असता तर बरं होतं, तिला वाटायचं नोकरीवाला मिळाला असता तर किती बरं होत.
ह्याला वाटतं नोकरी सोडुन एखादा धंदा करावा.किती दिवस दुस-यासाठी राबायचं?  ,त्याला वाटतं स्साली नोकरी परवडली जिवाला घोर नाही. 
दोघं एकाच वर्गातले. तो पहील्या बाकावर बसायचा.हा शेवटच्या .
हा नोकरीवाला,तो धंदेवाला. हा पैशावर ताबा मिळवायला झटतोय...जीवाची गरगर , ह्याच्यावर पैशानेच ताबा मिळवलाय.....जीवाला घरघर.

- प्राजक्त 


Monday, November 16, 2015

बॅकबेंचर्स : १७ शुभेच्छा ( त्रासिक ) संदेश ( दै सामना १४/११/१५)

मी त्याला शोधतोय जो घाणेरड्या फोटोशॉपच्या मदतीने शुभेच्छा संदेश बनवत बसलाय अाणि प्रत्येकाच्या मोबाईलवर भस्म्या झाल्यागत पाठवत सुटलाय. अशा लोकांची कल्पकता सकाळी सकाळी अत्यूच्च टोकावर असते का काय कोण जाणे ? सकाळी सकाळी मेसेज बॉक्स उघडला कि पुढिल प्रमाणे काही गोष्टी तुम्हाला दिसत असतील तर तुमची किव करावी तेवढी कमी अाहे.सकाळी सकाळी मोबईलमध्ये असा काही कलाविष्कार बघायला मिळणं म्हणजे किवच. 
गुलाबाच्या दवामधुन उगवणारा सुर्य अाणि पिवळ्याचट्ट रंगात 'गुड मॉर्निंग' लिहलेलं , सुर्यफुलामध्ये प्रकाशमान झालेला अोम , कुठलीशी निरागस मुलगी अंगभर मोत्यांच्या माळा वागवतेय अाणि तिच्या हातात गुड अाणि पायात मॉर्निंग गोंदलंय , एखा्द्या मादक ललनेच्या अोठांच्या जागी गुलाब पाकळ्या फोटोशॉप केल्या अाहे अाणि तीच्या खडकावर झोपलीय त्या दगडांवर गुडमॉर्निंग लिहलंय. ह्या शुभेच्छा संदेशात गणपतीरायाचा जेवढा छळ झालाय तेवढा लहानपणी भावंडांच्या भांडणात कार्तिकाने सुद्धा केला नसेल. उंदराने हातात उचललेला  गणपती, मारुतीने खांद्यावर उचलेला गणपती, गवताच्या पात्यांच्या थेंबामध्ये गणपती, गरुडावर बसलेला गणपती ,गाईच्या डोळ्यातल्या बुब्बुळामध्ये गणपती, डोंगराइतकी मोठ्ठी पिंड खांद्यावर उचलुन नेणारा गणपती अाणि असे बरेच सारे धन्य गणपती. शुभ सकाळ वगैरे ठिक अाहे.पण शुभ दुपार ,शुभ संध्या, रम्य रजनी हे जे काही कॉपीपेस्टियांचे खुळ सगळीकडे अाहे ते अत्यंत त्रासदायक अाहे. एखाद्या गोंडस बाळाच्या खुदूखुदू हसणा-या फोटोवर 'हेहेहेहे गुड नाईट नही कलोगे?" अरे हो बाबा नाही करणार अाणि ज्या उघड्याबाळावर जांभळ्या रंगाचा फॉंट अाहे त्याला तर नहीच कलुंगा मै. 
समुद्राच्या फेसाळत्या लाटेवर शुभ अाणि शिंपल्यावर संध्याकाळ , सलमाननामक एखाद्या नटाच्या अश्रुतुन एखादी विश्वसुंदरी तरळतेय अाणि दिल है तो दुखेगा ही असा संदेश त्याने रात्रीच्या कोणत्या प्रहरी बनवुन एडिट केला असेल हे त्याच्या अोल्या उशीलाच माहित.
बरं असंही अाहे बरका कि रोज एक मेसेज गेलाच पाहिजे नाहीतर त्यांना वाटतं कि मेसेज न मिळालेल्या व्यक्तीला पोट साफ न झाल्या इतकी अस्वस्थता वाटत असेल. म्हणजे असं फक्त पाठवणा-यालाच वाटतं. याच्या रोजच्या दिनक्रमात ब्रशच्या अाधी शुभसंदेश धाडणे अाणि त्याच्या रोजच्या दिनक्रमात ब्रशच्या अाधी ते डिलीट करणे असं ठरलेलं असावं इतकं सगळं सवयीच. बरं एखादं सुंदर निसर्गचित्र , सुंदर पुतळा , सुंदर सुर्यास्त किंवा सुर्योदय किंवा पोर्णिमेचा चंद्र यांना गालबोट लावणारा बटबटीत फॉंट कुठून मिळत असेल बरं. तरी मी येताजाता लोकांच्या खिडकीतले बोर्ड बारकाईने वाचत असतो ह्याच अाशेने कि मला कधी तरी ' येथे सुंदर फोटे बटबटीत करुन मिळतील तसेच जिवाला घोर लाऊन मिळेल' हे वाचायला मिळेल.
मला दाट शंका अाहे कि हे षडयंत्र एखाद्या मागच्याबाका बसणा-या टोळक्यांच असेल अाणि कोण किती वाईट चित्र बनवतो ह्या त्याच्या शर्यतीत ते एकमेकांना डोळ्यातुन पाणी येईस्तोवर हसत असतील.
- प्राजक्त


Sunday, November 1, 2015

बॅकबेंचर्स :१६ वसु ( सामना ७ नोव्हेंबर १५)

मागच्या बाकावरचे म्हणजे मागे राहणारे असाच नाही होत. कधी कधी मागे राहुन गेलेले असाही होतो हे मला त्या दिवशी कळालं. संध्याकाळ होऊन गेलेली होती. परतीचं गुरं गोठ्यात , काही हौदाजवळ येऊ उभी राहिली होती. पण त्याला एक वासरु कुठं दिसत नव्हतं. तेच त्याच्या अावडतं वासरु ,तो त्याला 'वसु' म्हणायचा. वसुच्या कपाळावर केशरी किरमीजी रंगाचा ठिपका होता म्हणुन त्याला तो सर्वात प्रिय होता. त्याचे अाईवडिल म्हणाले " येतंय अाण कुठं जातंय ते . चल तू जेऊन घे" मग भरभर जेवुन "अाज खुप झोप येतेय" असा बहाणा करुन तो झोपायला माडीवर गेला. अाणि तिथली त्याची नेहमीची पाच कौल काढुन वरतुन उडी टाकली.तो लगबगीने टोर्च अाणि काठी घेऊन निघाला. 
माळरानावर नेहमीच्या रुईजवळ पाहिलं. पाणवठ्यावर पाहिलं. जवळच एका टेकडीवर जिथे तो नसायची शक्यता जास्त होती तिथेही जाऊन पाहिलं. .कितीवर्षापासुन कोरडी विहीर होती. तिथे पडली असेल असा विचार खुप वेळ टाळुन तिथे डोकवायलाच नको असं त्याच्या मनात होत होतं पण शेवटी भिती होती तरी मनामध्ये देवाचा धावा करत करत करड्या विहरीत डोकवुन पाहिलं. तर तिथे ही पहिल्यांदा 'बरं झालं इथं नाही' असं त्याच्या मनातुन उमटलं. एव्हाना रात्र झाली होती. पुर्ण चंद्राची रात्र होती. त्याचे पाय शोधुन शोधुन दगडाचे झाले होते. भिती , अंधार असे विचार त्याच्या डोक्यात शिवले सुद्धा नाही. घरी तो नसल्याने गोंधळ झाला असेल हा विचारसुद्धा त्याला शिवला नाही कारण तो रात्री झोपायला माडीवर गेला कि परत सकाळीच खाली येतसे. 
अाताशा गारठा वाढु लागला होता. निळीशार रात्र अाणि सांदीझाडामधले काजवे टपटपु लागले. एक हवेची झुळूक यायची अाणि काजवे हवेत उडायचे. असं वाटायचं चांदण्यांना पंख लागलेत. रात्र गडद झाली पण त्याला घरी परतावंसं वाटलं नाही. त्याने विचार केला इथेच एखाद्या झाला खाली पडी टाकु अाणि पहाटे जरा उजाडलं कि परत शोध सुरु करु. तिथेच चिंचेच्या झाडाखाली तो पहुडला. पाय ठसठसत होते. अंग ठणकत होतं. एका गार झुळूकेत त्याला झोप लागली सुद्धा. झोपेत पण तो वेगवेगळी ठिकाणं फिरुन बघत होता. थंडीची धार वाढली तो कुडकुडायला लागला.नंतर जरावेळाने त्याचीच त्याला उब यायला लागली अाणि तो परत शांत झोपी गेला. झोपेत त्याला असं वाटलं कि तो वसुच्या कुशीत झोपला अाहे. वसु पण थकुन भागुन त्याच्या सोबत झोपी गेलीय. पहाटे पहिल्या प्रहराला त्याच्या तोंडावर कुणीतरी वडाच्या पारंब्या मारल्यागर भास झाला. पण पहाटेची झोप ती कशाला त्याला अावरतेय. तिथेच झाडाखाली बाहेर अालेल्या मुळाला उशाशी अाणखी घट्ट धरुन तो झोपी गेला. जरावेळाने त्याला अर्धजागृत अवस्थेत विचार अाला कि अापल्या चिचेची मुळं इतकी बाहेर तर नाही. अाणि तो वडाच्या झाडाखाली नाही तर चिंचेखाली होता. ताडकन त्याला जाग अाली. पाहतो तर वसु खरोखरच त्याच्या जवळ होती. अाणि तो तिच्याच कुशीत होता. जी त्याला मुळं वाटतं होती ते वसुचे पाय होते. अाणि सवयीप्रमाणे  हलवलेल्या शेपटाचा भास त्याला वडासारखा झाला होता. कुठे ? कधी ? कसा ? ह्या विचारात न पडता त्याने वसुला मिठी मारली अाणि घराकडे निघाला. घरी जाताच त्याला अाई म्हणाली "कुठ गेलता सकाळी सकाळी?" तो म्हणाला " अासचं सहजं"  अाई "म्हटलं होतं ना येईल कुठं जातंय" त्या दोघांवरुन हात फिरवुन कानावर बोटं मोडुन अाई म्हणाली " वसु ग माझी बाय ती "

-प्राजक्त

बॅकबेंचर्स : १५ तुकाराम (सामना ३१ अॉक्टोबर १५)




लहानपणी जेवणाची वेळ टळुन, चहाची वेळ यायची तरी मी हाका मारुन थकलेल्या आईला ५ मिनीटांत आलो हे उत्तर दर २-२ तासाने देत असायचो. मग वैतागून पदर खोचुन आई बांगड्यां मागे खेचुन मला हाताला धरुन न्यायची. आणि रविवारी मोटारसायकल धुवावी तशी माझे हातपाय धुवून जेवायला बसवायची. तणतणत म्हणायची 'इतका कसला खेळ . जेवणाचंही भान नाही म्हणजे काय. तुक्याची खोडं मेली' जित्याची खोड ऐकुन होतो पण तुक्याची खोड म्हणजे सगळं भान विसरुन काहीतरी करत राहणं हा शब्द प्रयोग मराठीला दिला तो माझ्या घराने. मग हळुहळु त्या तुक्याशी एकएक गुणधर्म जुळू लागला. मनासारखा छापा पडला कि मित्र नाचायचे पण मी मात्र शिक्का उचलून आधी 'काट्याचे' कपडेधुळ स्वच्छ करायचो. न देखवे डोळा ऐसा हा आकांत। पर पिडे चित्त दु:खी होते। तुकोब्बा.
मग काळाने घात केला आणि मी लहानाचा मोठा झालो. आणि ' मी बोलत असतांना कुठे तंद्री असते हो तुमची' असं विचारणारी तुकोब्बारायांची अवली इथेही आयुष्यात आली. कोणी कसंही वागो हसतमुखाने शांतचित्ताने सगळं निभावून नेण्याचा तुकाचार(तुकारामी शिष्टाचार ) अंगी भिनला असल्याने कुणी चिडून वीट जरी फेकली तरी तिला 'सावळ्याची भेट' म्हणुन मी पुजेल की काय ह्या भितीने कुणी कधी ते ही केले नाही.हे लहान आणि मोठे होण्याच्या प्रवासामध्ये एक तारुण्य नावाचा थांबा येतो. त्यात कुणी 'मार्गाला लागतं' तर कुणाकुणाला खरा मार्ग सापडतो. आजोबाम्हणायचे 'बिडी काडी, दारूबाजी परवडली पण नाटकाची दळभद्री थेरं नको' पण कसंय नव्या बाकावर लिहलेलं असतं ना कि ' रंग ओला आहे बसु नये' तिथे आपण गुमान वाट धरण्यापेक्षा अगोचर खात्री करुन हात रंगवुनघेतोच. तसं झालं आणि नाटकाने मानगुट धरलीच. तेव्हा चिडलेले आजोबा तुकोबाच्या दाखल्ला देत चिडले .उध्दरीले कुळ आपण तरला । तोचि एक झाला त्रेलोक्यात ।
पण नंतर प्रतिभा पाहुन शब्बसकी देत हेही म्हणाल्याचं आठवतं की शरण गेलियाने काय होते फळ । तुका म्हणे कुळ उध्दरीले .

तर असं आहे आपला आणि तुक्याचा संबंध. तुमचे जे चाल्लेय ते चालु द्या पण मला त्यात ओढुनताणुन आणु नका . तुम्ही समाधानी रहा मलाही राहु द्या. हे फक्त २ प्रकारच्या लोकं म्हणु शकतात. एक बॅकबेंचर किंवा दुसरे तुकोब्बाराया.
ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असु द्यावे समाधान।
म्हणुन तुकोब्बा जवळचे वाटतात.
पांडुरंग ! पांडुरंग !

-प्राजक्त
(दै सामना साठी )



ग ( मटा ३१ अॉगस्ट १५)


( निसटलेल्या खुणा)

ग तू मला नेमकी कुठे भेटलीस? ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा. पाहिजे त्या क्षणाला खुप शोधाशोध करुन न सापडणारी पण एखाद्या अवचित वेळी नकळत जुन्याशा पुस्तकपानातुन जाळीदार सच्छील पिंपळपानासारखी गरगरत खाली येणारी तू नेमकी कधी भेटलीस ?, कुठे भेटलीस ? का भेटलीस ? ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा.

अगदी लहानपणी , टॅह्यॅपणात रडतांना दोन श्वासांमध्ये उर धपापायचा अाणि झोळी वर टांगलेल्या फिरकी सोबत डोळे गरगरायचे , त्यानंतरच्या तासंतासाच्या अोल्या हुंदक्यांनी मान टाकल्यानंतरच्या अचानकशा पहिल्या घोटात सापडलीस कि त्या घोटातुन अालेल्या दचकण्यात सापडलीस कि त्यानंतरच्या झोपेत सापडलीस? शोध अजुन चालु अाहे. 
नंतर कधीतरी पुन्हा सापडलीस तेव्हा मी नाकळत्या कुशीतल्या वयात होतो. सायकलच्या प्रवासात डबलसीट बसलेलल्या अाईच्या कुशीत असतांना तिच्या कानाच्या डुलणा-या डूलेमध्ये , डूलेमधल्या चिमुकल्या घुंगराच्या लगबगीत तू पुन्हा सापडलीस. पण परतीप्रवासाला रित्या कानावर असलेल्या लालनिळ्या वळांमधुन , डूल नसलेल्या कानाच्या रंध्रामधुन निसटलीस ते निसटलीसच.
पुन्हा भेटलीस तेव्हा मी गावी माळरानावर हुंदडत होतो. तिथल्या रानाशेणातल्या वासात भटकत होतो. रानफुलं गोळा करत होतो.त्या फुलांच्या किरमीजी रंगात तू भेटत गेलीस. अचानक रानभैरी अाभाळ झाकोळुन अालं अाणि गचांडी धरुन झोडपावा तसा पाऊस अाला. सैरावैरा धावतांना एका धनगर बाबानं घोंगडीखाली घेतलं अाणि टेकाडावरच्या तुटक्या देवदगडाच्या गाभा-यात अाडोशाला बसवलं. तिथे कुंद गाभा-यातल्या उदबत्तीच्या अंधारवासामध्ये धनगराच्या दाढीघोंगडीचा मेंढीवास मिसळला. धनगरबाबा म्हणाला ‘पाहु हातात काये ?” मी मुठ उघडली तर अाधीचा रानफुलांचा कुस्कर होता. धनगरबाबा म्हणाला “ या फुलांस्नी काय म्हंता मायती का ? “ मी थरथरत्या अोल्या देहाने नाही म्हणालो. धनगरबाबा म्हणाला “ सितेची अासवं “. कड्डाड् वीजेचा कल्लोळ झाला.मी गप्पदिशी डोळे मिटले. तू तेव्हा निसटलीस परत.

एकदा अशीच तुळसकट्ट्याजवळ भिंगाने कागदं जाळत बसण्याची दुपार. “तुळशीला किड लागलीय बरं.ती उपटुन घे. उद्या वाड्यावरुन अाणुन दुसरी लाऊ” नंतर उरली ती जेवणावळी उरकल्यानंतर टम्म भरलेल्या पोटाची सुस्तावलेली दुपार.अाम्ही पेंगाळलो पण बायकांचा रामरगाडा चालु होता. बांगड्यांच्या येरझा-याच्या नादामध्ये जात्याची घरघर सुरु झाली अाणि जात्याचा खालचा दगड जणू माझी छाती अाहे असं दडपण येऊ लागलं.तू तिथे सापडलीस. जरावेळाने पलीकडे काकणाच्या तालावर ताकाची फेसाळ घुसळण चालु झाली. घुसळणीमुळे नसलेल्या झोक्यावर मला पडल्या पडल्या कोणीतरी जोजवतंय असं भासत राहिलं.तू तिथे सापडलीस. संध्याकाळी गोठ्यात कंकण सळसळीत कुणीतरी धारा काढत होतं तिथं तू सापडलीस. चुलीच्या जाळाशी थापलेल्या भाकरीच्या पिठांची वादळं राखेसोबत गरगरायची तिथे तू सापडली. त्याच रात्री सवयीने दुसरा घास ठेवायला तुळशीजवळ अालो अाणि तिथल्या तुळस नसलेल्या खळग्यात तू पुन्हा निसटलीस.

नंतर थोडं मोठं झालो तेव्हा पावसात कागदाच्या बोटीत, वहीतुन अस्ताव्यस्त फाडलेल्या पानांच्या उरलेल्या चुरगळीत सापडलीस. सायकलीच्या निसटल्या चैनीत , तिस-या दिवशी नखात अडकलेल्या ग्रिसच्या काजळीत सापडलीस. पहिल्यांदा जमलेल्या शिट्टीत, रात्री येळंमाळं शिट्टी वाजवतो म्हणुन अाजीने मारलेल्या टपलीत सापडलीस.एकदा रानात सापडलेल्या किड्याच्या शेपटाला दोरी लाऊन हॅलीकॉप्टर म्हणुन उडवण़्यात दोरी सकट तो किडा सकाळी कोळी जाळ्यात सापडला तिथं तू परत हरवलीस.

मधल्या काळात चहाकपाच्या गोल शिक्कयात , दोन बोटांमधल्या धुरातुनही भेटत राहिलीस तू. नंतर  कुणाकडुन काहीतरी हिसकवल्या गेल्यानंतरच्या विद्रोहातही तू भेटलीस. नाकारल्या, टाळल्या गेलेल्या दु:खातही मी म्हणत राहिलो कि “ त्यांना तर कुठेतरी रमायचं होतं पण अाता त्यांचा प्रवासपक्षी तुमच्याकडे जपा किंवा उडवुन द्या.एक दिवस माझीही हिच गत होईल त्या अाधी …. घ्या हा माझा उर अाणि मलाही माझ्या हक्काचा सूरा एकदाचा देऊन टाका." तेव्हा तू निश्चयाने भेटलीस.त्यावेळी तू निसटल्याची नोंद नाही माझ्याकडे.पण धुरकटल्याची अाहे.

मग काळाने घात केला अाणि अापण मोठे झालो. कुणीतरी डोळ्यात पाहिलं अाणि काळजात भरती अोहोटी झाली. मग त्याच कोणीतरी कायमचा निरोप घेतला तेव्हा अावेगाने भिडली अाणि तू सापडली परत. मग सावरीच्या झाडाची पांढरी म्हातारी जशी हळुहळु उडुन जाते तशी तू अलगद नकळत निसटत राहिलीस.
मोराचा जन्म लांडोराने प्राशान केलेल्या मोराच्या अश्रुने होतो तसं कारुण्यात गवसणा-या चैतन्यासारखी तू भेटली असावी असंही राहुन राहुन वाटतं. पण मोर म्हटलं कि लोकांना मोरपिस अाठवतो अाणि मोरपिस म्हटलं कि कृष्ण. पण मला मात्र कृष्ण म्हटलं कि रानावनात हरवलेलं,निसटलेलं एक मोरपीस शोधणारा मोरच अाठवतो. हि अजुन एक निसटल्याची खुण.

पण ह्या गवसण्या निसटण़्याच्या लपंडावात……. ग ‘कविते’ तू मला नेमकी कुठे भेटलीस?' ह्याचा मी जेव्हा जेव्हा शोध घ्यायला जातो तेव्हा तेव्हा मला सगऴयात अाधी अाठवतात त्या तू निसटल्याच्या खुणा.

- प्राजक्त २९/ १०/१५

म.टा. मैफल







Monday, October 26, 2015

बॅकबेंचर्स : १४ मेणबत्ती ( सामना २४ अॉक्टोबर १५)

झालं असं कि मुख्याध्यापकच्या कॅबीनबाहेर मोठा गदारोळ चालु झाला.पालकांची गर्दी झाली. शिक्षकदिना नंतरचा दुसराच दिवस." शाळेत असं काहीही शिकवतात का ?" वगैरे असे प्रश्न विचारत पालक लोकं हात नाचवत भांडत होते. कसं बसं सगऴयांना अात बसवलं अाणि शांत केलं. मुख्याध्यापक सरांनी विचारलं "नक्की अडचण काय अाहे ? " मग एक एक जण बोलु लागला. मग सरांना लक्षात अालं कि हि सर्व मंडळी एकाच वर्गातल्या विद्यार्थ्याीची अाहे. मग सरांनी सगळ्या पालकांना कॉन्फरंस रुमला वाट पहायला लावली. सर स्वत: ज्या वर्गाचा हा गोंधळ होता तिथे गेले तुकडी 'फ' . तिथे जाऊन चालु तास थांबवुन मास्तरांना बाहेर थांबायला सांगितलं. वर्ग बंद केला. अाणि खड्या अावाजात प्रश्न विचारला " काल शिक्षकदिनाला 'सामान्या ॹान' हा विषय कोण शिकवत होतं ? " शेवटच्या बेंचवरुन मी हळुच हात वर केला. "पुढे ये" ढग गडगडावे तसा सरांचा बेस मधला अावाज गडगडला. मी बुचकाळ्यात पडलो. पहिल्या बेंचवरचा ढापण्या जसा 'संत चेहरा' करुन बसलेला असतो तसे निरागस भाव मी डोळ्यापुढे अाणायचा प्रयत्न केला. मग मुख्याध्यापक म्हणाले " रामायणात राम-रावणा युद्धा मध्ये कोण जिंकलं ?" कोणी २+२ किती ? इतका सोपा प्रश्न विचाराल्यावर जितके निवांत होतात तितका निवांत झालो. अाणि नजरेत नजर रोखुन,शाबासकीच्या अपेक्षेने उत्तर दिलं " रावण" 
सरांच्या कानातुन धूर येत असावा असा मला भास झाला. पण कदाचीत ते कानावरचे थरथरणारे केस असावेत अशी मी उभ्या उभ्या स्वत:ची समजुत घातली. ( "कानावर केस असणारे मोठे विचारवंत अाणि हुशार असतात बरंका!" उगाच अाजोबांचे शब्द अाठवले)चोरट्या नजरेने वर्गातल्या कोप-यातल्या टिळकांच्या फोटोला मनातल्या मनात नमन केले. सर म्हणाले " तुझ्या अशा सांगण्यामुळे सगळे पालक भांडायला अाले अाहे, " त्यानंतर सर निमुट माझ्या जागेवर मागच्या बाकावर बसले अाणि म्हणाले सांग रावण विजेता कसा सांग ?" मी  सुरु झालो " प्रत्येक राजाची अशी अट असते कि शत्रु राजाने अापल्या राज्यात पराभुत झाल्या शिवाय किंवा मेल्या नंतरच पाय ठेवावा. अाणि वैकुंठनरेश विष्णुचा अवतार असलेल्या प्रभु रामाने लंकेत पाय ठेवला तेव्हा रावणाने प्राण सोडले होते. शिवभक्त रावणाला त्याच्या निष्ठेमुळे मरणोत्तर वैकुंठात जावे लागले.म्हणजेच प्रभु रामाच्या हयातीत रावणाने श्रीहरीरामाच्या राज्यात प्रवेश केला होतात.सबब रावणाने टेक्निकली युद्ध जिंकले." सर वैतागुन उपरोधाने म्हणाले "हे परम ॹानी मुला, हे असले ॹान चुक कि बरोबर च्या पलीकडे ठेवुन इतरांसोबर वाटायचे धाडस का केलेस? तुझे ॹान मेण अाहे ते असे पेटवुन वितळुन जाईल. जपुन ठेव."  
त्यावर मी उत्तरलो "दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. "
मुख्याध्यापक सर त्यानंतर अाठवडाभर रजेवर होते.

- प्राजक्त 
(दै. सामनासाठी )


Friday, October 16, 2015

बॅकबेंचर्स : १३ प्रश्नचिन्ह (सामना १७ अॉक्टोबर १५)

तो त्याचा उमेदीचा काळ होता. तो पहिल्या बाकावर बसायचा. इन्स्पेक्षन नावाचा भितीघालु प्रकारु त्यावेळी शाळेत होतसे. मराठीच्या सरांनी मोठ्या अभिमानाने त्याला उभं केलं अाणि म्हणाले " याला विचार प्रश्न." त्यांना त्याने जे उत्तर दिलं त्याचा मोबदला म्हणुन त्याची रवानगी शेवटच्या बाकावर झाली अाणि तो प्रथमपुरुषी एकवचनापासुन अंतिम पुरुषी अनेकवचनी झाला. म्हणजे 'हा हुशार मुलगा अाहे' पासुन 'ती सगळी मागची टुकार पोरं' असा बदल झाला.
नव्याने मुल्यशिक्षण नावाचा नविनच तास चालु झाला होता. सगऴयात पहिला वर्ग तो भरायचा. वर्गशिक्षक म्हणाले होते. "उद्या पासुन तुमचा मुल्यशिक्षणाचा पंधरा मिनीटाचा 'तास' घेणार अाहोत.(पंधरा मिनीटाचा तास ? त्याचं बालमन) यामध्ये तुम्हाला समाजोपयोगी अाणि व्यक्तिमत्व विकासासाठी लागणारे मुल्ये शिकवली जातील.अशा विनासायास शंभर पानी वहीतल्या मुल्यांच्या उता-यांचा किती उपयोग होईल याबद्दल माझ्या मनात चिडयुक्त शंका होती. अशातच एकदा मास्तरांना काय लहर अाली ते म्हणाले 'विचारा काही शंका विचारा, कोणताही प्रश्न जो तुम्हाला खुप दिवसापासुन छळतोय ,विचारा. गणीत,इतिहास,सामान्य ॹान काहीही असलं तरी विचारा.' तितकंच त्यांच्या 'जिॹासुपणा' ह्या मुल्याला चालना मिळो हा कदाचित मास्तरांचा अंदाज असावा. तसे नाना प्रश्न येऊ लागले. ' पृथ्वी गोलच कशावरुन ? , पाउस पडतो म्हणजे नेमके काय? , चिंचेला अांबे येतील का ?वगैरे कितीतरी कुतूहल शमवण्याचे काम मास्तर करत होते. अनेकवेळ लाव्ह्यासारखा दाबुन ठेवलेल्या त्याच्यातल्या ॹानपिपासु विद्यार्थ्याने उचल खाल्ली अाणि त्याने निश्चयाने हात उचलला अाणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
 " 'ज' जहाजेचा तर मग 'ण' बाणाचा अाणि 'ळ' बाळाचा कसा ? , प्रत्येक अाईसक्रिमवालाच्या गाड्याचे नाव सांवलिया का? , नवनाथ सोडुन रसवंतीगृहाला इतर नावे का नाही देत? ,जीव मारलेला अाहार मांसाहार मग वनस्पतींना सजीव नाही कशा ? पांढ-या झेब्राला काळे पट्टे असतात कि काळ्या झेब्र्याला पांढरे ? , शाळेच्या पहिल्या दिवशी , पहिलं वाक्य 'भारत माझा देश अाहे . सारे भारतीय बांधव..' मग शाळेत नाव घालतांना जातीचा दाख..... " त्याला मध्येच थांबवत त्या दिवसापासुन त्याची रवानगी झाली थेट मागल्या बाकावर झाली तेव्हा वर्गाच्या डोळ्यात हसुन हसुन पाणी होते अाणि मास्तरांच्या कपाळावर घामाचे.


- प्राजक्त


Friday, October 9, 2015

बॅकबेंचर्स : १२ सुप्रिया (सामना १० अॉक्टोबर १५)


एखादे इंजिन व्यवस्थित चालतं कारण त्या इंजिनमधले चक्र एकमेकांच्या खाच्यात घट्ट बसलेले असतात अाणि गोल फिरत राहतात. चक्र पण एकमेकांमध्ये त्याच्या गुणदोषांमुळेच घट्ट असतात. म्हणजे जिथे उंच अाहे तिथे दुस-या चक्राचे खोलगट भाग असतो अाणि याचा जिथे खोल तिथे दुस-याचा उंच. हेच गुणदोषांचे सुत्र जगतांना सगळीकडे लागु होते. उदाहरणार्थ मित्र किंवा त्याहुन चपखल उदाहरण म्हणजे तुमचा संसाराचा जोडीदार. थोरमोठी माणसं म्हणतात "असंच असतं सारख्याला वारखंच मिळतं. अावडी निवडी बरोबर विरुद्ध असतात." मग त्यावर सौ म्हणणार "बरोबरच अाहे इथे खड्डा असला कि कुठेतरी ढिग पाहिजेच ना". कसंय कि  कुंडली उत्तम जुळायला ३६ गुण लागतात. ह्या ३६ अाकड्यातच नियतीने डावपेच रचुन ठेवलेय. म्हणजे जुळली नाही तर गडबड हि होणारच अाणि उत्तम जुळली तरी पाठीला पाठ ३६.अाता बोला ! खिंडीत गाठणे म्हणतात ते हेच. पण हा विरोधभास गरजेचा असतो. तुम्ही चपलेचा अंगठा असेल तर अंगठा तुटल्यावर ज्या उर्वरित भागावर टिकुन सावरत पुढचा प्रवास होतो तो उर्वरित भाग म्हणजे तीच. तुम्ही अखंड अोढणारी जपमाळ असाल तर तुम्हाला परत भानावर अाणणारी ती मेरुमणी होते. तुम्ही भले अख्खी गाडी चालवा पण 'चावी कुठे ?' हे तिकडे विचारावंच लागतं. तुम्ही बाजारात गेल्यावर ज्या पैशात एखादी भाजी अाणतात तितक्याच पैशात तेवढ्याच भाजीसोबत कोथंबीरची जुडी अाणि चार लिंब त्यांनीच अाणावी. हे करणे पुरुषी येरागबाळ्याचे काम नोहे. पै पै मोजुन टम्म टम्म पाणीपुरी खाणा-्या लोकांना 'स्स्स् तिखट लागलं !! म्हणुन फ्रि मसाला पुरीच्या वरदानाची प्रथा एखाद्या कर्तव्यदक्ष तीच्या सुपीक डोक्याची कल्पना असु शकते. तुम्ही भले सुर्य असाल पण रखरखता, कपाळावर घाम अाणणारा. पण ती कपाळावरची चंद्रकोर होते. तुम्ही भले भव्य इतिहास असाल पण अाज जगतांना लागणार नागरिकशास्त्र तीच. तुम्ही स्वत:ला भूगोल समजा पण तो गोल ज्या अर्थकारणावर चालतो ते अर्थशास्त्र तीच. इथे मी 'तो' असल्याने उदाहरणादाखल 'ती'चे उदाहरण देतोय.'ती'असतो तर 'त्या'चे उदाहरण देता अाले असते कारण विषय जोडीदार असा अाहे. तुम्ही भले दुरुन दिसणारा प्रिय गुलमोहर असला तरी तो अतिप्रिय, सुप्रिय तेव्हाच होता जेव्हा तुम्ही अोंजळीत अोघळणारा प्राजक्त होतात.
म्हणुनच प्रत्येक बॅकबेंचरच्या अायुष्यात एक पुढच्या बाकावरचा स्कॉलर अावश्यक असतो.  संसाराच्या ह्या पत्त्याच्या डावात पुरुष कधी गुलाम होतो कधी राजा पण 'ती' नेहमी राणीच राहते
- प्राजक्त 



हाऊज दॅट

॥􏰀ी॥

हाऊज दॅट ?!?

आठव􏰁यातुन फ़􏰂 दोन 􏰃दवशी लाल ड􏰄बाबसचं दश􏰅न होणारं गाव.ं माग􏰆या बाजुला वैतागुन जंगल􏰇हणता येईल अशी झाडांची थोडीशी वद􏰅ळ. पल􏰈कडे टुमदार वाहणार􏰈 नद􏰈. ’टुमदारहे 􏰉व􏰊च􏰋 􏰉वशेषण नद􏰈ला कसं...? तर 􏰌ातच 􏰍शवाईचं ड􏰎गर डोकावतं आ􏰏ण 􏰐यावर 􏰃दसणार टुमदार मं􏰃दरसु􏰑ा. 􏰍शवाई􏰆या ड􏰎गरा􏰆या पाय􏰒याशी समु􏰓काठ􏰔 वाळुचा खोपा के लासारखं असलेलं गाव. कौलाची,एका 􏰍श􏰕तीम􏰖ये उभी असलेल􏰈 बसक􏰗,लांबट घरं.मधुनच गेलेल􏰈 पायवाट सुबक वाट चौकात􏰘या गद􏰙ला आ􏰏ण 􏰉पंपळपाराला वळसा घालुन पुढे कपाले􏰚र मं􏰃दरासमोर􏰆या नंद􏰈बैलाला 􏰆यक 􏰆यक...􏰌ॅक....’ करत पुढेच मोठं वावर ओलांडुन अगद􏰈 खाल􏰆या बाजुला 􏰊चंचे􏰆या ,वडा􏰆या रांगांपुढे उल􏰛या ’U’आकाराची कौला􏰜 बसक􏰗 इमारत 􏰝याला सगळे शाळा 􏰇हणत असे तर आमची पतंगी गँग􏰐याला खाल􏰈􏰇हणत अस.ु 􏰇हणजे बोल􏰞यात शाळा कमी आ􏰏ण...
काय रे खाल􏰈 गेला होता का?”
खाल􏰈 जाणार आहे का आज?”
आज उगाच खाल􏰈 आलो...असं वाटतयं !”
मा􏰕तर गावी गे􏰘येय.. खाल􏰈जाऊन काय झ􏰟क मरणारे का रे आज?”
जी गो􏰠 तु􏰇हाला भ􏰉व􏰡यात वरनेते 􏰢तला खाल􏰈􏰇हणने जरा 􏰉व􏰊च􏰋 असलं तर􏰈... आपुलक􏰗ने आ􏰏ण रोज􏰆या वापरात असलेलं नावं अस􏰘याने श􏰄दश: ‘खाल􏰈असं 􏰐यात काह􏰈 नाह􏰈.
आमची पतंगी􏰣यांग 􏰇हणजे गावा मधलं चैत􏰤य (ह􏰈 आमची आ􏰇हालाच ओवाळणी).
पतंगी 􏰣यांग
ए गेल􏰈 रे गेल􏰈
लाईट 􏰟यामेरा आ􏰟शी.....!! कट कट क􏰛ल􏰈 रे कटल􏰈
डावी घे डावी घे
साडे माडे डु􏰄बुक रे भो ! “
शाळा सुटुन पुंज􏰟या पुंज􏰟याने आ􏰇ह􏰈 गोळा होतं वावरातले ढेकळं तुडवत घराचा र􏰕ता धरायचो.सवा􏰅त आधी शाळा सुटुन बाहेर ठरले􏰘या 􏰃ठकाणीयेणार तो लो􏰛या आ􏰏ण मी (नव􏰘या).
लो􏰛या
मा􏰕तर... पोट दुखतंय
ए आला आला लोटा....”
हु􏰥पा हु􏰦या
मा􏰕तर...पोट
मी
"इं􏰃दरा गांधींना पंत􏰧धान ऐवजी बया􏰧धान असं का नाह􏰈 􏰇हणत?"
"
नोटांवर रा􏰨􏰉पता आहे तर 􏰢नदान 􏰊च􏰘लरवर रा􏰨प􏰩ी का नाह􏰈?"
"
ढग-रग सारखेच श􏰄द मग रगेमधे घु सु न िजतकं गु बगु बीत वाटतं 􏰢ततकं च ढगामधे जाउन वाटत असेल का ?"
ए भौ ...ब􏰕स ना खाल􏰈 !”

मी: काय रे कधी आला ?
लो􏰛या : (पोट दाबत) : ह􏰇􏰇􏰇म... एक तास झाला इथेच बसलोय..म􏰖ये म􏰖ये मागे वावरात फे रफटका टाकु न आलो.
मी: लो􏰛या तुला टोला देउ का रे...! खाल􏰈 येतोच कशाला ? एकदाच बुच बसवुन घे क􏰗 रे...
लो􏰛या : तर􏰈 बरं आज दोन वॅटरबॅगी आण􏰘या हो􏰐या...तु आणल􏰈य का ?
मी: ( सव􏰅 पाणी 􏰉पउन घेत) : संपलं !!!
लो􏰛या : संपवलं 􏰇हण.
मी: घाबरतो क􏰗 काय मग तुला तु􏰪यासमोरच 􏰢त􏰆या तळाला आकाश दाखवला ना रे...तुझा तळ बघ􏰞यापे􏰫ा बरं नाह􏰈 का त..
लो􏰛या : हे बघ नव􏰘या.....
(
􏰊चक􏰛या येतो)
􏰊चक􏰛या: मला पण दाखव...

􏰊चक􏰛या

ए पाहु पाहु
बघु रे
मी येतो मी येतो
अरे जेवतोय का? आलोच हात धुउन

लो􏰛या: लांब उभा रहा ...
􏰊चक􏰛या : वास तु मार आ􏰏ण लांब आ􏰇हाला उभं करतो का रे..लोटे...टोले देउ का? मी : ग􏰥प रे....तो 􏰄ब... तो 􏰄ब...भव-या 􏰣यांगचा टव􏰟या चा􏰘लाय..

भव-या ग􏰬ग
हवेत गोळीबार पतं􏰣यांचा..टोचु का टोक भव-यांचा ?” “तंगलेल􏰈 च􏰁डी,कान नाक तंग....उडाल􏰈 रे कटल􏰈 रे,कटल􏰈 पतंग

लो􏰛या : (नाक दाबुन) ए ट􏰭􏰭􏰭􏰭व्व.....􏰟या !
मी आ􏰏ण 􏰊चक􏰛या : (आवाज घुम􏰘या सारखे करत) : 􏰟या 􏰟या 􏰟या 􏰟या......!!
टव􏰟या : (दु􏰜न) सांजेला भेटय...सांजेला भेट...कसा दांडकुळा उडवतो बघ.
लो􏰛या : चल रे माग􏰆या वेळी शु 􏰆या जागा ध􏰜न डा􏰭या हाताने जेवत होता घर􏰈 􏰉वसरला का...तसा आऊट करतो सांजेला.क􏰮ळं का ?
􏰊चक􏰛या : का का का का ....!!
लो􏰛या: 􏰇हणजे तसा नाय तर असा आउट....बरं का टव􏰟या...!
􏰊चक􏰛या: 􏰟या 􏰟या 􏰟या 􏰟या 􏰟य...
मी : ए ग􏰥पे 􏰊चक􏰛या ! लो􏰛या 􏰇याचे आज ?

􏰇याच :
गेला रे गेला..!”

ये आयो उ􏰯ीघर आला“ 

􏰊चख􏰘या आजी आल􏰈 बघ...” “ssssवाssssज देट हे ?“

च􏰛याप􏰛या : नव􏰘या तु 􏰧े􏰰 खुप 􏰉वचारतो रे...आज मेचे ना बाहाबाहा....
मी:मल कसं नाह􏰈 माह􏰈ती...
च􏰛याप􏰛या : "इं􏰃दरा गांधींना पंत􏰧धान ऐवजी बया􏰧धान असं का नाह􏰈 􏰇हणतं?" मा􏰃हतीय तुला ?
मी: नाह􏰈 ...नाह􏰈 सांग ना यार क􏰮ळं का तुला 􏰐याच कारण?
च􏰛याप􏰛या : ए नव􏰘या तु 􏰧े􏰰 खुप 􏰉वचारतो रे...आज मेचे ना बाहाबाहा....ग􏰥प ना ...हे 􏰧े􏰰 तुलाच पडतात...तुच शोध कारणं ....
􏰊चक􏰛या : आज मेचीचं माह􏰈त न􏰭हतं काय तुला ? ......फ़ु लवा चा􏰘ल􏰈 फ़ु लवा.....

फ़ु लवा

(फ़􏰂 हसतांना- चार वेग􏰮या ऍंगलन)मी : इतकं गोड कु णी कसं हसु शकत बे ?

च􏰛याप􏰛या : ए तु 􏰧े􏰰 खुप 􏰉वचारतो रे ...नुसतं बघ ना बाहाबाहा.... 􏰊चक􏰛या : पण मी 􏰇हणतो मेचीचं माह􏰈त न􏰭हतं काय तुला ? सुतळी : 􏰟􏰟काssss??? तुला मॅचीचं माह􏰈ती नाह􏰈???

सु तळी

ए हे 􏰄ब...हे 􏰄ब...मी उडतोय “ “हवा म􏰱 उडता जाए
मी जर 􏰊चडलो ना ...!” “.....”

सुतळी: अबे जर मॅचीच तुला माह􏰈त नाह􏰈,मग 􏰕टंप 􏰇हणुन तुला हु भा क􏰜 काय... च􏰛याप􏰛या: अरे हो 􏰕टंपं...

􏰊चक􏰛या: नव􏰘या 􏰕टंप ?

􏰕टंप

पुजे􏰆या वेळी पाट कुठे जातो हो ?” “ssजी पाट नेऊ?” “गर􏰅..र􏰅..र􏰅..गर􏰅...र􏰅...र􏰅
हाउज दॅsssss?”

नव􏰘या: हो ना यार....आधी तर बोलायच...
􏰊चक􏰛या :आ􏰏ण आज फायनल मॅच आहे
सुतळी
: फायनल 􏰇हणजे अं􏰢तम नाह􏰈 फायनल 􏰇हणजे...एकदम फायनल...􏰉वषय संपवु भव-यांचा नव􏰘या: (पळत पळत) जातो मी बघतो पटकन....
(
􏰉पशवीतुन पाट􏰈 पडत...नव􏰘या 􏰲यायला वळतो )
􏰊चक􏰛या : मी घेउन येतो , तु जा तु जा ..
च􏰛याप􏰛या: ए मोहांजदाडो सर चा􏰘लेत ओरडु नको

मोहांजदाडो सर

 हड􏰥पाआ􏰏णमोहाजंदाडोसंकृती

हे 􏰇हणजे मोहांजदाडो संकृतीसारखंच” “मोहांजदाडोच कसं होत माह􏰈तीए का?” “खरंतर मोहांजदाडो􏰆या पानावर इ􏰢तहास 􏰍लहलाय

सर : 􏰢नघा रे पो􏰛या हो ....

नव􏰘या : (पळत पळत .. घराकडे जाणा-या नेहमीची एक एक 􏰃ठकाणं मागे टाकतोय) खाट 􏰉वणतांना एकदा उभी􏰆या एवजी आडवी 􏰉वणल􏰈 तर कशी 􏰃दसेल?
वडाखालचा पार वतु􏰅ळा􏰆या ऐवजी चौकोनी कसा वाटेल?
मा􏰜तीराया, असं 􏰳कती पळुन उडी मारल􏰈 क􏰗..मग उडता येतं तु􏰪यासारख?

नद􏰈मधे सु य􏰅 चमकु न चमकु न...पाणी 􏰳कं चीत गरम होत असेल का ? म􏰱􏰴यांना ओळख􏰞यासाठ􏰔 रंग देतात तसा माणसांना 􏰃दला तर?
दोन र􏰕􏰐यांचा असला तर􏰈 चौकाला चौक का 􏰇􏰵तात....
जोग􏰟का अंगणातच ... ? अंगणा􏰆या 􏰭या􏰶येपुरतं घर बांधलय का 􏰢तन?े घराबाहेर रांगोळी ? 􏰃दवाळी ला तर वेळ आहे....

(उडी मारत...तुट􏰟या तुळशीवर चढुन ...नव􏰘या कौलं चपापतो...) (􏰉पतळी फु ल....􏰉पतळी फु ल...􏰉पतळी फु ल.....?)

(आतुन आवाज ):– नव􏰘या आला का ? 􏰧सादाचं सांगुन ये कसा ? (पाट नाह􏰈 ....􏰧सादाचं सांगावा ? – स􏰐यनारायण !!!!!!!)

पंतोबा गु􏰜जी पाट आ􏰏ण चौरांगाम􏰖ये अंतर ठेवा...मधे पुजेचे ता􏰇हण ठेवायचे आहे
नव􏰘या
: (दरवा􏰝या􏰆या चौकट􏰈तुन गडबड बघत उभा....)
(
आजी ता􏰇हण ठेउन गेल􏰈....पंत चारवेळेस पळीने पा􏰋ाचे पाणी वरखाल􏰈 करत होते...आईचा नु􏰕ताच आवाज येत होता...आजोबा अंगावर अजुनह􏰈 पुजेला पांढरे व􏰷 􏰲यावे क􏰗 􏰉पवळॆ 􏰌ा 􏰉वचारात..) नव􏰘या : 􏰳कतीवेळ चालेल पुजा गु􏰜जी ?

आजी : तुला काय आटपाट नगरात जाऊन पाटपाट खेळायचा असेल ? हो ना ?...आज पाट 􏰍मळणार नाह􏰈.... जा...सगळी कडॆ 􏰧सादाला सांगुन ये !
नव􏰘या : पण आज खुप मह􏰐वाची मॅ􏰆चे ग !
आई : ऐकलं का ?जा पटकन !

आजोबा :इकडे ये ..! सग􏰮यांना पटकन बोलावुन घे 􏰧सादाला...􏰇हणजे पाट लौकर 􏰸रकामा होईल.

नव􏰘या : ( वेगवेग􏰮या 􏰃ठकाणी जाऊन 􏰉वचारतो. सगळी कडे नाह􏰈अथा􏰅ची वेगवेगळी उ􏰹रं...) पाट आहे ? (नाह􏰈)मग 􏰧सादाला लौकर या !

पाट ? 􏰧साद....लौकर !
पाट असेल ना ? (नाह􏰈) 􏰧सादाला येउन जा लौकर !


पाट नसेलच ! (नाह􏰈) 􏰧साद पाठवुन देतो...येत नका बस...गुढघे दुखत असतील.

(दमुन नव􏰘या घर􏰈 )
आजोबा: काय नवलोबा....मोह􏰈म फ􏰹े ?
नव􏰘या: तु􏰇हाला घरात २ पाट ठेवायला काय होतं ?􏰌ा आठवडी बाजारात एक पाट आणा...कारण आजी : sssssहो !
आजोबा: (डोळे 􏰍मचकावत)करायचे काय मी 􏰇हणतो २ पाट .... अरे वा रे वा !!
गु􏰜जी :दोघं जाउन अंगणात􏰘या तुळशीचा नम􏰕कार क􏰜न या !! तोवर मी 􏰉वरजण बनवतो.
आजी : पाणी आण नव􏰘या....सांडु
(नव􏰘याकडुन पाटा􏰆या शेजार􏰈 पडत)
नव􏰘या
: गु􏰜, हे पाटावरचे आसन बदलुन घेतो ओले झाले थोडे
(माग􏰆या दारातुन 􏰊चक􏰛या आवाज देतो )
􏰊चक􏰛या:काय रे चल ना !
नव􏰘या : पुजा रे....
􏰊चक􏰛या : मग?
नव􏰘या : पाट रे .....
􏰊चक􏰛या : आयला मग ?
नव􏰘या : तेच रे....
􏰊चक􏰛या : मग ?
नव􏰘या : गप रे ....तु जा पुढ.. सु􏰜 करा.. मी आलोच...
(
तुळशीकडुन परत येतात ...

नव􏰘या ( खेळतोय....) : टाक टाक आत म􏰖ये वळव ...􏰳फ़रक􏰗 नको....! पाटावर बसताच...काह􏰈तर􏰈 टोच􏰘यामुळे)

आई: अरे देवा....

आजी : (पाटावरचे आसन सरकवते...खाल􏰈 􏰉वटा 􏰃दसतात...आजी ओरडत...) नवssssss􏰘या !!!!!!

(खेळाम􏰖ये जोरात बॉल सुटतो...पाटा􏰆या आरपार जातो... बाद झा􏰘याने सगळे ओरडतात....आरपार झाले􏰘या भागातुन नव􏰘याचा चेहरा 􏰃दसतोय )
सगळे जण अजुनह􏰈 आनंदात ओरडताय : हाऊस दॅट !!!!???!!!!

-समा􏰺-

page5image12080

-􏰧ाज􏰂 देशमुख 

page1image16208

अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)

  मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...